शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:12 IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी, आत्महत्यांचे हे सत्र थांबत नसल्याचे चिंताजनक चित्र आहे. बुधवारी जिल्ह्यात विविध ठिकाणच्या तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले असून मागील पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ७३३ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद असल्याने शासनाच्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देतिघांनी मृत्यूला कवटाळलेपाच वर्षांत जिल्ह्यात ७३३ आत्महत्यांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी, आत्महत्यांचे हे सत्र थांबत नसल्याचे चिंताजनक चित्र आहे. बुधवारी जिल्ह्यात विविध ठिकाणच्या तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले असून मागील पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ७३३ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद असल्याने शासनाच्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे दिसून येते.मागील अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचा मुद्दा ऐरणीवर आहे. आघाडी सरकारच्या काळातही शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. विशेषत: त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना-भाजपाने शेतकरी आत्महत्यांच्या मुद्यावरून राज्यभरात आंदोलनाद्वारे रान पेटविले होते. तीन वर्षांपूर्वी सत्तांतर होवून महाराष्ट्रात सेना-भाजप सत्तेत विराजमान झाले. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना होतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, शेतकरी आत्महत्यांच्या घटनांची आकडेवारी पाहता हे सत्र थांबता थांबत नसल्याने शासनाने याप्रश्नी नव्याने पाऊले उचलण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार १ डिसेंबर २०१२ ते फेबु्रवारी २०१८ या पाच वर्षांच्या कालावधीत एकट्या नांदेड जिल्ह्यात ७३३ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे.तालुकानिहाय आकडेवारी पाहता जिल्ह्याच्या अवर्षणग्रस्त भागात आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.विशेषत: किनवट तालुक्यात सर्वाधिक १३९ आत्महत्या झाल्या आहेत. त्यापाठोपाठ हदगाव- ८५, कंधार- ६९, हिमायतनगर- ५६, लोहा-५२, नांदेड-२८, अर्धापूर- १९, भोकर- ४५, मुदखेड- २३, धर्माबाद-१६, उमरी-२७, माहूर- ४३, बिलोली- ३९, नायगाव- ३३, देगलूर - ११ तर मुखेड तालुक्यात ४३ शेतकºयांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपविले आहे. यावर्षी मराठवाड्यात पावसाचे प्रमाण काहीसे बरे असले तरीही, नांदेड जिल्ह्यात मात्र विषम स्वरूपात पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील किनवट, माहूर यासारख्या तालुक्यांत अत्यल्प पावसामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर असल्याने शेतकºयांमागचे शुक्लकाष्ठ संपत नसल्याचे दिसून येते.पर्यायाने शासनाकडून समुपदेशन कार्यक्रम राबवूनही ठोस आर्थिक कार्यक्रमाअभावी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत.सरकारी पातळीवर केवळ घोषणाबाजीचशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मागील काही वर्षांपासून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, यातील अनेक योजना केवळ कागदावरच दिसत असल्याची विदारक स्थिती आहे. विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांच्या पुढाकाराने मराठवाड्यात ‘उभारी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नांदेड जिल्ह्यात सर्वेक्षणही करण्यात आले. त्यातून आलेली माहिती ही उत्साहवर्धक नाही.या उपक्रमांतर्गत महसूल व कृषी विभागाच्या कर्मचा-यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित केली असता, त्यातील ६४८ जणांनी प्रशासनाकडे कर्जाची मागणी केली. मात्र यातील अनेक प्रकरणे अद्यापही मार्गी लागलेली नाहीत.२५९ जणांनी वैरण विकास योजनेची मागणी केली. यातील अवघ्या ३१ जणांना या योजनेतून लाभ मिळाला आहे. याबरोबरच ५२४ जणांनी विहिरीसाठी, १४९ जणांनी शेततळ्यासाठी, ४८३ जणांनी गॅसजोडणीसाठी, ४९ जणांनी शुभमंगल सामूहिक विवाह योजनेसाठी,२२४ जणांनी बालसंगोपन तर ११५ जणांनी फळबाग प्रक्रियेसाठी मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी मागणी केली आहे.