शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

तलाठी गावात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:17 IST

बारुळ : कंधार तालुक्यातील बारूळ मंडळातील काटकळंबा व राऊत खेडा दोन सजाचा कारभार, सहा गावाचा ...

बारुळ : कंधार तालुक्यातील बारूळ मंडळातील काटकळंबा व राऊत खेडा दोन सजाचा कारभार, सहा गावाचा कारभार एक तलाठी सांभाळत असून त्यामुळे संबंधित तलाठी एवढी गावे दिल्यामुळे इतर गावातली शेतकऱ्याचे कामे होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे या मंडळातील कारभारावर वरिष्ठांचेही लक्ष नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत.

बारूळ मंडळात सहा सज्जा असून यामध्ये बारूळ, काटकळंबा, राऊत खेडा, चिखली, कवठा, मंगल सांगवी. तलाठी मात्र पाचच आहेत तर गावे सतरा आहेत. यातील काटकळंबा व राऊत खेडा या तलाठ्याकडे सहा गावे तर काही तलाठ्यांना तीन व दोन गावे आहेत. यातील काही तलाठ्यांच्या शेतकऱ्यांची कामे होत नसल्यामुळे गावातील नागरिकांनी बदलीसाठी ग्रामसभेतून तक्रारी करूनही बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना अभय कुणाचे आहे हा प्रश्नही शेतकरी वर्गात पडला आहे. येथील संबंधित मंडळ अधिकारीही मंडळाकडे फिरकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही संबंधित अधिकाऱ्यांना अडचणी सांगाव्यात कशा हा प्रश्न पडत आहे.

बारूळ मंडळातील तलाठ्याच्या अतिरिक्त गावामुळे तर काही तलाठी शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नसल्यामुळे शेतीची व विविध प्रमाणपत्राची कामे खोळंबली आहेत. तसेच अवैध खोदकाम हे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच्यावर नियंत्रणही नाही. या उस्माननगर परिसरातून वाळू घाटकडून दररोज वाळू चोरी वाहने येत आहेत. वाळू माफिया व फलाटाच्या सहकार्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाळू चोरी जात असल्याचे बिनधास्तपणे दिसत आहेत. तसेच महसूल वसुलीचे प्रमाणही कमी आहे. निवडणुकीच्या काळातील तलाठ्यांनी संबंधित राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून साटेलोटे करून सोईस्कर वार्ड व मतदार याद्या तयार केल्या. मतदारांत व नागरिकांतही प्रचंड नाराजी याबाबत असूनही याकडे मात्र अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी यावर नियंत्रण करावे अशी मागणी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मनोहर पाटील चिखलीकर यांनी केली आहे.