शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

राज्य सरकारकडून विकासात भेदभाव अपेक्षित नाही - खासदार अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 17:24 IST

महापालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या बाजुने कौल दिला़ जनमताचा हा कौल स्वीकारत विकास कामासाठी राज्य सरकारने भेदभाव न करता मदत करणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्दे विकासाच्या प्रश्नावर शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणारकाँग्रेसने निवडणुकीत घोषित केलेल्या जाहीरनाम्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नांदेड : महापालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या बाजुने कौल दिला़ जनमताचा हा कौल स्वीकारत विकास कामासाठी राज्य सरकारने भेदभाव न करता मदत करणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली. विकासाच्या प्रश्नावर आपण लवकरच शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे  त्यांनी स्पष्ट केले. 

नांदेडच्या मनपाच्या महापौरपदाच्या निवडणुकीत  बुधवारी काँग्रेसच्या शीला भवरे या महापौर पदी तर विनय गिरडे हे उपमहापौर पदी निवडून आले. एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने ७४ मते घेतली तर भाजपाला ६ मते मिळाली. त्यानंतर महापौर आणि उपमहापौरांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खा. चव्हाण यांनी शहरातील प्रमुख प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्यात येईल, असे सांगितले. त्याचवेळी काँग्रेसने निवडणुकीत घोषित केलेल्या जाहीरनाम्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इतकेच नव्हे तर आता प्रभागनिहाय समस्या जाणून घेत त्या सोडविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरात कच-याचा प्रश्न गंभीर आहे. गोदावरी नदी प्रदुषणाबाबतही मनपा लक्ष घालणार आहे. त्याचवेळी महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड महापालिकेला राज्य शासनाकडून मिळणा-या सहकार्याबाबत त्यांनी सरकारकडून सकारात्मक भूमिका अपेक्षित असल्याचे सांगितले. निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपआपली भूमिका मांडत असतो. निवडणुकीनंतर मात्र जनतेचा कौल स्वीकारुन विकासासाठी शासनाने सर्वसमावेशक भूमिका घेणे आवश्यक आहे. विकासाच्या विषयावर भेदभाव केला जाऊ नये. आपण मुख्यमंत्री असताना विकासाच्या विषयात भेदभाव केला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.  इतकेच नव्हे तर नांदेडच्या विकास कामासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळासह आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही  खा. चव्हाण यांनी सांगितले. नांदेड महापालिकेला राज्य सरकारकडून मागील तीन वर्षापासून कोणताही निधी दिला गेला नाही़ उलट महापालिकेचे अनेक प्रकल्प निधीअभावी बंद पडले आहेत़ याबाबत विचारले असता महापालिकेकडून या संदर्भातील अहवाल घेवून चर्चा केली जाईल असेही खा. चव्हाण यांनी स्पष्ट केले.