शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

साेयाबीनची सोन्याची झळाळी उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST

गुरुवारी लाेकमत प्रतिनिधीने नांदेडमधील नवीन माेंढा येथे प्रत्यक्ष भेट देऊन साेयाबीनच्या लिलाव व मिळणाऱ्या भावाची पाहणी केली. तेव्हा अनेक ...

गुरुवारी लाेकमत प्रतिनिधीने नांदेडमधील नवीन माेंढा येथे प्रत्यक्ष भेट देऊन साेयाबीनच्या लिलाव व मिळणाऱ्या भावाची पाहणी केली. तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी ‘लाेकमत’कडे आपली व्यथा मांडली. १५ दिवसांपूर्वी सोयाबीनला ८ हजार १०० ते ८ हजार ५०० रुपये भाव होता. २३ सप्टेंबर रोजी नवामोंढा बाजारात ३५० क्विंटल आवक झाली. पावसामुळे दोन दिवसांपासून आवक कमी होती. गुरुवारी मात्र शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नवामोंढ्यात गर्दी केली होती. सध्या माेंढ्यामध्ये २५० ते ३०० क्विंटल साेयाबीनची दरदिवशी आवक हाेत आहे. ओला असूनही शेतकरी साेयाबीन विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. यावरून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येताे.

शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे?

सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सोयाबीनची लागवड केली होती. शेतकऱ्यांकडे माल नव्हता तेव्हा भाव चांगला होता. आता शेतकऱ्यांकडे माल येताच, बाजारात भाव कमी झाले आहेत. शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे?

-विश्वनाथ कदम, पिंपरी महिपाल, ता. नांदेड

आता शासनानेच विचार करावा

सोयाबीनच्या पिकासाठी एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च करावा लागला. निसर्गाच्या तावडीतून वाचलेल्या शेतमालाला आता ५ हजार रुपये भाव मिळत आहे. एकरामागे चार ते पाच क्विंटल उतारा येत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या पदरात काय पडत आहे, याचा विचार शासनाने करावा.

-संभाजी कदम, पिंपरी महिपाल, ता. नांदेड

व्यापारी म्हणतात, मिलमधून मागणी नाही

सध्या ओला माल विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे मालाला भाव कमी मिळत आहे. सध्या शासनाने १२ हजार टन डीओसी मागविलेली आहे. मिलवाल्याजवळ डीओसीला डीमांड नसल्याने बाजार कमी केला आहे. आम्ही फक्त ५० पैसे शेकडा कमिशनचे हक्कदार आहोत.

-रामनिवास द्वारकादास मोरक्या, व्यापारी, नवामोंढा, नांदेड

आवक वाढल्यास भावही वाढतील

नवामाेंढा बाजारात सध्या २५० ते ३०० क्विंटल सोयाबीनची आवक आहे. खरा माल बाजारात आल्यास भाव वाढतील. पंधरा दिवसांनंतर भाव वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी ३ हजार ४०० ते ३ हजार ५०० रुपये भाव होता. त्यानंतर भाव वाढले होते.

-संतोष मुळे, व्यापारी, नवामोंढा, नांदेड

चौकट....

आमचे काेणी ऐकतच नाही

सोयाबीनचे तेल दीडशे रुपये किलाेने विक्री होत आहे अन् शेतकऱ्यांचे सोयाबीन मात्र ४ ते ५ हजार रुपयांत विकत घेत आहेत. १३ हजार रुपयांना सोयाबीनची बॅग विकत घेतली. आता भिजलेला माल विक्री करण्यास आणला म्हणजे काही तरी अडचण आहे; पण आमची भावनाच कोणी ऐकण्यास तयार नसल्याची खंत लक्ष्मण कतुरे, कामाजी मोकाटे, रहाटी, रंगनाथ कदम या शेतकऱ्यांनी बाेलून दाखविली.