शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

थोडक्यात महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST

मरखेल : सततची नापिकी, अतिवृष्टी, मजुरांची कमतरता, मजुरीचे वाढते दर, खत, बी-बियाण्यांच्या दरात होणारी वाढ यामुळे शेतकरी ...

मरखेल : सततची नापिकी, अतिवृष्टी, मजुरांची कमतरता, मजुरीचे वाढते दर, खत, बी-बियाण्यांच्या दरात होणारी वाढ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, त्यात गतवर्षीपासून सुरु असलेल्या कोरोना संकटामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी यामुळे शेती म्हणजे ‘असून अडचण अन् नसून खोळंबा’, असा प्रकार झाला आहे. लहरी हवामानामुळे शेती ही बिनभरवशाची झाली असून, जगाचा पोशिंदा आज कर्जबाजारी झाला आहे. कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्याला उभारी देण्याची गरज आहे.

विकास कामे खोळंबली

माहूर : ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे सक्तीचे करावे, ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक प्रणाली पुन्हा सुरू करावी, अशी मागणी गोरसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. सध्या करोना, पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. ग्रामपातळीवर लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे व ग्रामीण भागातील जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने ग्रामसेवक या प्रशासनातील ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यावर असते; परंतु तालुक्यातील अनेक ग्रामसेवक मुख्यालयाला दांडी मारत आहेत. तालुकास्तरावरही ग्रामसेवक भेटत नाहीत, त्यांचे मोबाईलही बंद असतात.

व्यापाऱ्यांना फटका

देगलूर : लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. अनेक व्यापारी दुकान बंद करून बसले आहेत. अनेक दुकाने खासगी फायनान्स व सावकारी कर्ज काढून उभारण्यात आली. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेत आहेत. दुकाने चालू असतील तर सर्व व्यवहार सुरळीत होतात.

गोळ्या, औषधी भेट

किनवट : जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्राला बालाजी आलेवार यांच्याकडून गोळ्या व औषधी भेट देण्यात आल्या. आलेवार भाजपा तालुका सरचिटणीस आहेत. यापूर्वी त्यांनी इस्लापूर, शिवणी, अप्पारावपेठ या प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोरोना आजारावरील सहा हजार गोळ्या स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्या होत्या.

रस्त्याचे भूमिपूजन

फुलवळ : कंधारेवाडी ता. कंधार येथे पालकमंत्री पाणंद शेत रस्ताकामाचे भूमिपूजन मंडळ अधिकारी एस.आर. शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच शंकर डिगोळे, तलाठी गणेश गटकळ, ग्रामसेवक एम.एस.टेभुर्णे, भगवान कंधारे, नागोराव केंद्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.

देळूब रस्त्याचे डांबरीकरण होणार

पार्डी : देळूब-उमरी येथील वादग्रस्त रस्त्याचा प्रश्न तालुका प्रशासन, पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या समन्वयाने मिटला आहे. आता पूर्ण डांबरीकरणाचा रस्ता होणार असल्याने ५ गावांच्या रस्त्याचा कायमचा प्रश्न मिटला. याकामी तहसीलदार सुजीत नरहरे यांनी पाठपुरावा केला होता. मालेगाव-उमरी-देळूब-पार्डी (म) या नवीन रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाला. या रस्त्याचे काम सुरू झाले. एक वर्षापासून उमरी येथील दोन शेतकऱ्यांच्या वादात एक किलोमीटर रस्त्याचे काम संबंधित शेतकऱ्यांनी रोखले होते.

पांदण रस्त्याचे काम सुरू

उमरी : तालुक्यातील धानोरा बु. येथील साडेतीन किलोमीटर लांबीच्या पांदण रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. कामाच्या उद्घाटनप्रसंगी यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष सुधाकरराव देशमुख, आनंदराव सलगरे पाटील, सरपंच इरबा टोम्पे, उपसरपंच कैलासराव देशमुख, भगवानराव सर्जे, उपसभापती प्रतिनिधी दत्तराम पाटील मुंगल आदी उपस्थित होते.