शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

तेलंगणा समावेशाचे लोण आता किनवटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:40 IST

धर्माबाद तालुक्यातील ३२ गावांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केल्यानंतर खळबळ उडाली होती़ त्यानंतर हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यांतीलही काही गावांनी अशीच मागणी केली होती़ त्यात आता हे लोण किनवट तालुक्यातही पोहोचले आहे़ किनवटच्या अप्पारावपेठच्या ग्रामस्थांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केली आहे़ त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे़

ठळक मुद्देअप्पारावपेठच्या ग्रामस्थांचीही मागणी, अर्धा कि.मी. अंतरावर तेलंगणा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : धर्माबाद तालुक्यातील ३२ गावांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केल्यानंतर खळबळ उडाली होती़ त्यानंतर हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यांतीलही काही गावांनी अशीच मागणी केली होती़ त्यात आता हे लोण किनवट तालुक्यातही पोहोचले आहे़ किनवटच्या अप्पारावपेठच्या ग्रामस्थांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केली आहे़ त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे़धर्माबाद तालुक्याने तेलंगणा समावेशाची मागणी केल्यानंतर प्रशासन आणि राज्यकर्त्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती़ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मागणीची दखल घेत सरपंच संघटनेला चर्चेसाठी ‘मातोश्री’वर बोलावले होते़त्यानंतर पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात धर्माबादच्या मागण्यांवर बैठक घेण्यात आली़ त्यानंतर धर्माबादसाठी ४० कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले़ त्यात बिलोली आणि हिमायतनगर तालुक्यांतील अनेक गावांनी तशाच प्रकारची मागणी केली़ त्यामध्ये आता किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ या गावाची भर पडली आहे़ अप्पारावपेठ ग्रामपंचायतने जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून गावाचा तेलंगणात समावेश करण्याची मागणी केली आहे़अप्पारावपेठ हे गाव महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर आहे़ महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी हे गाव तेलंगणातील बोथ तालुक्यात होते़ अप्पारावपेठ येथील बहुतांश नागरिक तेलगू भाषिक आहेत़ ग्रामस्थांचे व्यवहारही तेलंगणाशी आहेत़ किनवटपासून ७५ किमी अंतरावर असल्यामुळे फक्त शासकीय कामासाठीच ग्रामस्थांना किनवटला यावे लागते़ तर जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी सव्वाशे किमीचे अंतर पार करावे लागते़ गावात कुठल्याच सोयीसुविधा नाहीत़ अधिकारीही फिरकत नाहीत़पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या या गावापासून अर्धा किलोमीटरवर तेलंगणा आहे़ त्यामुळे अप्पारावपेठचा तेलंगणात समावेश केल्यास या गावचा विकास होईल असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ याबाबत सरपंच सुनीता लोकावार, तंटामुक्तीचे अध्यक्ष विनायक देशमुख, जि़प़सदस्य सूर्यकांत आरडकर, अ‍ॅड़एक़ामारेड्डी, भोजारेड्डी नुतूल, भुमेश किनी, प्रभाकररेड्डी, फारुख शेख, शेख अजीम यांच्यासह जवळपास दोनशे नागरिकांच्या स्वाक्षºयांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे़

टॅग्स :NandedनांदेडTelanganaतेलंगणाNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड