शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मंदिराचा विषय राष्ट्रीय-अराष्ट्रीय संघर्षाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:58 IST

रामाला मानणारा प्रत्येकजण हा राष्ट्रीय असून राम मंदिराला विरोध करणारे हे अराष्ट्रीय आहेत़ अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एवढी वर्षे लागणे हा तमाम रामभक्तांचा अपमान असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांनी केले़

ठळक मुद्देहुंकार सभाविहिंपचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांचे प्रतिपादन

नांदेड : कोट्यवधी हिंदूची आस्था असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येतील मंदिराचा विषय हा हिंदू-मुस्लिम, मंदिर-मशीदचा नसून राष्ट्रीय-अराष्ट्रीय संघर्षाचा आहे़ रामाला मानणारा प्रत्येकजण हा राष्ट्रीय असून राम मंदिराला विरोध करणारे हे अराष्ट्रीय आहेत़ अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एवढी वर्षे लागणे हा तमाम रामभक्तांचा अपमान असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांनी केले़विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नवीन मोंढा मैदानावर हुंकार सभेचे आयोजन केले होते. या सभेत ते बोलत होते़ देशपांडे म्हणाले, राम मंदिरासाठी १५२८ पासून संघर्ष सुरु आहे़ राम हे केवळ शंभर कोटी हिंदूचे नव्हे, तर अनेक जाती-धर्मातील लोकांसाठी पुजनीय आहेत़ इंडोनेशियासारख्या मुस्लिमबहुल देशात भगवान श्रीरामांचा अभ्यासक्रमात समावेश आहे़ त्यांच्या नोटेवर श्रीगणेशाचे चित्र आहे़ त्यामुळे इंडोनेशियाचा आदर्श घेतल्यास देशातील अनेक प्रश्न सहज सुटतील़ धर्मा-धर्मात भांडणे होणारच नाहीत़ अयोध्येतील राम मंदिरावर बाबराने तब्बल ७६ वेळा स्वाऱ्या केल्या़ त्यावेळी साडेतीन लाख लोकांची कत्तल झाली़ त्याचप्रमाणे सोमनाथावर गझनीने स्वारी करुन ते मंदिर तोडले होते़ तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून संसदेत कायदा करुन सोमनाथाचे मंदिर उभारण्यात आले़अयोध्या आणि सोमनाथचा इतिहास एकसारखाच आहे़ अयोध्येवरही विदेशी आक्रमकांनी स्वारी केली़ असे असताना अयोध्येतील मंदिरासाठी वेगळा न्याय का? २२ वर्षे उच्च न्यायालयात चाललेले हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे़ या ठिकाणी आणखी किती वर्षे लागतील हे सांगता येणे शक्य नाही़ हा खटला लांबविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत़ त्यामध्ये माओवाद्यांची बाजू उचलून धरणा-यांचाही समावेश आहे़न्यायाला विलंब करणे म्हणजेच न्याय आकारणे हे साधे सूत्र आहे़ त्यामुळे संसदेत राम मंदिर उभारणीचा कायदा झालाच पाहिजे़ त्याचबरोबर देशातील जी गुलामीची प्रतीके आहेत ती हटविलीच गेली पाहिजे़ राम मंदिर उभारणीचे दोन तृतीयांश काम पूर्ण झाले असून सुरुवात केल्यास दोन वर्षात मंदिर उभे राहील असेही ते म्हणाले़ यावेळी व्यासपीठावर वीरुपाक्ष महाराज, बालयोगी देवपुरी महाराज, आनंद बन महाराज, ह़भ़प़चंद्रकांत महाराज लाठकर, ह़भ़प़माधव महाराज केंद्रे, ताराबाई बोमनाळे, कृष्णा देशमुख यांची उपस्थिती होती़

  • सत्याच्या विजयासाठी आपण लढा देत आहोत़ शीख धर्मातही प्रभू श्रीरामांचा उल्लेख आहे़ श्री गुुरु गोविंदसिंघजी महाराज यांनी अवधपुरीत रामाचा जन्म झाल्याचे नमूद करुन ठेवले आहे़ त्यामुळे जन्म झाला त्याच ठिकाणी प्रभू रामाचे मंदिर व्हायला पाहिजे़ कोणत्याही धर्मातून धार्मिक ग्रंथ आणि स्थळ हटविले तर तो धर्मही नामशेष होतो़ त्यामुळे सरकारने चूक सुधारत स्वखर्चाने मंदिर उभारावे, असे प्रतिपादन सरबजित निर्मल यांनी केले़
टॅग्स :NandedनांदेडRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिर