शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

मंदिराचा विषय राष्ट्रीय-अराष्ट्रीय संघर्षाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:58 IST

रामाला मानणारा प्रत्येकजण हा राष्ट्रीय असून राम मंदिराला विरोध करणारे हे अराष्ट्रीय आहेत़ अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एवढी वर्षे लागणे हा तमाम रामभक्तांचा अपमान असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांनी केले़

ठळक मुद्देहुंकार सभाविहिंपचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांचे प्रतिपादन

नांदेड : कोट्यवधी हिंदूची आस्था असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येतील मंदिराचा विषय हा हिंदू-मुस्लिम, मंदिर-मशीदचा नसून राष्ट्रीय-अराष्ट्रीय संघर्षाचा आहे़ रामाला मानणारा प्रत्येकजण हा राष्ट्रीय असून राम मंदिराला विरोध करणारे हे अराष्ट्रीय आहेत़ अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एवढी वर्षे लागणे हा तमाम रामभक्तांचा अपमान असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांनी केले़विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नवीन मोंढा मैदानावर हुंकार सभेचे आयोजन केले होते. या सभेत ते बोलत होते़ देशपांडे म्हणाले, राम मंदिरासाठी १५२८ पासून संघर्ष सुरु आहे़ राम हे केवळ शंभर कोटी हिंदूचे नव्हे, तर अनेक जाती-धर्मातील लोकांसाठी पुजनीय आहेत़ इंडोनेशियासारख्या मुस्लिमबहुल देशात भगवान श्रीरामांचा अभ्यासक्रमात समावेश आहे़ त्यांच्या नोटेवर श्रीगणेशाचे चित्र आहे़ त्यामुळे इंडोनेशियाचा आदर्श घेतल्यास देशातील अनेक प्रश्न सहज सुटतील़ धर्मा-धर्मात भांडणे होणारच नाहीत़ अयोध्येतील राम मंदिरावर बाबराने तब्बल ७६ वेळा स्वाऱ्या केल्या़ त्यावेळी साडेतीन लाख लोकांची कत्तल झाली़ त्याचप्रमाणे सोमनाथावर गझनीने स्वारी करुन ते मंदिर तोडले होते़ तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून संसदेत कायदा करुन सोमनाथाचे मंदिर उभारण्यात आले़अयोध्या आणि सोमनाथचा इतिहास एकसारखाच आहे़ अयोध्येवरही विदेशी आक्रमकांनी स्वारी केली़ असे असताना अयोध्येतील मंदिरासाठी वेगळा न्याय का? २२ वर्षे उच्च न्यायालयात चाललेले हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे़ या ठिकाणी आणखी किती वर्षे लागतील हे सांगता येणे शक्य नाही़ हा खटला लांबविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत़ त्यामध्ये माओवाद्यांची बाजू उचलून धरणा-यांचाही समावेश आहे़न्यायाला विलंब करणे म्हणजेच न्याय आकारणे हे साधे सूत्र आहे़ त्यामुळे संसदेत राम मंदिर उभारणीचा कायदा झालाच पाहिजे़ त्याचबरोबर देशातील जी गुलामीची प्रतीके आहेत ती हटविलीच गेली पाहिजे़ राम मंदिर उभारणीचे दोन तृतीयांश काम पूर्ण झाले असून सुरुवात केल्यास दोन वर्षात मंदिर उभे राहील असेही ते म्हणाले़ यावेळी व्यासपीठावर वीरुपाक्ष महाराज, बालयोगी देवपुरी महाराज, आनंद बन महाराज, ह़भ़प़चंद्रकांत महाराज लाठकर, ह़भ़प़माधव महाराज केंद्रे, ताराबाई बोमनाळे, कृष्णा देशमुख यांची उपस्थिती होती़

  • सत्याच्या विजयासाठी आपण लढा देत आहोत़ शीख धर्मातही प्रभू श्रीरामांचा उल्लेख आहे़ श्री गुुरु गोविंदसिंघजी महाराज यांनी अवधपुरीत रामाचा जन्म झाल्याचे नमूद करुन ठेवले आहे़ त्यामुळे जन्म झाला त्याच ठिकाणी प्रभू रामाचे मंदिर व्हायला पाहिजे़ कोणत्याही धर्मातून धार्मिक ग्रंथ आणि स्थळ हटविले तर तो धर्मही नामशेष होतो़ त्यामुळे सरकारने चूक सुधारत स्वखर्चाने मंदिर उभारावे, असे प्रतिपादन सरबजित निर्मल यांनी केले़
टॅग्स :NandedनांदेडRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिर