शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

नांदेड जिल्ह्यात वाळू लिलाव प्रक्रियेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:12 IST

वाळू उपशामुळे पर्यावरणाच्या हानीचा विचार न करता आणि पर्यावरणीय व्यवस्थापन योजना न राबविता सुरु असलेल्या वाळू लिलाव प्रक्रियेला नागपूर खंडपीठाच्या आदेशाने स्थगिती देण्यात आली होती. जिल्ह्यात पर्यावरणाची हानी आणि पर्यावरण व्यवस्थापन योजना समितीच्या बैठका झाल्यानंतर लिलाव प्रक्रिया पुन्हा सोमवारपासून सुरु होण्याची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देनागपूर खंडपीठाच्या आदेशाने थांबली होती लिलाव प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: वाळू उपशामुळे पर्यावरणाच्या हानीचा विचार न करता आणि पर्यावरणीय व्यवस्थापन योजना न राबविता सुरु असलेल्या वाळू लिलाव प्रक्रियेला नागपूर खंडपीठाच्या आदेशाने स्थगिती देण्यात आली होती. जिल्ह्यात पर्यावरणाची हानी आणि पर्यावरण व्यवस्थापन योजना समितीच्या बैठका झाल्यानंतर लिलाव प्रक्रिया पुन्हा सोमवारपासून सुरु होण्याची अपेक्षा आहे.संपूर्ण राज्यभरात पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष करुन वाळू लिलाव प्रक्रिया सुरु असल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत संपूर्ण राज्यभरात वाळू लिलाव प्रक्रियेला नागपूर खंडपीठाने ३ जानेवारी २०१८ रोजी स्थगिती दिली होती. त्यानंतर पर्यावरणाची हानी तसेच पर्यावरण व्यवस्थापन योजनांच्या पूर्ततेनंतर वाळू लिलाव प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ज्या-ज्या जिल्ह्यांत पर्यावरण रक्षणासंबंधी उपाययोजना करण्यात आल्या तेथे वाळू लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.नांदेडमध्येही पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन समिती आणि पर्यावरण व्यवस्थापन योजना समितीच्या बैठका घेण्यात आल्या. २४ जानेवारी रोजी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाळू उपशामुळे होणाºया पर्यावरणीय हानीवर चर्चा करण्यात आली. तसेच उपाययोजनाबाबतही आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या समित्यांच्या बैठकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात वाळूघाटांचा लिलाव प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २९ वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या २९ घाटांतून जिल्हा प्रशासनाला १७ कोटी ६५ लाख ७४ हजार ७१० रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. दुसºया टप्प्यातील ५७ वाळूघाटांची प्रक्रिया नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने थांबविली होती. ३ जानेवारीपर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत होती. ही मुदत संपल्यानंतर आता पुढील लिलाव प्रक्रियेत वाळूघाटांचा ई-लिलाव होणे अपेक्षित आहे.जिल्ह्यात वाळू घाटांच्या पहिल्या टप्प्यातील लिलाव प्रक्रियेदरम्यान गुप्त माहिती ठेकेदारांपर्यंत गौणखनिज अधिकाºयांकडूनच पोहोचली होती़ त्यामुळे ती प्रक्रिया रद्द करुन नव्याने लिलाव प्रक्रिया करण्यात आली होती़ दुसरीकडे लिलाव प्रक्रिया झाली नसतानाही जिल्ह्यात अनेक घाटांवरून बिनदिक्कतपणे रात्रंदिवस वाळू उपसा सुरूच आहे़ वाळू माफियांवर आळा घालण्यात प्रशासन अपयशीच ठरत आहे़