शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

भाजपाकडून मतासाठी प्रतीकांचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:04 IST

निवडणुकीच्या तोंडावर इंदू मिल येथे उभारण्यात येणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्टÑीय स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले़ त्याला दोन वर्षे उलटली आहेत़, परंतु अद्यापही प्रत्यक्ष काम सुरु झाले नाही़ देशातील दलित मते मिळविण्यासाठी भाजपाकडून प्रतिकांचे राजकारण केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी येथे पत्रपरिषदेत केला़

ठळक मुद्देकाँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा आरोप

नांदेड: निवडणुकीच्या तोंडावर इंदू मिल येथे उभारण्यात येणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्टÑीय स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले़ त्याला दोन वर्षे उलटली आहेत़, परंतु अद्यापही प्रत्यक्ष काम सुरु झाले नाही़ देशातील दलित मते मिळविण्यासाठी भाजपाकडून प्रतिकांचे राजकारण केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी येथे पत्रपरिषदेत केला़राज्य आणि देशातील दलितांच्या मतांवर भाजपचा डोळा आहे़ त्यामुळे इंदू मिलचे घाईघाईने भूमिपूजन करण्यात आले़, परंतु भाजपचे असे वागणे आता सर्वांच्या लक्षात आले़ इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाचे काम त्वरित सुरु न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशाराही वाघमारे यांनी दिला़नांदेड जिल्ह्यावर काँग्रसचे वर्चस्व  अबाधित आहे. जिल्ह्यातील बहुतांश संस्था, समित्यांवर काँग्रेसचीच सत्ता आहे. येत्या महापालिका निवडणुकीत सध्यातरी काँग्रेसमोर कुठलाही सशक्त प्रतिस्पर्धी नसल्याने महापालिकेत काँग्रेस बहुमताने निवडून येईल, असा विश्वासही वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला आ. डी. पी.सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.फडणवीस हुकूमशहामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुकूमशहा आहेत़ कल्याण-डोंबिवलीची निवडणूक सुरु असताना, आचारसंहितेचा भंग करीत त्यांनी  साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते़ या निवडणुकीला दोन वर्षे लोटली आहेत, परंतु अद्याप छदामही कल्याण-डोंबिवलीला मिळाला नाही़ केवळ खोटी आश्वासने द्यायची, स्वप्ने दाखवायची अन् सत्ता मिळवायची, असा कार्यक्रम भाजपकडून राबविला जात आहे, असा आरोप वाघमारे यांनी केला.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस