शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:12 IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी, आत्महत्यांचे हे सत्र थांबत नसल्याचे चिंताजनक चित्र आहे. बुधवारी जिल्ह्यात विविध ठिकाणच्या तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले असून मागील पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ७३३ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद असल्याने शासनाच्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देतिघांनी मृत्यूला कवटाळलेपाच वर्षांत जिल्ह्यात ७३३ आत्महत्यांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी, आत्महत्यांचे हे सत्र थांबत नसल्याचे चिंताजनक चित्र आहे. बुधवारी जिल्ह्यात विविध ठिकाणच्या तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले असून मागील पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ७३३ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद असल्याने शासनाच्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे दिसून येते.मागील अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचा मुद्दा ऐरणीवर आहे. आघाडी सरकारच्या काळातही शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. विशेषत: त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना-भाजपाने शेतकरी आत्महत्यांच्या मुद्यावरून राज्यभरात आंदोलनाद्वारे रान पेटविले होते. तीन वर्षांपूर्वी सत्तांतर होवून महाराष्ट्रात सेना-भाजप सत्तेत विराजमान झाले. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना होतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, शेतकरी आत्महत्यांच्या घटनांची आकडेवारी पाहता हे सत्र थांबता थांबत नसल्याने शासनाने याप्रश्नी नव्याने पाऊले उचलण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार १ डिसेंबर २०१२ ते फेबु्रवारी २०१८ या पाच वर्षांच्या कालावधीत एकट्या नांदेड जिल्ह्यात ७३३ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे.तालुकानिहाय आकडेवारी पाहता जिल्ह्याच्या अवर्षणग्रस्त भागात आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.विशेषत: किनवट तालुक्यात सर्वाधिक १३९ आत्महत्या झाल्या आहेत. त्यापाठोपाठ हदगाव- ८५, कंधार- ६९, हिमायतनगर- ५६, लोहा-५२, नांदेड-२८, अर्धापूर- १९, भोकर- ४५, मुदखेड- २३, धर्माबाद-१६, उमरी-२७, माहूर- ४३, बिलोली- ३९, नायगाव- ३३, देगलूर - ११ तर मुखेड तालुक्यात ४३ शेतकºयांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपविले आहे. यावर्षी मराठवाड्यात पावसाचे प्रमाण काहीसे बरे असले तरीही, नांदेड जिल्ह्यात मात्र विषम स्वरूपात पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील किनवट, माहूर यासारख्या तालुक्यांत अत्यल्प पावसामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर असल्याने शेतकºयांमागचे शुक्लकाष्ठ संपत नसल्याचे दिसून येते.पर्यायाने शासनाकडून समुपदेशन कार्यक्रम राबवूनही ठोस आर्थिक कार्यक्रमाअभावी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत.सरकारी पातळीवर केवळ घोषणाबाजीचशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मागील काही वर्षांपासून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, यातील अनेक योजना केवळ कागदावरच दिसत असल्याची विदारक स्थिती आहे. विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांच्या पुढाकाराने मराठवाड्यात ‘उभारी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नांदेड जिल्ह्यात सर्वेक्षणही करण्यात आले. त्यातून आलेली माहिती ही उत्साहवर्धक नाही.या उपक्रमांतर्गत महसूल व कृषी विभागाच्या कर्मचा-यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित केली असता, त्यातील ६४८ जणांनी प्रशासनाकडे कर्जाची मागणी केली. मात्र यातील अनेक प्रकरणे अद्यापही मार्गी लागलेली नाहीत.२५९ जणांनी वैरण विकास योजनेची मागणी केली. यातील अवघ्या ३१ जणांना या योजनेतून लाभ मिळाला आहे. याबरोबरच ५२४ जणांनी विहिरीसाठी, १४९ जणांनी शेततळ्यासाठी, ४८३ जणांनी गॅसजोडणीसाठी, ४९ जणांनी शुभमंगल सामूहिक विवाह योजनेसाठी,२२४ जणांनी बालसंगोपन तर ११५ जणांनी फळबाग प्रक्रियेसाठी मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी मागणी केली आहे.