शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पी.एम.किसान सन्मान निधी योजनाः

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:12 IST

अपात्र लाभार्थी यांचेकडून ५७ लाख ७० हजार होणार वसूल कंधारः तालुक्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत करभरणा ...

अपात्र लाभार्थी यांचेकडून ५७ लाख ७० हजार होणार वसूल

कंधारः तालुक्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत करभरणा करणारे व इतर अशा ६१९ अपात्र लाभार्थ्यांचा शिरकाव झाला आहे. असा योजनेचा लाभ घेतला असलेल्यांकडून ५७ लाख ७० हजार वसुली केली जाणार आहे.आतापर्यंत २६ खातेदारांनी २ लाख ३४ हजार रू.भरणा केला असल्याचे समोर आले आहेत. रक्कमा न भरणाऱ्यांवर फौजदारी कार्यवाही केली जाणार असल्याच्या भितीने अपात्र असलेल्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

तालुक्यात जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पंधरवड्यात विशेष मोहीम राबविण्यात आली.त्यात विविध स्तरावर दुरूस्तीसाठी प्रलंबित असलेला डाटामध्ये आवश्यक ती दुरूस्ती करून निकाली काढणे ,पी.एम.किसान पोर्टलवरील लाभार्थ्याची ५ टक्के भौतिक तपासणी पूर्ण करणे व करभरणा केलेल्या शेतकऱ्यांच्या प्राप्त माहितीनुसार त्यांना दिलेल्या लाभाची वसुली करणे आदी करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार तालुक्यात मोहीम राबविण्यात आली.

तालुक्यात करभरणा करणारे अपात्र लाभार्थी ४८५ असल्याचे समोर आले आहे.अशा अपात्र लाभार्थ्यानी ४६ लाख २२ हजार रक्कम उचलली असून त्यांच्याकडून वसुली करण्यात येत आहे.आतापर्यंत २६ जणांकडून २ लाख ३४ हजार रक्कम वसूल करण्यात आली आहे. वसुली प्रक्रिया जलदगतीने केली जात आहे. फौजदारी कार्यवाही करण्याच्या भितीने अपात्र असलेल्या नागरिकांत धडकी भरली आहे .इतर अपात्र लाभार्थी संख्या १३४ आहे.त्यांची वसुली रक्कम ११ लाख ५८ हजार अशी आहे.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या आधार देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे.तालुक्यात एकूण लाभार्थी संख्या ४६ हजार २५८ आहे .लाभार्थ्यांना दर चार महिन्यांंना प्रति लाभार्थी २ हजार प्रमाणे वर्षाला ६ हजार दिले जातात.आतापर्यंत कोट्यवधी रूपये वितरित करण्यात आले आहेत.सामान्य शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या योजनेला काहींनी सुरूंग लावला असल्याचे बोलले जात आहे.परंतु शासनाने अशांना शोधून वसुलीचा बडगा उगारला आहे.आणि भरणा केला नाही तर फौजदारी कार्यवाही करण्याची सक्त ताकीद दिली आहे. अपात्र लाभार्थ्यांनी तत्काळ लाभ घेतलेल्या रक्कम शासनास परत करावी अन्यथा फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंढे व नायब तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली.