शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

साेयाबीनची सोन्याची झळाळी उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST

गुरुवारी लाेकमत प्रतिनिधीने नांदेडमधील नवीन माेंढा येथे प्रत्यक्ष भेट देऊन साेयाबीनच्या लिलाव व मिळणाऱ्या भावाची पाहणी केली. तेव्हा अनेक ...

गुरुवारी लाेकमत प्रतिनिधीने नांदेडमधील नवीन माेंढा येथे प्रत्यक्ष भेट देऊन साेयाबीनच्या लिलाव व मिळणाऱ्या भावाची पाहणी केली. तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी ‘लाेकमत’कडे आपली व्यथा मांडली. १५ दिवसांपूर्वी सोयाबीनला ८ हजार १०० ते ८ हजार ५०० रुपये भाव होता. २३ सप्टेंबर रोजी नवामोंढा बाजारात ३५० क्विंटल आवक झाली. पावसामुळे दोन दिवसांपासून आवक कमी होती. गुरुवारी मात्र शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नवामोंढ्यात गर्दी केली होती. सध्या माेंढ्यामध्ये २५० ते ३०० क्विंटल साेयाबीनची दरदिवशी आवक हाेत आहे. ओला असूनही शेतकरी साेयाबीन विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. यावरून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येताे.

शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे?

सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सोयाबीनची लागवड केली होती. शेतकऱ्यांकडे माल नव्हता तेव्हा भाव चांगला होता. आता शेतकऱ्यांकडे माल येताच, बाजारात भाव कमी झाले आहेत. शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे?

-विश्वनाथ कदम, पिंपरी महिपाल, ता. नांदेड

आता शासनानेच विचार करावा

सोयाबीनच्या पिकासाठी एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च करावा लागला. निसर्गाच्या तावडीतून वाचलेल्या शेतमालाला आता ५ हजार रुपये भाव मिळत आहे. एकरामागे चार ते पाच क्विंटल उतारा येत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या पदरात काय पडत आहे, याचा विचार शासनाने करावा.

-संभाजी कदम, पिंपरी महिपाल, ता. नांदेड

व्यापारी म्हणतात, मिलमधून मागणी नाही

सध्या ओला माल विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे मालाला भाव कमी मिळत आहे. सध्या शासनाने १२ हजार टन डीओसी मागविलेली आहे. मिलवाल्याजवळ डीओसीला डीमांड नसल्याने बाजार कमी केला आहे. आम्ही फक्त ५० पैसे शेकडा कमिशनचे हक्कदार आहोत.

-रामनिवास द्वारकादास मोरक्या, व्यापारी, नवामोंढा, नांदेड

आवक वाढल्यास भावही वाढतील

नवामाेंढा बाजारात सध्या २५० ते ३०० क्विंटल सोयाबीनची आवक आहे. खरा माल बाजारात आल्यास भाव वाढतील. पंधरा दिवसांनंतर भाव वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी ३ हजार ४०० ते ३ हजार ५०० रुपये भाव होता. त्यानंतर भाव वाढले होते.

-संतोष मुळे, व्यापारी, नवामोंढा, नांदेड

चौकट....

आमचे काेणी ऐकतच नाही

सोयाबीनचे तेल दीडशे रुपये किलाेने विक्री होत आहे अन् शेतकऱ्यांचे सोयाबीन मात्र ४ ते ५ हजार रुपयांत विकत घेत आहेत. १३ हजार रुपयांना सोयाबीनची बॅग विकत घेतली. आता भिजलेला माल विक्री करण्यास आणला म्हणजे काही तरी अडचण आहे; पण आमची भावनाच कोणी ऐकण्यास तयार नसल्याची खंत लक्ष्मण कतुरे, कामाजी मोकाटे, रहाटी, रंगनाथ कदम या शेतकऱ्यांनी बाेलून दाखविली.