शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:47 IST

जिल्हा प्रशासनाने येत्या शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या रबी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी बहुतांश ठिकाणी अंतिम टप्प्यात असून गहू, मका व करडई पिकांची काढणीही प्रगतीपथावर असतानाच अवकाळीचे ढग जमा झाल्याने शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा प्रशासनाने येत्या शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या रबी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी बहुतांश ठिकाणी अंतिम टप्प्यात असून गहू, मका व करडई पिकांची काढणीही प्रगतीपथावर असतानाच अवकाळीचे ढग जमा झाल्याने शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.भारतीय हवामान खात्याच्या सूचनेवरुन जिल्हाधिकारी कार्यालयाने इशारा दिला आहे. त्यानुसार ६ आणि ७ एप्रिल या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुरुवार, ५ आणि ६ एप्रिल रोजी जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज असून शनिवारी जिल्ह्यातील वातावरण अंधूक राहण्याची शक्यता आहे. या वातावरणात ७ एप्रिल रोजी बदल होत तापमानाचा पारा घटण्याची शक्यता असून १० एप्रिलपर्यंत हे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसवर जाईल. या दिवसांत अंधूक वातावरणाची शक्यता व्यक्त करीत जिल्ह्याच्या काही भागात गडगडाटी वादळे येण्याचा इशाराही भारतीय हवामान खात्याच्या निर्देशावरुन जिल्हा प्रशासनाने दिला आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मनपा आयुक्त आणि सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकºयांनी पावसाचा अंदाज असल्याने कापून ठेवलेल्या पिकांची काळजी घ्यावी. या बरोबरच विजा चमकत असताना झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकरी रबी ज्वारीसह गहू व मका पिकांची काढणी करीत आहेत. या बरोबरच हरभरा आणि करडई पिकांची काढणीही सुरु आहे. अशा स्थितीत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने नुकतेच जिल्ह्यातील १ हजार १६८ गावे दुष्काळसदृश्य असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच अवकाळीचे ढग दाटल्याने शेतकºयांना सतर्कता बाळगावी लागणार आहे.फेब्रुवारीत नऊ तालुक्यांना बसला होता फटकाफेब्रुवारीमध्ये १२ आणि १३ रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीचा तडाखा नांदेडसह कंधार, माहूर, किनवट, हदगाव, धर्माबाद, बिलोली, हिमायतनगर आणि नायगाव या नऊ तालुक्यांना सोसावा लागला होता. या तालुक्यांतील ४५२ हून अधिक गावांत गारपीट झाली होती. या गारपिटीमुळे २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.फेब्रुवारीमध्ये शेतकºयांना अवकाळी पावसाचा फटका सोसावा लागल्यानंतर आता पुन्हा अवकाळीचे ढग घोंघावू लागल्याने शेतकºयांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

टॅग्स :HailstormगारपीटNandedनांदेड