शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बेड आरक्षित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:13 IST

महावीर जयंती साजरी निवघा - भगवान महावीर यांची जयंती निवघा परिसरात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने भगवान महावीर यांचा अभिषेक ...

महावीर जयंती साजरी

निवघा - भगवान महावीर यांची जयंती निवघा परिसरात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने भगवान महावीर यांचा अभिषेक आणि शांतीधारा करण्यात आल्यावर कोरोना दूर होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. महावीर जयंतीनिमित्त समाजबांधवांनी दाराजवळ दिवा लावला आणि आनंद द्विगुणित केला.

रिमझिम पाऊस

मुक्रमाबाद - मुक्रमाबादसह परतपूर, देगाव, इटग्याळ, गोजेगाव, रावणकोळा, सावरमाळ, वंटगीर, रावी, हंगरगा, लखमापूर, कोटग्याळ, आंबेगाव आदी गावांत वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. सोमवारी हा प्रकार घडला. नेहमीप्रमाणे वीज गुल झाली. पावसामुळे आंबा, टरबूज, पपई, खरबूज, टोमॅटो, वांगी आदींचे नुकसान झाले.

हनुमान जयंती साजरी

देगलूर - शहरापासून ५ कि.मी. अंतरावरील मिर्झापूर येथील प्राचीन हनुमान मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने भजन, काकडा आरती आदी कार्यक्रम झाले. मदनूरचे तहसीलदार व्यंकटराव, विश्वस्त मंडळाचे चेअरमन नरसीमलू गौड, सपाेनि व्यंकटराव, शीतल कुलकर्णी, मुख्य पुजारी अरविंद जोशी, सहायक पुजारी शैलेंद्र जोशी, मंदिर कर्मचारी कल्पना कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी यांच्यासह अनेकांनी धार्मिक विधी पार पाडले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

दोन दुकानांना आग

देगलूर - तालुक्यातील माळेगाव मक्ता किराणा दुकान व शेजारील एका इलेक्ट्रिकल दुकानाला अचानक आग लागली. आगीत दोन्ही दुकानांतील उपयाेगी वस्तू व रोख रक्कम जळून खाक झाली. जवळपास साडेसहा लाखांचे यात नुकसान झाले. अनिल पांचाळ व नंदकिशोर येरनाळे यांची ही दुकाने आहेत. २५ एप्रिलच्या रात्री ही आग लागली. आग विझवण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही.

बसवेश्वर जयंती साजरी

नांदेड - ग्रामपंचायत कार्यालय गोपाळचावडी येथे बसवेश्वर महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला उपसरपंच साहेबराव पाटील, अनिल धमने, रमेश तालीमकर, हणमंत मैलगे, आशीर्वाद डाकोरे, श्याम नायगावे, रामदास गजभारे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.

टाकळगाव येथे फवारणी

लोहा - तालुक्यातील टाकळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात आली. सरपंच भीमराव लामदाडे, उपसरपंच संभाजी चित्ताेरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरराव मोरे, ग्रामविकास अधिकारी अमृत शिंदे आदींनी याकामी पुढाकार घेतला. कामाशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, असे आवाहन सरपंचांनी केले आहे.