शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

सातबारा खाजगी व्यापाऱ्यांना देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:12 IST

कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खासगी व्यापाऱ्यांनी यापूर्वीच खरेदी करून साठवून ठेवला आहे. सीसीआयचा भाव चांगला असल्याने खरेदी केलेला कापूस ...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खासगी व्यापाऱ्यांनी यापूर्वीच खरेदी करून साठवून ठेवला आहे. सीसीआयचा भाव चांगला असल्याने खरेदी केलेला कापूस आता सीसीआयच्या खरेदी केंद्रावर जाणार आहे. त्यासाठी खासगी व्यापारी शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक व सातबारा घेऊ शकतात तसे झाले तर गरजू व गरीब शेतकऱ्यांचा नंबर लागणार नाही त्याचे वाईट परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतील जर शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना आधार कार्ड व इतर कागदपत्रे दिल्यास शेतकऱ्यांना प्रमाणापेक्षा जास्त रक्कम माल विकल्याने आल्यास आपल्याला कर्जमाफीच्या यादीतून वगळण्यात येईल, कारण उत्पन्न अधिक असेल. याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान दोन दोन हजारांचा निधी बंद होईल. याशिवाय मिळणाऱ्या विविध सबसिडी बंद होतील. अनेक सवलतींपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागेल, असे अनेक जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कापूस हंगामात सीसीआयची खरेदी सुरू होऊनही ४ डिसेंबरपर्यंत ३२९ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा ९ हजार १८ क्विंटल १० किलो कापूस विक्रीस आला आहे. त्यामानाने खूप कमी कापूस आला आहे; पण येत्या काळात आवक वाढण्याची शक्यता असून खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या माथी हा कापूस मरतील आणि आधार लिंकमुळे हा सर्व प्रकार उघड होऊ शकतो.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले कोणतेही कागदपत्रे आधार कार्ड, बँक पासबुक व सातबारा खासगी व्यापाऱ्यांना देऊ नये असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रवी तिरमनवार यांनी केले आहे.