शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नांदेड जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:47 IST

जिल्हा प्रशासनाने येत्या शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या रबी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी बहुतांश ठिकाणी अंतिम टप्प्यात असून गहू, मका व करडई पिकांची काढणीही प्रगतीपथावर असतानाच अवकाळीचे ढग जमा झाल्याने शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा प्रशासनाने येत्या शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या रबी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी बहुतांश ठिकाणी अंतिम टप्प्यात असून गहू, मका व करडई पिकांची काढणीही प्रगतीपथावर असतानाच अवकाळीचे ढग जमा झाल्याने शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.भारतीय हवामान खात्याच्या सूचनेवरुन जिल्हाधिकारी कार्यालयाने इशारा दिला आहे. त्यानुसार ६ आणि ७ एप्रिल या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुरुवार, ५ आणि ६ एप्रिल रोजी जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज असून शनिवारी जिल्ह्यातील वातावरण अंधूक राहण्याची शक्यता आहे. या वातावरणात ७ एप्रिल रोजी बदल होत तापमानाचा पारा घटण्याची शक्यता असून १० एप्रिलपर्यंत हे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसवर जाईल. या दिवसांत अंधूक वातावरणाची शक्यता व्यक्त करीत जिल्ह्याच्या काही भागात गडगडाटी वादळे येण्याचा इशाराही भारतीय हवामान खात्याच्या निर्देशावरुन जिल्हा प्रशासनाने दिला आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मनपा आयुक्त आणि सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकºयांनी पावसाचा अंदाज असल्याने कापून ठेवलेल्या पिकांची काळजी घ्यावी. या बरोबरच विजा चमकत असताना झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकरी रबी ज्वारीसह गहू व मका पिकांची काढणी करीत आहेत. या बरोबरच हरभरा आणि करडई पिकांची काढणीही सुरु आहे. अशा स्थितीत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने नुकतेच जिल्ह्यातील १ हजार १६८ गावे दुष्काळसदृश्य असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच अवकाळीचे ढग दाटल्याने शेतकºयांना सतर्कता बाळगावी लागणार आहे.फेब्रुवारीत नऊ तालुक्यांना बसला होता फटकाफेब्रुवारीमध्ये १२ आणि १३ रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीचा तडाखा नांदेडसह कंधार, माहूर, किनवट, हदगाव, धर्माबाद, बिलोली, हिमायतनगर आणि नायगाव या नऊ तालुक्यांना सोसावा लागला होता. या तालुक्यांतील ४५२ हून अधिक गावांत गारपीट झाली होती. या गारपिटीमुळे २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.फेब्रुवारीमध्ये शेतकºयांना अवकाळी पावसाचा फटका सोसावा लागल्यानंतर आता पुन्हा अवकाळीचे ढग घोंघावू लागल्याने शेतकºयांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

टॅग्स :HailstormगारपीटNandedनांदेड