शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्ष विचार सर्वदूर पोहोचविणारा अभ्यासू नेता हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST

नांदेड : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, संसदरत्न, राज्यसभेचे खासदार राजीवजी सातव आज आपल्यामध्ये नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. ...

नांदेड : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, संसदरत्न, राज्यसभेचे खासदार राजीवजी सातव आज आपल्यामध्ये नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. रविवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी वाचताना मनाला पटत नव्हते. खूप जड अंतःकरणाने शेवटी ते मान्य करावे लागले. धर्मनिरपेक्ष विचार सर्वदूर पोहोचविणारा अभ्यासू नेता हरपल्याने मराठवाड्यासह महाराष्ट्राचे नुकसान झाल्याच्या भावना माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी व्यक्त केल्या आहेत. राजीवजींच्या निधनाने एका उमदा तरुण, अभ्यासू खासदार, शांत, संयमी, निगर्वी, प्रसन्न मुद्रेचा युवा नेता आपण गमावला आहे. खूप अल्प कालावधीत राजीव सातव यांनी जिल्हा परिषद ते देशाचे सर्वोच्च सभागृह संसद, ते वरिष्ठ सभागृह असणाऱ्या राज्यसभेपर्यंत उत्तुंग भरारी घेतली होती. अभ्यासपूर्ण व प्रभावी शब्दात त्यांनी मराठवाडा, महाराष्ट्रासह देशाचे प्रश्न लोकसभेत आणि राज्यसभेत मांडले. अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून ते सत्ताधाऱ्यांनाही अंतर्मुख करत असत. सभागृहात लक्षणीय उपस्थिती दर्शविणारे तरूण खासदार राजीव सातव हे चारवेळा संसदरत्न राहिले होते. अमोघ वक्तृत्व, उत्तम संघटन कौशल्य असणारे राजीव सातव यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले. काँग्रेस पक्षाचा धर्मनिरपेक्ष विचार सर्वदूर पोहोचवला. प्रचंड अभ्यासू असणारे राजीवजी वाचनात खूप रमत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विषयांवर दांडगा अभ्यास असणारे राजीवजी अनेक चर्चेत पक्षाची भूमिका अतिशय कणखरपणे मांडत होते. अगदी कमी वयात काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात ते सक्रिय झाले होते. युपीएच्या नेत्या सोनिया गांधी आणि देशाचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. खूप कमी वयात गांधी परिवाराची मर्जी संपादन करणारे राजीव सातव हे केवळ मराठवाडयाचेच नाही, तर महाराष्ट्रासह देशभरातील काँग्रेसचा युवा चेहरा होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसचे अपरिमित नुकसान झाले आहे. जीवनातील अनेक बऱ्यावाईट प्रसंगाला सामोरे जात ते इथपर्यंत पोहोचले होते. जणू,

‘वक्त से पहले हादसो से लडा हू,

लोग कहते है मुझे,

मैं अपनी उम्र से कई साल बडा हू’

असे म्हणणारे राजीवजी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या कार्याने, त्यांच्या कामाने ते कायमच लोकांच्या आठवणीत राहतील, अशा शब्दात डी. पी. सावंत यांनी भावना व्यक्त केल्या.