शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

रिफाइंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:24 IST

धावपळीच्या जगात प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. त्यात आहार, विहार बदलत असल्याने त्याचे आरोग्यावरही परिणाम होत आहेत. परंतु, शरीराच्या ...

धावपळीच्या जगात प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. त्यात आहार, विहार बदलत असल्याने त्याचे आरोग्यावरही परिणाम होत आहेत. परंतु, शरीराच्या संरक्षणसाठी शेंद्रीय पालेभाज्या, फळांचा जशी मागणी वाढली आहे, तशीच लाकडी घाणा वापरून तयार केलेल्या तेलाची मागणी वाढल्याचे पहायला मिळत आहे.

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

तेल शरीरातील लवचिकता टिकवून ठेवण्याचे काम करते. एकप्रकारे वाहनातील ऑइलचे जसे वंगण म्हणून कार्य असते. त्याचप्रमाणे शरीराची यंत्रणा चालविण्यासाठी तेल महत्त्वपूर्ण ठरते. परंतु, त्यातील भेसळीमुळे हृदयरोग वाढत आहेत.

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

लाकडी घाण्यातून काढलेले तेल चिकट आणि कोणतेही केमिकल न वापरता काढलेले असते. त्यामुळे ते सर्वाधिक पोषक आणि शरीराची लवचिकता टिकवून ठेवणारे असते. या तेलामध्ये एचडीएल नावाची उपयुक्त चरबी अधिक प्रमाणात असते.

रिफाइंड तेल घातक का?

रिफाइंड तेलामध्ये हॉट प्रोसिंगचा वापर केला जातो. या तेलात चरबी (चिकटपणा) आणि इतर घटक कमी जातात. परंतु, याच प्रक्रियेदरम्यान उपयुक्त चरबीही बऱ्याच अंशी कमी होते. त्यामुळे रिफाइंड तेल हे एक हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. तेलात चिकटपणा नसेल तर त्याचा वापर करूनही शरीरास आवश्यक ते घटक मिळत नाहीत. त्यातून गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी असे आजारांना तोंड फुटते.

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

निरोगी स्वास्थ, आरोग्य हवे असेल तर शरीरातील महत्त्वाचे अवयव निरोगी राहिले पाहिजे. जसे की किडणी, हृदय, मेंदू, फुप्फुसे आदी या अवयवासाठी तेल हा एक महत्त्वाचा घटक आहे. सदर तेल घाण्याच्या माध्यमातून काढलेले असेल तर या अवयवयचे आयुष्य आणखी वाढते. घाण्याच्या तेलामध्ये एचडीएल नावाच्या उपयुक्त चरबी (गुड कोलेस्टेरॉल)चे प्रमाण अधिक असते.

- डॉ. शिवानंद बासरे, आहारतज्ज्ञ, नांदेड