शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

माती परीक्षणामुळे खताचा अनावश्यक खर्च होतो कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:15 IST

नांदेड : शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून घेत खताची मात्रा दिल्यास खतावरील अनावश्यक खर्च टाळता येतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी ...

नांदेड : शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून घेत खताची मात्रा दिल्यास खतावरील अनावश्यक खर्च टाळता येतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून पिकांना आवश्यकतेनुसार खताची मात्रा द्यावी व अतिरिक्त खर्च टाळावा, असे आवाहन राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्रातर्फे करण्यात आले आहे. नत्र, स्फुरद, पालाश हे मुख्य अन्नघटक यासोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांची तर लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, मॉलीब्देनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांची आपल्या जमिनीत किती कमतरता आहे, याची माहिती माती परीक्षण केल्यानंतरच समजते. खताच्या असमतोल वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. जमिनीची सुपिकता कमी होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादकतेत घट येत व वारेमाप खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. माती नमुने गोळा केल्यानंतर ते तपासून त्याचा योग्य ते अहवाल शेतकऱ्यांना माती परीक्षण केंद्राकडून आरोग्य कार्डमार्फत देण्यात येईल. त्यावर आधारित खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत. पिकांना आरोग्य कार्डनुसार खतांच्या मात्रा द्याव्यात व आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे, यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रमाता जिजाऊ माती व पाणी परीक्षण केंद्रातर्फे केले आहे.