शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

जिल्ह्यात १ लाख ९२ हजार हेक्टरवर रबी पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:48 IST

जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रबीच्या पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात ...

जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रबीच्या पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी रबी हंगामावर शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासनानेही रबी हंगामावर लक्ष केंद्रित करून रबीचे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन केले होते. कृषी विभागाने रबीसाठी लागणारे बियाणे व खताचे नियोजनही करण्यात आले होते. जिल्ह्याचे रबी पिकांचे सरासरी क्षेत्र १ लाख ४० हजार हेक्टर असून, यात हरभरा पिकांचे सरासरी पेरणी क्षेत्र ८८ हजार हेक्टर आहे. आजपर्यंत सरासरी १३७ टक्क्यांनुसार १ लाख ९२ हजार १८० हेक्टरवर रबीमध्ये पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक १ लाख ५४ हजार १९ हेक्टरवर हरभरा पेरला आहे, तसेच रबी ज्वारी २१ हजार ४०६ हेक्टर, गहू ११ हजार ४६१ हेक्टर, मका १ हजार ५७५, करडी २ हजार ३२१, तीळ ६ हजार, जवस ९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यालगतच्या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे रबी पिकांसह बागायती पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून जास्तीत जास्त क्षेत्रावर रबी पिकांची पेरणी करावी, तसेच उन्हाळी हंगामात उन्हाळी ज्वारी, भुईमूग पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करावी, असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.