शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

पी.एम.किसान सन्मान निधी योजनाः

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:12 IST

अपात्र लाभार्थी यांचेकडून ५७ लाख ७० हजार होणार वसूल कंधारः तालुक्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत करभरणा ...

अपात्र लाभार्थी यांचेकडून ५७ लाख ७० हजार होणार वसूल

कंधारः तालुक्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत करभरणा करणारे व इतर अशा ६१९ अपात्र लाभार्थ्यांचा शिरकाव झाला आहे. असा योजनेचा लाभ घेतला असलेल्यांकडून ५७ लाख ७० हजार वसुली केली जाणार आहे.आतापर्यंत २६ खातेदारांनी २ लाख ३४ हजार रू.भरणा केला असल्याचे समोर आले आहेत. रक्कमा न भरणाऱ्यांवर फौजदारी कार्यवाही केली जाणार असल्याच्या भितीने अपात्र असलेल्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

तालुक्यात जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पंधरवड्यात विशेष मोहीम राबविण्यात आली.त्यात विविध स्तरावर दुरूस्तीसाठी प्रलंबित असलेला डाटामध्ये आवश्यक ती दुरूस्ती करून निकाली काढणे ,पी.एम.किसान पोर्टलवरील लाभार्थ्याची ५ टक्के भौतिक तपासणी पूर्ण करणे व करभरणा केलेल्या शेतकऱ्यांच्या प्राप्त माहितीनुसार त्यांना दिलेल्या लाभाची वसुली करणे आदी करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार तालुक्यात मोहीम राबविण्यात आली.

तालुक्यात करभरणा करणारे अपात्र लाभार्थी ४८५ असल्याचे समोर आले आहे.अशा अपात्र लाभार्थ्यानी ४६ लाख २२ हजार रक्कम उचलली असून त्यांच्याकडून वसुली करण्यात येत आहे.आतापर्यंत २६ जणांकडून २ लाख ३४ हजार रक्कम वसूल करण्यात आली आहे. वसुली प्रक्रिया जलदगतीने केली जात आहे. फौजदारी कार्यवाही करण्याच्या भितीने अपात्र असलेल्या नागरिकांत धडकी भरली आहे .इतर अपात्र लाभार्थी संख्या १३४ आहे.त्यांची वसुली रक्कम ११ लाख ५८ हजार अशी आहे.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या आधार देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे.तालुक्यात एकूण लाभार्थी संख्या ४६ हजार २५८ आहे .लाभार्थ्यांना दर चार महिन्यांंना प्रति लाभार्थी २ हजार प्रमाणे वर्षाला ६ हजार दिले जातात.आतापर्यंत कोट्यवधी रूपये वितरित करण्यात आले आहेत.सामान्य शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या योजनेला काहींनी सुरूंग लावला असल्याचे बोलले जात आहे.परंतु शासनाने अशांना शोधून वसुलीचा बडगा उगारला आहे.आणि भरणा केला नाही तर फौजदारी कार्यवाही करण्याची सक्त ताकीद दिली आहे. अपात्र लाभार्थ्यांनी तत्काळ लाभ घेतलेल्या रक्कम शासनास परत करावी अन्यथा फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंढे व नायब तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली.