शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या दळणवळणाला मिळणार गती; नांदेडसह परभणी, हिंगोलीलाही आता समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 19:43 IST

Samruddhi Mahamarg साडेसहा हजार कोटींच्या प्रकल्पाला तत्वत मंजुरी मिळाल्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

ठळक मुद्देनव्या निर्णयानुसार समृद्धी महामार्ग मुंबईच्या दिशेला जेएनपीटीशी जोडला जाणार आहे.नांदेड-जालना या समृद्धी महामार्गाच्या कनेक्टींग लिंकचा भाग

नांदेड - हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी आता नांदेडबरोबरच परभणी, हिंगोलीही जोडले जाणार आहे. सुमारे साडेसहा हजार रुपये कोटी रुपयाच्या या प्रकल्पाला राज्य शासनाने तत्वत मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला तात्विक मान्यता दिल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे या तिन्ही जिल्ह्यातील दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे. 

याबाबत अशोक चव्हाण यांनी सांगितले की मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला नांदेड शहर जोडले जावे यासाठी मागील काही महिन्यांपासून माझा पाठपुरावा सुरू होता. गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे समृद्धी महामार्गावरील जालना टी पॉईंटपासून नांदेड शहरापर्यंत द्रुतगती महामार्गाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नांदेड जिल्ह्यासह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यालाही समृद्धी महामार्गाशी थेट आणि वेगवान कनेक्टीव्हीटी मिळेल. तसेच नांदेड-मुंबई, नांदेड-औरंगाबाद या प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसा यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होईल असे त्यांनी सांगितले. 

जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी १९४ कि.मी. असून त्यासाठी अंदाजित खर्च ५ हजार ५०० कोटी रुपये अपेक्षित आहे. या द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठीचा तांत्रिक, अभियांत्रिकी व वित्तीय सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामालाही गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. नव्या निर्णयानुसार समृद्धी महामार्ग मुंबईच्या दिशेला जेएनपीटीशी जोडला जाणार आहे. त्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली हे जिल्हे आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याच्या दृष्टीनेही महामार्गाशी जोडले जातील. नांदेड-जालना या समृद्धी महामार्गाच्या कनेक्टींग लिंकचा भाग म्हणून नांदेड शहरातही रस्त्याची कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नांदेड शहरातील हिंगोली गेट-बाफना चौक-देगलूर नाका ते छत्रपती चौक (धनेगाव जंक्शन) या रस्त्याची सुधारणा याद्वारे करण्यात येईल. उड्डाणपूलासह देगलूर नाक्यानजीक गोदावरी नदीवर पूलही उभारला जाईल. महामार्गाच्या प्रकल्पाचा भाग म्हणूनच ही कामे करण्यास बैठकीत तत्वत मंजुरी मिळाली आहे. या कामांसाठी साधारण १ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे नांदेड शहरातील या नवीन रस्त्यांचा व पुलाचा वापर करण्यासाठी नांदेडकरांना कुठल्याही प्रकारचा टोल द्यावा लागणार नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या विकासाला मिळेल चालनासमृद्धी महामार्ग नांदेडशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्यातील मोठ्या भागात दळणवळण अधिक सुलभ होईल. नांदेड ते मुंबई व औरंगाबाद या महत्त्वाच्या मार्गावरील प्रवासात वेळ व पैशाची बचत होईल. याबरोबरच मालवाहतुकीच्या दृष्टीनेही हा निर्णय मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या तिन्ही जिल्ह्यांना जेएनपीटीपर्यंत थेट कनेक्टीव्हीटी मिळेल. त्यामुळे व्यावसायाच्या नव्या संधी उपलब्ध होऊन एकूणच मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल.- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण