शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

बोलाचाच भात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन सातत्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना करीत आहेत. मात्र त्यानंतरही या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. शेतक-यांसाठी राबविण्यात येणा-या अनुदानावरील विहिरीबाबत उमरी तालुक्यात अशीच परिस्थिती आहे. या योजनेतून अवघे ३५ शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देप्रचार, प्रसिद्धीचा अभाव : विहिरीसाठी ३५ शेतकरीच पात्र

बी.व्ही. चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन सातत्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना करीत आहेत. मात्र त्यानंतरही या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. शेतक-यांसाठी राबविण्यात येणा-या अनुदानावरील विहिरीबाबत उमरी तालुक्यात अशीच परिस्थिती आहे. या योजनेतून अवघे ३५ शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत.राज्य शासनाच्या वतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन ही शेतक-यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना राबविली जाते. सिंचनाचे नियोजित उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूने ही योजना महत्त्वपूर्ण आहे. मात्र योजनेसाठी घातलेल्या अटी आणि योजनेचा प्रसार, प्रचार योग्य पद्धतीने न झाल्याने ही योजना प्रत्यक्ष कागदावरच असल्याचे उमरीसह अनेक ठिकाणी चित्र आहे.अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील कमीत कमी एक एकर जमीन असणा-या शेतक-यांसाठी ही स्वावलंबन योजना आहे़ विहिरीसाठी २़५ लाख रुपये, वीजजोडणीसाठी १० हजारांपर्यंत शासनातर्फे व विद्युत मोटारीसाठी २५ हजारापर्यंत अनुदान असे योजनेचे स्वरूप आहे़ मागासवर्गातील शेतकरी सुद्धा आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने मेहनत करून उत्पन्न काढू शकतो़ असे असले तरी एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास शासनाच्या जाचक अटीला सामान्य माणूस कंटाळतो़ या योजनेचेही असेच झाल्याने उमरी तालुक्यात सदर योजनेसाठी शेतकºयांचा फारच कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत आहे़ सबंध उमरी तालुक्यात अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या २० हजार ३५४ तर अनुसूचित जमाती प्रवर्गाची ९ हजार ४३२ एवढी लोकसंख्या आहे़ दोन्ही मिळून ३० हजारांच्या जवळपास लोकसंख्या असताना त्या प्रमाणात योजनेच्या लाभासाठी शेतकरी पुढे आले नाहीत़ या योजनेसाठी ५२ शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज भरले़ कागदपत्रांची अपुरी पूर्तता, त्रुटी आदी कारणांमुळे १७ लोकांचे अर्ज रद्द ठरले तर ३५ अर्ज स्वीकारण्यात आले़ पात्र लाभार्थीमध्ये गोळेगाव, तळेगाव, हस्सा, कावलगुडा बु़, सोमठाणा, बितनाळ, सावरगाव, कळगाव, बोथी, तुराटी, बोळसा खु़, गोरठा, हातणी आदी गावांचा समावेश आहे़ चालू वर्षातील मंजूर ३५ पैकी १५ विहिरींचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे़ यातील ४ विहिरींना पाणी लागले असून इतर विहिरींचे खोलवर काम होताच पाणी लागण्याची अपेक्षा आहे़योजनेची माहिती प्रत्येक गावात ग्रा़पं़ मार्फत दिली जाते़ ३१ मार्च २०१८ पर्यंत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरींची सर्व कामे पूर्ण करणे आवश्यक असून त्यासाठी पं़स़ कडे निधी उपलब्ध आहे़ योजनेच्या लाभातून शेतक-यांना दुस-यांकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही व लाभार्थी सक्षम होणार आहे -शिरीषराव गोरठेकर,सभापती, पं़स़ उमरी़