शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

रोजगारासाठी शेतकरी, शेतमजुरांचा कल परराज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:14 IST

कर्जबाजारी वाढत असल्याने हाताला काम मिळण्याच्या उद्देशाने राज्यात किंवा शहराकडे तरुणांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जबाजारीपणात ...

कर्जबाजारी वाढत असल्याने हाताला काम मिळण्याच्या उद्देशाने राज्यात किंवा शहराकडे तरुणांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जबाजारीपणात वाढ, कोरोनामुळे संसार कामधंदे सर्वांचीच घडी विस्कटली. कोरोना या संकटामुळे अनेकांना गावाकडे परत यावे लागले. यंदा शेतीने साथ दिली नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले पाहावयास मिळत आहे. शेतीवर भरमसाठ खर्च मात्र उत्पन्न अत्यल्प आले. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या हातालाही काम मिळत नाही. किनवट तालुक्यात मोठे उद्योगधंदे नसल्याने मजुरांच्या हाताला कामे नाहीत. घरी शेती आहे पण शेतीला पाणी नाही. सिंचनाचे कोणतेही साधन नसल्याने कोरोनाच्या काळात कामधंदा गेला. घरी बसण्याची वेळ आली. त्यामुळे कर्जबाजारी झाली. या वर्षी शेतीत पाहिजे असे काम नसल्याने कामे कमी खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने कोरोनाच्या भीतीमुळे अनेकजण गावाकडे परतले आहेत. पण आता काम मिळेल की नाही याची खात्री नसल्याने गावांमध्ये रोजगाराचे कुठलेही साधन नसल्याने शहराकडे किंवा तेलंगणात गेल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. यावर्षी शेतीचे उत्पन्न मिळाले नाही. इकडून तिकडून उसनवारी घेऊन शेतीत घातलेले जे खर्च झाले तेही मिळाले नाही. पोटापाण्यासाठी कामधंदा केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे बसस्टँडवर गर्दी पहावयास मिळत आहे.