शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पोलिसांनी हद्द ओलांडली; तक्रार नंतर, आधी हद्द कुठली हे सांगा? शहर-ग्रामीणचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:23 IST

नांदेड शहराच्या चहूबाजूने असलेल्या ग्रामीण ठाण्याच्या विविध हद्दीवर ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून हद्द निश्चित करण्यावरून अनेक वेळा वाद होतो; परंतु अशा ...

नांदेड शहराच्या चहूबाजूने असलेल्या ग्रामीण ठाण्याच्या विविध हद्दीवर ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून हद्द निश्चित करण्यावरून अनेक वेळा वाद होतो; परंतु अशा वेळी तक्रारकर्त्यांना शहरी-ग्रामीणच्या फेऱ्यात अडकावे लागते. शेवटी कंटाळून अनेक जण तक्रार नोंदविण्यासाठी पुन्हा ठाण्यात जात नाहीत, असे अनेक प्रकार पुढे आलेले आहेत.

मोबाइल चोरीची तक्रार घेण्यास टाळाटाळ...

मोबाइल चोरीप्रकरणी भाग्यनगर ठाण्यात गेलाे असता तुम्ही विमानतळ ठाण्याच्या हद्दीत राहता तर तिकडेच तक्रार करा आणि विमानतळ ठाण्याकडून मोबाइल वर्कशॉपला चोरी गेला तर भाग्यनगरला तक्रार करा, असा सल्ला तेथील कर्मचाऱ्यांनी दिला. त्यामुळे मी मोबाइल चोरीची तक्रार करणे टाळून नवीन मोबाइल घेतला, असे आनंदनगर येथील कदम यांनी सांगितले.

ग्रामीण आणि इतवारा ठाण्याचा हद्दीवरून होणारा वाद सर्वश्रुत आहे. त्यात गोदावरी नदीपात्रात एखादा मृतदेह आढळला अथवा घटना घडली तर ती कोणाच्या हद्दीत यावरून अगोदर वादंग सुरू होते. काही तासांनंतर हा वाद मिटून मग प्रकरण मार्गी लागते, अशा घटना नेहमीच्याच आहेत.