शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:12 IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी, आत्महत्यांचे हे सत्र थांबत नसल्याचे चिंताजनक चित्र आहे. बुधवारी जिल्ह्यात विविध ठिकाणच्या तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले असून मागील पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ७३३ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद असल्याने शासनाच्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देतिघांनी मृत्यूला कवटाळलेपाच वर्षांत जिल्ह्यात ७३३ आत्महत्यांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी, आत्महत्यांचे हे सत्र थांबत नसल्याचे चिंताजनक चित्र आहे. बुधवारी जिल्ह्यात विविध ठिकाणच्या तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले असून मागील पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ७३३ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद असल्याने शासनाच्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे दिसून येते.मागील अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचा मुद्दा ऐरणीवर आहे. आघाडी सरकारच्या काळातही शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. विशेषत: त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना-भाजपाने शेतकरी आत्महत्यांच्या मुद्यावरून राज्यभरात आंदोलनाद्वारे रान पेटविले होते. तीन वर्षांपूर्वी सत्तांतर होवून महाराष्ट्रात सेना-भाजप सत्तेत विराजमान झाले. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना होतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, शेतकरी आत्महत्यांच्या घटनांची आकडेवारी पाहता हे सत्र थांबता थांबत नसल्याने शासनाने याप्रश्नी नव्याने पाऊले उचलण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार १ डिसेंबर २०१२ ते फेबु्रवारी २०१८ या पाच वर्षांच्या कालावधीत एकट्या नांदेड जिल्ह्यात ७३३ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे.तालुकानिहाय आकडेवारी पाहता जिल्ह्याच्या अवर्षणग्रस्त भागात आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.विशेषत: किनवट तालुक्यात सर्वाधिक १३९ आत्महत्या झाल्या आहेत. त्यापाठोपाठ हदगाव- ८५, कंधार- ६९, हिमायतनगर- ५६, लोहा-५२, नांदेड-२८, अर्धापूर- १९, भोकर- ४५, मुदखेड- २३, धर्माबाद-१६, उमरी-२७, माहूर- ४३, बिलोली- ३९, नायगाव- ३३, देगलूर - ११ तर मुखेड तालुक्यात ४३ शेतकºयांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपविले आहे. यावर्षी मराठवाड्यात पावसाचे प्रमाण काहीसे बरे असले तरीही, नांदेड जिल्ह्यात मात्र विषम स्वरूपात पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील किनवट, माहूर यासारख्या तालुक्यांत अत्यल्प पावसामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर असल्याने शेतकºयांमागचे शुक्लकाष्ठ संपत नसल्याचे दिसून येते.पर्यायाने शासनाकडून समुपदेशन कार्यक्रम राबवूनही ठोस आर्थिक कार्यक्रमाअभावी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत.सरकारी पातळीवर केवळ घोषणाबाजीचशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मागील काही वर्षांपासून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, यातील अनेक योजना केवळ कागदावरच दिसत असल्याची विदारक स्थिती आहे. विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांच्या पुढाकाराने मराठवाड्यात ‘उभारी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नांदेड जिल्ह्यात सर्वेक्षणही करण्यात आले. त्यातून आलेली माहिती ही उत्साहवर्धक नाही.या उपक्रमांतर्गत महसूल व कृषी विभागाच्या कर्मचा-यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित केली असता, त्यातील ६४८ जणांनी प्रशासनाकडे कर्जाची मागणी केली. मात्र यातील अनेक प्रकरणे अद्यापही मार्गी लागलेली नाहीत.२५९ जणांनी वैरण विकास योजनेची मागणी केली. यातील अवघ्या ३१ जणांना या योजनेतून लाभ मिळाला आहे. याबरोबरच ५२४ जणांनी विहिरीसाठी, १४९ जणांनी शेततळ्यासाठी, ४८३ जणांनी गॅसजोडणीसाठी, ४९ जणांनी शुभमंगल सामूहिक विवाह योजनेसाठी,२२४ जणांनी बालसंगोपन तर ११५ जणांनी फळबाग प्रक्रियेसाठी मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी मागणी केली आहे.