शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाणीपाळ्याचा प्रश्न पुन्हा पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:12 IST

नांदेड : रबी हंगाम संपत आला तरी अद्यापही विष्णूपुरी प्रकल्पातून शेतीला आवर्तन सोडण्यात आले नाही़ त्यामुळे केवळ घोषणा करण्याºया दोन्ही आमदारांवर आता जनतेचा विश्वास राहिला नसल्याची टीका करीत येत्या ७ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप धोंडगे यांनी दिला आहे़

ठळक मुद्देराष्ट्रवादीची दोन्ही सेना आमदारांवर टीका, ७ डिसेंबरपासून करणार आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : रबी हंगाम संपत आला तरी अद्यापही विष्णूपुरी प्रकल्पातून शेतीला आवर्तन सोडण्यात आले नाही़ त्यामुळे केवळ घोषणा करण्याºया दोन्ही आमदारांवर आता जनतेचा विश्वास राहिला नसल्याची टीका करीत येत्या ७ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप धोंडगे यांनी दिला आहे़लिंबोटी आणि विष्णूपुरी प्रकल्पातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी आ़शंकर धोंडगे यांनी पाटबंधारे कार्यालयात धरणे आंदोलन केले होते़ त्यावेळी आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही केवळ स्टंटबाजी असून श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता़ तसेच येत्या काही दिवसांत पाणीपाळ्या सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले होते़, परंतु अद्यापपर्यंत विष्णूपुरीतून पाणीपाळ्या सोडण्यात आल्या नाहीत़ त्यात आता रबी हंगामही संपत आला आहे़ विशेष म्हणजे, यंदा विष्णूपुरी प्रकल्प १०० टक्के भरला आहे़अत्यल्प पाऊस झालेल्या लोहा तालुक्याचे दोन आमदार प्रतिनिधित्व करतात़ विष्णूपुरी प्रकल्पाअंतर्गत कालव्याद्वारे रबी हंगामासाठी १० हजार हेक्टर आसपास क्षेत्र असून ४० ते ५० गावांचा समावेश आहे़ चालू वर्षात लोहा-कंधार क्षेत्रातही पाऊस सरासरीच्या ५५ टक्के झाला आहे़ खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग हातून गेले आहे़ कापसावर गुलाबीअळीचा प्रादुर्भाव आहे़बोंडअळीने बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळवून देण्यातही मदत करण्यात येत नाही़ विष्णूपुरीतून १५ आॅक्टोबरलाच आवर्तन सुरु केले असते तर शेतकºयांना लाभ मिळाला असता़, परंतु आता दोन महिने विलंब झाल्यामुळे रबीची आशा मावळली आहे, अशी टीका धोंडगे यांनी केली़ तसेच या विरोधात ७ डिसेंबर रोजी पाटबंधारे कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे़दरम्यान, आ़हेमंत पाटील यांनी सोनखेड येथील आढावा बैठकीत विष्णूपुरीतून तीन आवर्तने मंजूर केल्याचे व जायकवाडीतील ६० दलघमी पाणी विष्णूपुरीसाठी आरक्षित केल्याचे सांगितले़ विष्णूपुरीतून मिळणाºया पाणी पाळ्यावरुन सध्या लोहा-कंधार तालुक्याचे राजकारण चांगलेच तापले आहे़ आगामी काळात या विषयावरुन सेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार हे मात्र नक्की़ मात्र या वादात शेतकºयांच्या हातून मात्र रबी हंगाम जाणार हे निश्चित़