शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

साडेचार एकरात शेवग्याची लागवड

By admin | Updated: January 28, 2015 14:09 IST

बाजारातील वाढती मागणी लक्षात घेवून व शेतमालाला मिळत असलेला अल्प दर याचे चिंतन करुन पारंपरिक शेतीला फाटा देत राजेश गुंडले या शेतकर्‍याने साडेचार एकरात शेवग्याची लागवड केली.

रामेश्‍वर काकडे  /नांदेड बाजारातील वाढती मागणी लक्षात घेवून व शेतमालाला मिळत असलेला अल्प दर याचे चिंतन करुन पारंपरिक शेतीला फाटा देत राजेश गुंडले या शेतकर्‍याने साडेचार एकरात शेवग्याची लागवड केली. एकीकडे दुष्काळात हैराण झालेले शेतकरी पाहत असताना दुसरीकडे कमीत कमी पाण्यावर अधिक उत्पादनासाठी आधुनिक शेतीची कास धरणारे शेतकरीही परिसरात पहावयास मिळत आहेत. देळूब बुद्रुक (ता. अर्धापूर) येथील शेतकरी राजेश गुंडले यांच्याकडे २९ एकर बागायती शेती आहे. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही केळी, हळदी, सोयाबीन, कापसाचे पीक साथ देत नसल्याने त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निश्‍चय केला. त्यांनी साडेचार एकरात शेवग्याची लागवड केली असून उर्वरित शेतीमध्ये ऊस, हळद, केळी आहेत.  कमी पाण्यावर कमी खर्चात आणि कमी दिवसांत येणारे नगदी पीक म्हणून शेवगा ओळखला जातो. गुंडले यांनी १७ जुलै २0१४ रोजी शेवग्याची १0 बाय ४ या फुटावर लागवड केली.एका एकरात १0८९ झाडे लावली आहेत. शेवग्याचे बियाणे उस्मानाबाद येथून आणले. एका एकरात १ किलो बियाणे लागते. प्रति किलो २५00 रुपये असा दर आहे.  लागवड केल्यानंतर साडेपाच महिन्यांनी शेंगा लागण्यास सुरुवात झाली. सध्या एका झाडाला ६0 ते ७0 शेंगा लगडल्या आहेत. म्हणजेच ६ ते ७ किलो होतात. सदर शेंगा जून ते जुलैपर्यंत येतात.एकदा लागवड केल्यानंतर किमान १0 वर्षे झाडे लावण्याची गरज नाही. त्याची वेळोवेळी छाटणी करावी लागते. वर्षभरात किमान ७0 टन शेंगा निघत असल्याने २४ लाखांचे उत्पादन घेण्याचा मानस राजेश गुंडले यांनी 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केला.  सध्या बाजारात शेंगाला ५0 ते ५५ रुपये किलो दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात ७५ ते ८0 रुपये किलो विकल्या जातात. शेंगाची लांबी २ ते ३ फुटापर्यंत असून ११ शेंगा एक किलो बसतात. सध्या नांदेडच्या बाजारात विक्रीसाठी आणल्या जात असून यानंतर पुणे, मुंबई, नागपूर या शहरात विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याचे गुंडले यांनी सांगितले. शेवग्याची लागवड कापसासारखी टोन पद्धतीने केलेली आहे. त्यासाठी दर महिन्याला डीएपी, पोटॅश या खताची मात्रा प्रति झाडा १00 ग्रॅम तीन महिन्यांपर्यंत देण्यात आली. तर चौथ्या महिन्यांपासून प्रतिझाड ३00 ग्रॅम बहार घेईपर्यंत द्यावी लागते. १५ ते २0 दिवसाला फवारणी करावी लागते. यासाठी कमी पाणी लागत असून ८ ते १0 दिवसाला केवळ २ तास ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. सदर पानांची दर महिन्याला छाटणी करावी लागते. त्यामुळे झाडे उंच न वाढता त्याचा विस्तार होतो, वादळी वार्‍याचा त्यावर म्हणावा तेवढा परिणाम होत नाही.त्यामध्ये वेलवर्गीय टरबूज, टोमॅटो, काकडी, वांगी हे आंतरपिके घेता येत असल्याने त्यात येत्या काही दिवसांत टरबूज व टोमॅटोची लागवड करण्यात येणार असल्याचेही गुंडले म्हणाले. बियाणे खते आणि औषधाचा एकरी ५ हजार रुपये खर्च आल्याचेही त्यांनी सांगितले.