शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

‘ती’ ७ गावे आता अर्धापूर तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:46 IST

हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरा तांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या लढ्याकरिता ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनाच्या विविध स्तरांवर लढाई लढण्यात आली होती़ या लढ्याला यश मिळाले असून या गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे़

ठळक मुद्देशासनाची अधिसूचना : अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला मिळाले यश

लोकमत न्यूज नेटवर्कअर्धापूर/पार्डी : हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरा तांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या लढ्याकरिता ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनाच्या विविध स्तरांवर लढाई लढण्यात आली होती़ या लढ्याला यश मिळाले असून या गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे़हदगाव तालुक्यातील वरील सात गावांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता ५५ ते ६० किलोमीटर अंतर पार करून जावे लागत होते़ यामुळे शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व निराधार यांची कामे वेळेवर होत नव्हती़ यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तर अर्धापूर तालुका या सात गावांपासून केवळ ६ ते ८ किलोमीटर अंतरावर असल्याने व सर्वच व्यवहार अर्धापूरलाच होत आहेत. यामुळे अर्धापूर तालुका निर्मितीपासून ही सात गावे अर्धापूर तालुक्यात समावेश करण्यासाठी सातत्याने संघर्ष समितीने लढा सुरु ठेवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले़ गावागावांत ग्रामपंचायतसमोरही उपोषणे झाली़ संघर्ष समितीने लढा अधिक तीव्र केल्याने तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे १२ फेब्रुवारी २०१४ ला संघर्ष समितीची बैठक घेऊन सदरील मागणी केली.या बैठकीस तत्कालीन पालकमंत्री डी़ पी़ सावंत, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर, तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार व संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. याबाबत शासनाने ३१ जुलै २०१८ ला अधिसूचना जारी केली आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, सचिव दिगंबर मोळके, उपाध्यक्ष राजेश बाजगिरे सल्लागार आनंद भंडारे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष गंगाधरराव पाटील चाभरेकर, माधवराव पाटील चाभरेकर, माजी सभापती दिलीपराव पाटील, नारायण संगेवार, माजी सरपंच संजय मोळके, संजय जाधव, प्रल्हाद काकडे, सरपंच रघुनाथ काकडे, रामेश्वर काकडे, भुजंगराव सीतापराव, अनिल मोळके, बालाजी पन्नासे, विश्वनाथ बिचेवार, बबनराव बोले, कल्याण मोळके, गणपत सोळंके, तारू, माजी सभापती श्रीमती पद्मावती घोरपडे, बंटी राठोड, बालासाहेब देशमुख, सदाशिवराव चाभरेकर, बाबूराव घुमनर, देवराव कांबळे, गोविंद भरकड, प्रकाश लांडगे, रमेश जाधव, शंकर जाधव आदींनी परिश्रम घेतले.---अर्धापूरच्या सीमेवर असलेल्या त्या सात गावाला हदगाव ५५ ते ६० कि़मी़ अंतरावर असल्याने शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागत होते़ त्यामुळे हदगाव तालुक्यातील ही सात गावे अर्धापूरला जोडावे, अशी मागणी होती़ ती पूर्ण झाल्याने आम्हाला आनंद होत आहे - राजेश बाजगिरे,सात गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष

टॅग्स :NandedनांदेडGovernmentसरकार