शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत ६९४९ अर्ज प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:44 IST

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा प्राप्त व्हावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लागू केली आहे. ऑक्टोबर ...

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा प्राप्त व्हावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लागू केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सौरपंप उभारणीसाठी लागणारे साहित्य शेतात निर्धारित ठिकाणी पोहचविणे शक्य नव्हते. सर्वत्र चिखल झाल्यामुळे वाहन नेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामाचा वेग मंदावला होता. त्यानंतर कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अडचणीही निर्माण झाल्या. शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देऊन त्याच्यासाठी दिवसाच्या विजेचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सदर योजना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत १३ कंपन्यांच्या मदतीने सौर कृषी पंप बसविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, या कामाने आता गती घेतली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात आजपावेतो ६ हजार ९४९ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ३ हजार ५२ अर्ज रद्द करण्यात आले. सौर कृषी पंपासाठी ३ हजार ५०१ कोटेशनचे वितरण करण्यात आले असून, त्यापैकी २ हजार २३२ शेतकऱ्यांनी कोटेशन भरले आहे.

दरम्यान, २ हजार २०२ शेतकऱ्यांनी कंपनीची निवड केली आहे. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत १ हजार ६७२ शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची जोडणी देण्यात आली असून, सद्य:स्थितीत २४८ कामे प्रगतिपथावर असल्याचे दिसून येत आहे. या योजनेमुळे १ हजार ६७२ शेतकऱ्यांचे दिवसा विजेचे स्वप्न पूर्ण झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचे दिवसा विजेचे स्वप्न होणार पूर्ण

शेतकऱ्यांना शेतातील पिकांसाठी रात्रीच वीज पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे. या योजनेचा असंख्य शेतकरी लाभ घेत असून त्यांच्या दिवसा विजेचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.