शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

नांदेड जिल्ह्यात वाळू लिलाव प्रक्रियेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:12 IST

वाळू उपशामुळे पर्यावरणाच्या हानीचा विचार न करता आणि पर्यावरणीय व्यवस्थापन योजना न राबविता सुरु असलेल्या वाळू लिलाव प्रक्रियेला नागपूर खंडपीठाच्या आदेशाने स्थगिती देण्यात आली होती. जिल्ह्यात पर्यावरणाची हानी आणि पर्यावरण व्यवस्थापन योजना समितीच्या बैठका झाल्यानंतर लिलाव प्रक्रिया पुन्हा सोमवारपासून सुरु होण्याची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देनागपूर खंडपीठाच्या आदेशाने थांबली होती लिलाव प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: वाळू उपशामुळे पर्यावरणाच्या हानीचा विचार न करता आणि पर्यावरणीय व्यवस्थापन योजना न राबविता सुरु असलेल्या वाळू लिलाव प्रक्रियेला नागपूर खंडपीठाच्या आदेशाने स्थगिती देण्यात आली होती. जिल्ह्यात पर्यावरणाची हानी आणि पर्यावरण व्यवस्थापन योजना समितीच्या बैठका झाल्यानंतर लिलाव प्रक्रिया पुन्हा सोमवारपासून सुरु होण्याची अपेक्षा आहे.संपूर्ण राज्यभरात पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष करुन वाळू लिलाव प्रक्रिया सुरु असल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत संपूर्ण राज्यभरात वाळू लिलाव प्रक्रियेला नागपूर खंडपीठाने ३ जानेवारी २०१८ रोजी स्थगिती दिली होती. त्यानंतर पर्यावरणाची हानी तसेच पर्यावरण व्यवस्थापन योजनांच्या पूर्ततेनंतर वाळू लिलाव प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ज्या-ज्या जिल्ह्यांत पर्यावरण रक्षणासंबंधी उपाययोजना करण्यात आल्या तेथे वाळू लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.नांदेडमध्येही पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन समिती आणि पर्यावरण व्यवस्थापन योजना समितीच्या बैठका घेण्यात आल्या. २४ जानेवारी रोजी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाळू उपशामुळे होणाºया पर्यावरणीय हानीवर चर्चा करण्यात आली. तसेच उपाययोजनाबाबतही आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या समित्यांच्या बैठकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात वाळूघाटांचा लिलाव प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २९ वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या २९ घाटांतून जिल्हा प्रशासनाला १७ कोटी ६५ लाख ७४ हजार ७१० रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. दुसºया टप्प्यातील ५७ वाळूघाटांची प्रक्रिया नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने थांबविली होती. ३ जानेवारीपर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत होती. ही मुदत संपल्यानंतर आता पुढील लिलाव प्रक्रियेत वाळूघाटांचा ई-लिलाव होणे अपेक्षित आहे.जिल्ह्यात वाळू घाटांच्या पहिल्या टप्प्यातील लिलाव प्रक्रियेदरम्यान गुप्त माहिती ठेकेदारांपर्यंत गौणखनिज अधिकाºयांकडूनच पोहोचली होती़ त्यामुळे ती प्रक्रिया रद्द करुन नव्याने लिलाव प्रक्रिया करण्यात आली होती़ दुसरीकडे लिलाव प्रक्रिया झाली नसतानाही जिल्ह्यात अनेक घाटांवरून बिनदिक्कतपणे रात्रंदिवस वाळू उपसा सुरूच आहे़ वाळू माफियांवर आळा घालण्यात प्रशासन अपयशीच ठरत आहे़