शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

रुद्रापूर येथे सरपंच शेळके गटाचे पुन्हा वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:17 IST

बिलोली तालुक्यातील रुद्रापूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच अर्जुन शेळके व बाबा शेळके यांच्या गटाचे पाच सदस्य येथे निवडून ...

बिलोली तालुक्यातील रुद्रापूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच अर्जुन शेळके व बाबा शेळके यांच्या गटाचे पाच सदस्य येथे निवडून आले होते. नुकतीच सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. ९ सदस्यीय येथील ग्रामपंचायतीत नलगोंडे गटाचे ४ सदस्य निवड प्रक्रियेत गैरहजर राहिल्याने माजी सरपंच बाबा शेळके गटाच्या त्यांच्याच सूनबाई महानंदाबाई शेळके ह्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर कविता दोरणेवाड ह्या उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निर्वाचन अधिकारी एस. एम. वाघमारे यांनी केली. सभागृहात नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्य राजू गायकवाड, माधव शेळके, लक्ष्मीबाई शेळके आदींची उपस्थिती होती, तर शेषाबाई नलगोंडे, कमलाकर जमदडे, पवन गिरी अन्य एक सदस्य सभागृहात गैरहजर होते. वाघमारे यांना ग्रामसेवक पी. डी. वाघमारे, तलाठी एम. एस. राजकुंडल यांनी सहकार्य केले तर पोलीस उपनिरीक्षक सय्यद, बिट जमादार जी. बी. शिंदे , पो. काॅ. निम्मलवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, सरपंच शेळके व उपसरपंच दोरणेवाड यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राजू गायकवाड, माधव शेळके, लक्ष्मीबाई शेळके यांचा सत्कार माजी सरपंच व पॅनल प्रमुख बाबा शेळके व अर्जुन शेळके यांनी केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची रुद्रापुरात फटाक्यांच्या आतषबाजीत विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे.