शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत ६९४९ अर्ज प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:44 IST

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा प्राप्त व्हावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लागू केली आहे. ऑक्टोबर ...

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा प्राप्त व्हावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लागू केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सौरपंप उभारणीसाठी लागणारे साहित्य शेतात निर्धारित ठिकाणी पोहचविणे शक्य नव्हते. सर्वत्र चिखल झाल्यामुळे वाहन नेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामाचा वेग मंदावला होता. त्यानंतर कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अडचणीही निर्माण झाल्या. शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देऊन त्याच्यासाठी दिवसाच्या विजेचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सदर योजना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत १३ कंपन्यांच्या मदतीने सौर कृषी पंप बसविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, या कामाने आता गती घेतली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात आजपावेतो ६ हजार ९४९ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ३ हजार ५२ अर्ज रद्द करण्यात आले. सौर कृषी पंपासाठी ३ हजार ५०१ कोटेशनचे वितरण करण्यात आले असून, त्यापैकी २ हजार २३२ शेतकऱ्यांनी कोटेशन भरले आहे.

दरम्यान, २ हजार २०२ शेतकऱ्यांनी कंपनीची निवड केली आहे. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत १ हजार ६७२ शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची जोडणी देण्यात आली असून, सद्य:स्थितीत २४८ कामे प्रगतिपथावर असल्याचे दिसून येत आहे. या योजनेमुळे १ हजार ६७२ शेतकऱ्यांचे दिवसा विजेचे स्वप्न पूर्ण झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचे दिवसा विजेचे स्वप्न होणार पूर्ण

शेतकऱ्यांना शेतातील पिकांसाठी रात्रीच वीज पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे. या योजनेचा असंख्य शेतकरी लाभ घेत असून त्यांच्या दिवसा विजेचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.