शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

तेलंगणा समावेशाचे लोण आता किनवटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:40 IST

धर्माबाद तालुक्यातील ३२ गावांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केल्यानंतर खळबळ उडाली होती़ त्यानंतर हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यांतीलही काही गावांनी अशीच मागणी केली होती़ त्यात आता हे लोण किनवट तालुक्यातही पोहोचले आहे़ किनवटच्या अप्पारावपेठच्या ग्रामस्थांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केली आहे़ त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे़

ठळक मुद्देअप्पारावपेठच्या ग्रामस्थांचीही मागणी, अर्धा कि.मी. अंतरावर तेलंगणा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : धर्माबाद तालुक्यातील ३२ गावांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केल्यानंतर खळबळ उडाली होती़ त्यानंतर हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यांतीलही काही गावांनी अशीच मागणी केली होती़ त्यात आता हे लोण किनवट तालुक्यातही पोहोचले आहे़ किनवटच्या अप्पारावपेठच्या ग्रामस्थांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केली आहे़ त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे़धर्माबाद तालुक्याने तेलंगणा समावेशाची मागणी केल्यानंतर प्रशासन आणि राज्यकर्त्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती़ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मागणीची दखल घेत सरपंच संघटनेला चर्चेसाठी ‘मातोश्री’वर बोलावले होते़त्यानंतर पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात धर्माबादच्या मागण्यांवर बैठक घेण्यात आली़ त्यानंतर धर्माबादसाठी ४० कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले़ त्यात बिलोली आणि हिमायतनगर तालुक्यांतील अनेक गावांनी तशाच प्रकारची मागणी केली़ त्यामध्ये आता किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ या गावाची भर पडली आहे़ अप्पारावपेठ ग्रामपंचायतने जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून गावाचा तेलंगणात समावेश करण्याची मागणी केली आहे़अप्पारावपेठ हे गाव महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर आहे़ महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी हे गाव तेलंगणातील बोथ तालुक्यात होते़ अप्पारावपेठ येथील बहुतांश नागरिक तेलगू भाषिक आहेत़ ग्रामस्थांचे व्यवहारही तेलंगणाशी आहेत़ किनवटपासून ७५ किमी अंतरावर असल्यामुळे फक्त शासकीय कामासाठीच ग्रामस्थांना किनवटला यावे लागते़ तर जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी सव्वाशे किमीचे अंतर पार करावे लागते़ गावात कुठल्याच सोयीसुविधा नाहीत़ अधिकारीही फिरकत नाहीत़पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या या गावापासून अर्धा किलोमीटरवर तेलंगणा आहे़ त्यामुळे अप्पारावपेठचा तेलंगणात समावेश केल्यास या गावचा विकास होईल असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ याबाबत सरपंच सुनीता लोकावार, तंटामुक्तीचे अध्यक्ष विनायक देशमुख, जि़प़सदस्य सूर्यकांत आरडकर, अ‍ॅड़एक़ामारेड्डी, भोजारेड्डी नुतूल, भुमेश किनी, प्रभाकररेड्डी, फारुख शेख, शेख अजीम यांच्यासह जवळपास दोनशे नागरिकांच्या स्वाक्षºयांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे़

टॅग्स :NandedनांदेडTelanganaतेलंगणाNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड