शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पी.एम.किसान सन्मान निधी योजनाः

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:12 IST

अपात्र लाभार्थी यांचेकडून ५७ लाख ७० हजार होणार वसूल कंधारः तालुक्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत करभरणा ...

अपात्र लाभार्थी यांचेकडून ५७ लाख ७० हजार होणार वसूल

कंधारः तालुक्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत करभरणा करणारे व इतर अशा ६१९ अपात्र लाभार्थ्यांचा शिरकाव झाला आहे. असा योजनेचा लाभ घेतला असलेल्यांकडून ५७ लाख ७० हजार वसुली केली जाणार आहे.आतापर्यंत २६ खातेदारांनी २ लाख ३४ हजार रू.भरणा केला असल्याचे समोर आले आहेत. रक्कमा न भरणाऱ्यांवर फौजदारी कार्यवाही केली जाणार असल्याच्या भितीने अपात्र असलेल्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

तालुक्यात जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पंधरवड्यात विशेष मोहीम राबविण्यात आली.त्यात विविध स्तरावर दुरूस्तीसाठी प्रलंबित असलेला डाटामध्ये आवश्यक ती दुरूस्ती करून निकाली काढणे ,पी.एम.किसान पोर्टलवरील लाभार्थ्याची ५ टक्के भौतिक तपासणी पूर्ण करणे व करभरणा केलेल्या शेतकऱ्यांच्या प्राप्त माहितीनुसार त्यांना दिलेल्या लाभाची वसुली करणे आदी करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार तालुक्यात मोहीम राबविण्यात आली.

तालुक्यात करभरणा करणारे अपात्र लाभार्थी ४८५ असल्याचे समोर आले आहे.अशा अपात्र लाभार्थ्यानी ४६ लाख २२ हजार रक्कम उचलली असून त्यांच्याकडून वसुली करण्यात येत आहे.आतापर्यंत २६ जणांकडून २ लाख ३४ हजार रक्कम वसूल करण्यात आली आहे. वसुली प्रक्रिया जलदगतीने केली जात आहे. फौजदारी कार्यवाही करण्याच्या भितीने अपात्र असलेल्या नागरिकांत धडकी भरली आहे .इतर अपात्र लाभार्थी संख्या १३४ आहे.त्यांची वसुली रक्कम ११ लाख ५८ हजार अशी आहे.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या आधार देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे.तालुक्यात एकूण लाभार्थी संख्या ४६ हजार २५८ आहे .लाभार्थ्यांना दर चार महिन्यांंना प्रति लाभार्थी २ हजार प्रमाणे वर्षाला ६ हजार दिले जातात.आतापर्यंत कोट्यवधी रूपये वितरित करण्यात आले आहेत.सामान्य शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या योजनेला काहींनी सुरूंग लावला असल्याचे बोलले जात आहे.परंतु शासनाने अशांना शोधून वसुलीचा बडगा उगारला आहे.आणि भरणा केला नाही तर फौजदारी कार्यवाही करण्याची सक्त ताकीद दिली आहे. अपात्र लाभार्थ्यांनी तत्काळ लाभ घेतलेल्या रक्कम शासनास परत करावी अन्यथा फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंढे व नायब तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली.