शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेमुळे गाेदावरीचे पावित्र्य दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत ८१ पैकी ७३ नगरसेवक असल्याने काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. राज्यात व जिल्ह्यातही काँग्रेसचे ‘सरकार’ असल्याने महापालिकेने ...

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत ८१ पैकी ७३ नगरसेवक असल्याने काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. राज्यात व जिल्ह्यातही काँग्रेसचे ‘सरकार’ असल्याने महापालिकेने नांदेड शहराचा चेहरामाेहरा बदलवणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात हा बदल हाेताना दिसत नाही. महापालिकेतील राजकारण व प्रशासन जणू रबरी शिक्का बनल्याचा नांदेडकरांचा सूर आहे. त्यातच त्यांना अस्तित्व हरवून बसलेल्या विराेधकांचीही अप्रत्यक्ष साथ लाभते आहे. महापालिकेत भाजपचे ६, शिवसेना १ व अपक्ष १ असे इतर संख्याबळ आहे. मात्र, विराेधी पक्षांनी जनहिताच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे ऐकिवात नाही. केवळ राजकारणासाठी तेवढा विराेध अधूनमधून पाहायला मिळताे.

नांदेड शहरातील अनेक समस्या आजही आ वासून उभ्या आहेत. भूमिगत गटार याेजना आहे, परंतु त्यातील घाण पाण्याचा याेग्य निचरा केला जात नाही. तासभर मुसळधार पाऊस आला, तरी नांदेड शहरातील रस्ते पाण्याखाली येतात. शहर जणू तुंबते, असे चित्र पाहायला मिळते. मलनि:सारण याेग्य पद्धतीने हाेत नसल्याने गाेदावरीत अस्वच्छता पाहायला मिळते. त्यासाठी बसवलेले पाणी शुद्धीकरण पंपही व्यर्थ ठरत आहेत. आजही गाेदावरीमधील पाण्याचे नमुने तपासल्यास ते दूषित असल्याचे सिद्ध हाेईल. यापूर्वी याच दुषित पाण्यामुळे हजाराे मासे मृत्युमुखी पडल्याची उदाहरणे आहेत. सांडपाण्याचा निचरा हाेत नसल्याने शहरातील पिण्याच्या पाण्याचे अनेक स्रोत दूषित झाले आहेत.

चाैकट....

पार्किंग पॅटर्नने रस्ते झाले अरुंद

विदेशातील धर्तीवर शहरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली हाेती. मात्र, त्याचा फारसा उपयाेग हाेताना दिसत नाही. या पार्किंग पॅटर्नमुळे रस्ते लहान झाल्याने वाहतूककाेंडीची नवी समस्या निर्माण झाली आहे. तुप्पा येथे डम्पिंग यार्ड असले, तरी कचऱ्याची समस्या सुटलेली नाही. नागरिक कचरा टाकण्यासाठी चक्क रस्ता दुभाजकाचा वापर करीत असल्याचे चित्र तराेडानाका, छत्रपती चाैक परिसरात आहे.

चाैकट .....

पदपथ अतिक्रमणाने व्यापलेलेच

शहरातील अतिक्रमणाची अवस्थाही बिकट झाली आहे. पदपथ (फुटपाथ) नागरिकांसाठी माेकळे असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तेथे टपऱ्या, पानठेले, हातगाड्या व लागूनच असलेल्या दुकानांमधील साहित्याचे अतिक्रमण पाहायला मिळते. मनपाच्या पथकाने कारवाई करून पाठ फिरवताच हे अतिक्रमण पुन्हा बसते, हे विशेष.

चाैकट....

बॅनर्सने शहराचे विद्रूपीकरण

महापालिकेने नांदेड शहरात ‘नाे बॅनर्स झाेन’ तयार केले हाेते. मात्र, त्यांची काटेकाेर अंमलबजावणी न झाल्याने शहराचे विद्रूपीकरण आजही कायम असल्याचे चित्र आहे. शहराची ही झालेली वाताहत महानगरपालिकेतील ‘नामधारी’ राजकारण व प्रशासनाचे अपयश मानले जाते.