शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

खुर्ची टिकविण्यासाठी राजकारण नको-माजीमंत्री कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:52 IST

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अथवा आपली खुर्ची टिकविण्यासाठी राजकारण न करता पक्षाच्या धोरणात्मक निर्णयानुसार काम करा, अशा कानपिचक्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी पक्षातील पदाधिका-यांना दिल्या़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अथवा आपली खुर्ची टिकविण्यासाठी राजकारण न करता पक्षाच्या धोरणात्मक निर्णयानुसार काम करा, अशा कानपिचक्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी पक्षातील पदाधिका-यांना दिल्या़राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक घेतली़ यावेळी ते बोलत होते़ बैठकीस आ़विक्रम काळे, सरचिटणीस बस्वराज पाटील, गंगाधरराव कुंटूरकर, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ़ सुनील कदम, दत्ता पवार, कार्याध्यक्ष जीवन पाटील घोगरे, फेरोज लाला, कल्पना पाटील डोंगळीकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, रऊफ जमीनदार, वसंत सुगावे, विश्वजित पावडे यांची उपस्थिती होती़यावेळी माजी मंत्री कदम यांनी पक्षनेत्यांना चांगलेच फैलावर घेतले़ ते म्हणाले, स्वत:च्या हितासाठी राजकारण करून आज आंदोलने उभी केली जात असतील तर हीच जनता उद्या तुम्हाला धडा शिकवेल़ त्यामुळे स्वार्थ बाजूला ठेवून शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आंदोलन करा़तसेच स्थानिक पातळीवरील निर्णय घेताना, स्थानिकच्या ज्येष्ठ, अनुभवी नेत्यांशी सल्लामसलत करत जा, असा टोलाही कदम यांनी लगावला़ मी शरदचंद्र पवार यांच्यासोबत चाळीस वर्षांपासून काम करतो़ जिल्ह्यात धोरणात्मक निर्णय घेताना प्रदेश कार्यकारिणीकडून ज्येष्ठांना डावलले जात असेल तर पवार यांना ही बाब कळवावी लागेल असा सुचक इशाराही त्यांनी दिला़ पदाधिकाºयांनी काम करीत असताना पक्षाकडून येणारा अजेंडा राबवावा, धोरणात्मक पद्धतीने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले़शहरातील काही मंडळी राष्ट्रवादीचे पद घेवून समाजवादी, भाजपच्या बॅनरवर झळकत आहेत़ त्यांनी पक्षाचा स्वत:च्या स्वार्थापुरता वापर करू नये, असेदेखील कदम म्हणाले़ दरम्यान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल आंदोलनासंदर्भात मार्गदर्शन केले़ माजी आ़ शंकरअण्णा धोंडगे यांच्यासह उपस्थितांनी आपले विचार मांडले़पदाधिकाºयांत खदखदराष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी पदाधिकाºयांची बैठक घेतली़ यावेळी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या़ राज्यस्तरावर निर्णय घेताना स्थानिक परिस्थितीही लक्षात घ्या़, असे त्यांची म्हणणे होते़ यावर काही निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतले असे स्पष्टीकरण मुंडे यांना यावेळी द्यावे लागले़