शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी गावात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:17 IST

बारुळ : कंधार तालुक्यातील बारूळ मंडळातील काटकळंबा व राऊत खेडा दोन सजाचा कारभार, सहा गावाचा ...

बारुळ : कंधार तालुक्यातील बारूळ मंडळातील काटकळंबा व राऊत खेडा दोन सजाचा कारभार, सहा गावाचा कारभार एक तलाठी सांभाळत असून त्यामुळे संबंधित तलाठी एवढी गावे दिल्यामुळे इतर गावातली शेतकऱ्याचे कामे होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे या मंडळातील कारभारावर वरिष्ठांचेही लक्ष नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत.

बारूळ मंडळात सहा सज्जा असून यामध्ये बारूळ, काटकळंबा, राऊत खेडा, चिखली, कवठा, मंगल सांगवी. तलाठी मात्र पाचच आहेत तर गावे सतरा आहेत. यातील काटकळंबा व राऊत खेडा या तलाठ्याकडे सहा गावे तर काही तलाठ्यांना तीन व दोन गावे आहेत. यातील काही तलाठ्यांच्या शेतकऱ्यांची कामे होत नसल्यामुळे गावातील नागरिकांनी बदलीसाठी ग्रामसभेतून तक्रारी करूनही बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना अभय कुणाचे आहे हा प्रश्नही शेतकरी वर्गात पडला आहे. येथील संबंधित मंडळ अधिकारीही मंडळाकडे फिरकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही संबंधित अधिकाऱ्यांना अडचणी सांगाव्यात कशा हा प्रश्न पडत आहे.

बारूळ मंडळातील तलाठ्याच्या अतिरिक्त गावामुळे तर काही तलाठी शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नसल्यामुळे शेतीची व विविध प्रमाणपत्राची कामे खोळंबली आहेत. तसेच अवैध खोदकाम हे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच्यावर नियंत्रणही नाही. या उस्माननगर परिसरातून वाळू घाटकडून दररोज वाळू चोरी वाहने येत आहेत. वाळू माफिया व फलाटाच्या सहकार्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाळू चोरी जात असल्याचे बिनधास्तपणे दिसत आहेत. तसेच महसूल वसुलीचे प्रमाणही कमी आहे. निवडणुकीच्या काळातील तलाठ्यांनी संबंधित राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून साटेलोटे करून सोईस्कर वार्ड व मतदार याद्या तयार केल्या. मतदारांत व नागरिकांतही प्रचंड नाराजी याबाबत असूनही याकडे मात्र अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी यावर नियंत्रण करावे अशी मागणी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मनोहर पाटील चिखलीकर यांनी केली आहे.