शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

नांदेड जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:47 IST

जिल्हा प्रशासनाने येत्या शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या रबी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी बहुतांश ठिकाणी अंतिम टप्प्यात असून गहू, मका व करडई पिकांची काढणीही प्रगतीपथावर असतानाच अवकाळीचे ढग जमा झाल्याने शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा प्रशासनाने येत्या शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या रबी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी बहुतांश ठिकाणी अंतिम टप्प्यात असून गहू, मका व करडई पिकांची काढणीही प्रगतीपथावर असतानाच अवकाळीचे ढग जमा झाल्याने शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.भारतीय हवामान खात्याच्या सूचनेवरुन जिल्हाधिकारी कार्यालयाने इशारा दिला आहे. त्यानुसार ६ आणि ७ एप्रिल या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुरुवार, ५ आणि ६ एप्रिल रोजी जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज असून शनिवारी जिल्ह्यातील वातावरण अंधूक राहण्याची शक्यता आहे. या वातावरणात ७ एप्रिल रोजी बदल होत तापमानाचा पारा घटण्याची शक्यता असून १० एप्रिलपर्यंत हे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसवर जाईल. या दिवसांत अंधूक वातावरणाची शक्यता व्यक्त करीत जिल्ह्याच्या काही भागात गडगडाटी वादळे येण्याचा इशाराही भारतीय हवामान खात्याच्या निर्देशावरुन जिल्हा प्रशासनाने दिला आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मनपा आयुक्त आणि सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकºयांनी पावसाचा अंदाज असल्याने कापून ठेवलेल्या पिकांची काळजी घ्यावी. या बरोबरच विजा चमकत असताना झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकरी रबी ज्वारीसह गहू व मका पिकांची काढणी करीत आहेत. या बरोबरच हरभरा आणि करडई पिकांची काढणीही सुरु आहे. अशा स्थितीत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने नुकतेच जिल्ह्यातील १ हजार १६८ गावे दुष्काळसदृश्य असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच अवकाळीचे ढग दाटल्याने शेतकºयांना सतर्कता बाळगावी लागणार आहे.फेब्रुवारीत नऊ तालुक्यांना बसला होता फटकाफेब्रुवारीमध्ये १२ आणि १३ रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीचा तडाखा नांदेडसह कंधार, माहूर, किनवट, हदगाव, धर्माबाद, बिलोली, हिमायतनगर आणि नायगाव या नऊ तालुक्यांना सोसावा लागला होता. या तालुक्यांतील ४५२ हून अधिक गावांत गारपीट झाली होती. या गारपिटीमुळे २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.फेब्रुवारीमध्ये शेतकºयांना अवकाळी पावसाचा फटका सोसावा लागल्यानंतर आता पुन्हा अवकाळीचे ढग घोंघावू लागल्याने शेतकºयांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

टॅग्स :HailstormगारपीटNandedनांदेड