शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST

पूल ढासळल्याने वाहतूक बंद इस्लापूर - अप्पारावपेठ जाणाऱ्या मार्गावरील पूल ढासळल्याने या भागातील तीनचाकी, चारचाकी वाहतूक बंद झाली आहे. ...

पूल ढासळल्याने वाहतूक बंद

इस्लापूर - अप्पारावपेठ जाणाऱ्या मार्गावरील पूल ढासळल्याने या भागातील तीनचाकी, चारचाकी वाहतूक बंद झाली आहे. या पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. १२ जुलै रोजी अप्पारावपेठ, गोंडजेवली परिसरात मुसळधार पाऊस पडला. पावसाने नाल्याला पूर येऊन गोंडजेवली वननाक्याजवळील अप्पारावपेठजवळील पूल ढासळला.

विदेशी दारूची विक्री

बिलोली - सगरोळी येथे गेल्या अनेक महिन्यांपासून बनावट विदेशी दारूची विक्री होत असल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शेजारील तेलंगणा येथील दारू सगरोळीत आणून विक्री केली जात आहे. काही बीअर शॉपीमधून दारूची बिनधास्त विक्री केली जात आहे.

अपघाताची शक्यता

नायगाव - तालुक्यातील गोदमगाव, हिप्परगा, कृष्णूर, बरबडा, वजिरगाव, टाकळी या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून चालू-बंद अवस्थेत आहे. अर्धवट कामामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे कृष्णूर येथे पूर आला होता. त्यामुळे ये-जा करताना एक कार त्या नाल्यात अडकून पडली. सुदैवाने कारमधील प्रवासी सुखरूप होते.

पिके डोलू लागली

धर्माबाद - तालुक्यातील जारीकोट व परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे खरिपाची पिके डोलत आहेत. परिसरातील सायखेड, चोंडी, दिग्रस, रोशनगाव, चिकना, पाटोदा, मंगनाळी, चोळाखा, बेलगुजरी, आरेगाव, पिंपळगाव, सालेगाव, कारेगाव, आटाळा, यल्लापूर या परिसरात सर्वदूर पाऊस पडला आहे. पावसाने पिकांना जीवदान मिळाले.

खडकूत येथे वृक्ष लागवड

नांदेड - संत जगदीश बाबाजी महाराज गोशाळा खडकूत तसेच शंकर नागरी सहकारी बँक लि. व वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने १२ जुलै रोजी खडकूत गोशाळेत वृक्ष लागवड करण्यात आली. याशिवाय आरोग्य शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमास संत जगदीश बाबाजी, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, तहसीलदार किरण अंबेकर आदी उपस्थित होते.

युनानी डॉक्टरांची पदे भरा

माहूर - येथील ग्रामीण रुग्णालयात युनानी डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. युनानी वैद्यकीय अधिकारी पद गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रिक्त असल्याने नागरिकांना युनानी सेवेपासून वंचित रहावे लागत आहे असे जिल्हाध्यक्ष रवी राठोड, तालुकाध्यक्ष विनोद सूृर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष शेख आसिफ, विद्यार्थी तालुकाध्यक्ष गजानन कुलकर्णी यांनी नमूद केले.