शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कार्यकाळ संपल्यानंतर देखील पदावर कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:33 IST

देगलूर - कृषी पणन संचालकांच्या पॅनल सचिव निवड यादीद्वारे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदावर तीन वर्षासाठी ...

देगलूर - कृषी पणन संचालकांच्या पॅनल सचिव निवड यादीद्वारे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदावर तीन वर्षासाठी नियुक्त असलेल्या सतीश मेरगेवार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आणि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील याबाबत निर्णय दिल्यानंतर संचालक मंडळाची दिशाभूल करून अद्याप पदावर कार्यरत असल्याचे समोर आले. बाजार समिती कर्मचाऱ्यांना कोणतीही जबाबदारी न देता संपूर्ण कारभार केंद्रित केल्याचा अहवाल काही दिवसांपूर्वीच तत्कालीन प्रशासकाने दिला होता. आता सर्व कर्मचाऱ्यांनी सतीश मेरगेवार यांच्या विरोधात दंड थाेपटले आहेत. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करण्यात येऊन मेरगेवार यांना तातडीने सेवामुक्त करण्याची मागणी केली आहे.

देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक अमोल यादव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले व चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

राज्यातील विविध बाजार समितीच्या सचिव पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी कृषी पणन मंडळाकडून पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली होती. बाजार समिती संचालक मंडळास तीन वर्षे कालावधीसाठी नियुक्त करण्यास सुचविण्यात आले. प्रारंभीच्या काळात पॅनल सचिव यादीतील नियुक्ती प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्यानंतर कृषी पणन संचालकांनी नियुक्तीची प्रक्रिया तातडीने थांबवावी असे बाजार समिती संचालक मंडळास कळविले होते. निवड यादीत अग्रक्रम असलेल्या यशवंत भोसले या उमेदवारास देगलूर बाजार समितीत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु कृषी पणन संचालकांचा नियुक्ती थांबवा असे परिपत्रक आल्यानंतर मेरगेवार यांनी मागील दिनांकात नियुक्ती मिळवून फेब्रुवारी २०१३ मध्ये अनुकूल ठराव देखील मंजूर करून घेतला. २०१५ मध्ये ‘ तीन वर्षाच्या कालावधीसाठी’ हे शब्द चुकीचे पडले अशी माहिती संचालक मंडळास देऊन नियमित पदाचा ठराव देखील मंजूर करून घेतला. यासंदर्भात मेरगेवार यांनी आपली नियुक्ती नियमित व्हावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने नियुक्तीचा कार्यकाळ तीन वर्षासाठी होता असा निर्णय देत प्रकरण निकाली काढले. न्यायालयाच्या या निर्णयाचा मेरगेवार यांनी संचालक मंडळास बराच काळ थांगपत्ता लागू न देता त्यांना अंधारात ठेवले.

न्यायालयाचा आदेशाचा अवमान, संचालक मंडळाची दिशाभूल करीत सतीश मेरगेवार हे नियमबाह्यपणे बाजार समितीच्या सचिव पदावर कार्यरत असल्याचे सर्व कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांना तातडीने सेवामुक्त करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे मागणी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली.