शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

‘ती’ ७ गावे आता अर्धापूर तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:46 IST

हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरा तांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या लढ्याकरिता ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनाच्या विविध स्तरांवर लढाई लढण्यात आली होती़ या लढ्याला यश मिळाले असून या गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे़

ठळक मुद्देशासनाची अधिसूचना : अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला मिळाले यश

लोकमत न्यूज नेटवर्कअर्धापूर/पार्डी : हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरा तांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या लढ्याकरिता ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनाच्या विविध स्तरांवर लढाई लढण्यात आली होती़ या लढ्याला यश मिळाले असून या गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे़हदगाव तालुक्यातील वरील सात गावांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता ५५ ते ६० किलोमीटर अंतर पार करून जावे लागत होते़ यामुळे शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व निराधार यांची कामे वेळेवर होत नव्हती़ यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तर अर्धापूर तालुका या सात गावांपासून केवळ ६ ते ८ किलोमीटर अंतरावर असल्याने व सर्वच व्यवहार अर्धापूरलाच होत आहेत. यामुळे अर्धापूर तालुका निर्मितीपासून ही सात गावे अर्धापूर तालुक्यात समावेश करण्यासाठी सातत्याने संघर्ष समितीने लढा सुरु ठेवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले़ गावागावांत ग्रामपंचायतसमोरही उपोषणे झाली़ संघर्ष समितीने लढा अधिक तीव्र केल्याने तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे १२ फेब्रुवारी २०१४ ला संघर्ष समितीची बैठक घेऊन सदरील मागणी केली.या बैठकीस तत्कालीन पालकमंत्री डी़ पी़ सावंत, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर, तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार व संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. याबाबत शासनाने ३१ जुलै २०१८ ला अधिसूचना जारी केली आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, सचिव दिगंबर मोळके, उपाध्यक्ष राजेश बाजगिरे सल्लागार आनंद भंडारे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष गंगाधरराव पाटील चाभरेकर, माधवराव पाटील चाभरेकर, माजी सभापती दिलीपराव पाटील, नारायण संगेवार, माजी सरपंच संजय मोळके, संजय जाधव, प्रल्हाद काकडे, सरपंच रघुनाथ काकडे, रामेश्वर काकडे, भुजंगराव सीतापराव, अनिल मोळके, बालाजी पन्नासे, विश्वनाथ बिचेवार, बबनराव बोले, कल्याण मोळके, गणपत सोळंके, तारू, माजी सभापती श्रीमती पद्मावती घोरपडे, बंटी राठोड, बालासाहेब देशमुख, सदाशिवराव चाभरेकर, बाबूराव घुमनर, देवराव कांबळे, गोविंद भरकड, प्रकाश लांडगे, रमेश जाधव, शंकर जाधव आदींनी परिश्रम घेतले.---अर्धापूरच्या सीमेवर असलेल्या त्या सात गावाला हदगाव ५५ ते ६० कि़मी़ अंतरावर असल्याने शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागत होते़ त्यामुळे हदगाव तालुक्यातील ही सात गावे अर्धापूरला जोडावे, अशी मागणी होती़ ती पूर्ण झाल्याने आम्हाला आनंद होत आहे - राजेश बाजगिरे,सात गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष

टॅग्स :NandedनांदेडGovernmentसरकार