शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ ७ गावे आता अर्धापूर तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:46 IST

हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरा तांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या लढ्याकरिता ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनाच्या विविध स्तरांवर लढाई लढण्यात आली होती़ या लढ्याला यश मिळाले असून या गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे़

ठळक मुद्देशासनाची अधिसूचना : अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला मिळाले यश

लोकमत न्यूज नेटवर्कअर्धापूर/पार्डी : हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरा तांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या लढ्याकरिता ‘सात गाव संघर्ष समिती’ स्थापन करून शासनाच्या विविध स्तरांवर लढाई लढण्यात आली होती़ या लढ्याला यश मिळाले असून या गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे़हदगाव तालुक्यातील वरील सात गावांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता ५५ ते ६० किलोमीटर अंतर पार करून जावे लागत होते़ यामुळे शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व निराधार यांची कामे वेळेवर होत नव्हती़ यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तर अर्धापूर तालुका या सात गावांपासून केवळ ६ ते ८ किलोमीटर अंतरावर असल्याने व सर्वच व्यवहार अर्धापूरलाच होत आहेत. यामुळे अर्धापूर तालुका निर्मितीपासून ही सात गावे अर्धापूर तालुक्यात समावेश करण्यासाठी सातत्याने संघर्ष समितीने लढा सुरु ठेवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले़ गावागावांत ग्रामपंचायतसमोरही उपोषणे झाली़ संघर्ष समितीने लढा अधिक तीव्र केल्याने तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे १२ फेब्रुवारी २०१४ ला संघर्ष समितीची बैठक घेऊन सदरील मागणी केली.या बैठकीस तत्कालीन पालकमंत्री डी़ पी़ सावंत, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर, तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार व संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. याबाबत शासनाने ३१ जुलै २०१८ ला अधिसूचना जारी केली आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, सचिव दिगंबर मोळके, उपाध्यक्ष राजेश बाजगिरे सल्लागार आनंद भंडारे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष गंगाधरराव पाटील चाभरेकर, माधवराव पाटील चाभरेकर, माजी सभापती दिलीपराव पाटील, नारायण संगेवार, माजी सरपंच संजय मोळके, संजय जाधव, प्रल्हाद काकडे, सरपंच रघुनाथ काकडे, रामेश्वर काकडे, भुजंगराव सीतापराव, अनिल मोळके, बालाजी पन्नासे, विश्वनाथ बिचेवार, बबनराव बोले, कल्याण मोळके, गणपत सोळंके, तारू, माजी सभापती श्रीमती पद्मावती घोरपडे, बंटी राठोड, बालासाहेब देशमुख, सदाशिवराव चाभरेकर, बाबूराव घुमनर, देवराव कांबळे, गोविंद भरकड, प्रकाश लांडगे, रमेश जाधव, शंकर जाधव आदींनी परिश्रम घेतले.---अर्धापूरच्या सीमेवर असलेल्या त्या सात गावाला हदगाव ५५ ते ६० कि़मी़ अंतरावर असल्याने शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागत होते़ त्यामुळे हदगाव तालुक्यातील ही सात गावे अर्धापूरला जोडावे, अशी मागणी होती़ ती पूर्ण झाल्याने आम्हाला आनंद होत आहे - राजेश बाजगिरे,सात गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष

टॅग्स :NandedनांदेडGovernmentसरकार