शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

धर्मनिरपेक्ष विचार सर्वदूर पोहोचविणारा अभ्यासू नेता हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST

नांदेड : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, संसदरत्न, राज्यसभेचे खासदार राजीवजी सातव आज आपल्यामध्ये नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. ...

नांदेड : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, संसदरत्न, राज्यसभेचे खासदार राजीवजी सातव आज आपल्यामध्ये नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. रविवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी वाचताना मनाला पटत नव्हते. खूप जड अंतःकरणाने शेवटी ते मान्य करावे लागले. धर्मनिरपेक्ष विचार सर्वदूर पोहोचविणारा अभ्यासू नेता हरपल्याने मराठवाड्यासह महाराष्ट्राचे नुकसान झाल्याच्या भावना माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी व्यक्त केल्या आहेत. राजीवजींच्या निधनाने एका उमदा तरुण, अभ्यासू खासदार, शांत, संयमी, निगर्वी, प्रसन्न मुद्रेचा युवा नेता आपण गमावला आहे. खूप अल्प कालावधीत राजीव सातव यांनी जिल्हा परिषद ते देशाचे सर्वोच्च सभागृह संसद, ते वरिष्ठ सभागृह असणाऱ्या राज्यसभेपर्यंत उत्तुंग भरारी घेतली होती. अभ्यासपूर्ण व प्रभावी शब्दात त्यांनी मराठवाडा, महाराष्ट्रासह देशाचे प्रश्न लोकसभेत आणि राज्यसभेत मांडले. अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून ते सत्ताधाऱ्यांनाही अंतर्मुख करत असत. सभागृहात लक्षणीय उपस्थिती दर्शविणारे तरूण खासदार राजीव सातव हे चारवेळा संसदरत्न राहिले होते. अमोघ वक्तृत्व, उत्तम संघटन कौशल्य असणारे राजीव सातव यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले. काँग्रेस पक्षाचा धर्मनिरपेक्ष विचार सर्वदूर पोहोचवला. प्रचंड अभ्यासू असणारे राजीवजी वाचनात खूप रमत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विषयांवर दांडगा अभ्यास असणारे राजीवजी अनेक चर्चेत पक्षाची भूमिका अतिशय कणखरपणे मांडत होते. अगदी कमी वयात काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात ते सक्रिय झाले होते. युपीएच्या नेत्या सोनिया गांधी आणि देशाचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. खूप कमी वयात गांधी परिवाराची मर्जी संपादन करणारे राजीव सातव हे केवळ मराठवाडयाचेच नाही, तर महाराष्ट्रासह देशभरातील काँग्रेसचा युवा चेहरा होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसचे अपरिमित नुकसान झाले आहे. जीवनातील अनेक बऱ्यावाईट प्रसंगाला सामोरे जात ते इथपर्यंत पोहोचले होते. जणू,

‘वक्त से पहले हादसो से लडा हू,

लोग कहते है मुझे,

मैं अपनी उम्र से कई साल बडा हू’

असे म्हणणारे राजीवजी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या कार्याने, त्यांच्या कामाने ते कायमच लोकांच्या आठवणीत राहतील, अशा शब्दात डी. पी. सावंत यांनी भावना व्यक्त केल्या.