शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

नांदेडातच नव्हे, तर राज्यभरात खड्डे... चंद्रकांत पाटलांची देण... ते बुजविण्याचे काम सुरू : अशोकराव चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:23 IST

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील रस्त्यांचा समावेश आहे. ...

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील रस्त्यांचा समावेश आहे. खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. टप्प्याटप्प्याने कामे करून नांदेडकरांसह राज्यातील जनतेचा प्रवास सुखमय व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत अशोकराव चव्हाण म्हणाले, आरक्षणास काँग्रेसचे समर्थनच आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा आरक्षण कसे देता येईल, या अनुषंगाने राज्य शासनास जे जे काही करता येईल, ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच संभाजीराजेंचा मी नेहमीच आदर केलेला आहे. त्यांची आणि माझी मुंबईत भेट झाली. आरक्षणाबाबत गटनेत्यांसह घटक पक्षातील सर्व नेत्यांची भेट घेतली.

चौकट....

चार जिल्ह्यांची आढावा बैठक

नांदेडात २४ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता भक्ती लॉन्स येथे नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर सकाळी दहा वाजता कुसुम सभागृह येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या प्रारंभाचे औचित्य साधून व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाए संविधान याअंतर्गत जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कट्टरतावाद अखंडतेला घातक

भाजप धर्मवाद आणि कट्टरतावादाकडे देशाला घेऊन जात आहे. ही बाब लोकशाहीसह देशाच्या अखंडता आणि एकात्मतेसाठी घातक आहे. त्याला वेळोवेळी सडेतोड उत्तर देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळेच काँग्रेसची आयडालॉजी पुन्हा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम काँग्रेसने हाती घेतले आहे. नवतरुणांना स्वातंत्र्याचा खरा इतिहास कळावा यासाठीही काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.

पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचाच उमेदवार

महाविकास आघाडीच्या धोरणात्मक निर्णयानुसार ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार होता, त्या ठिकाणी त्याच पक्षाचा उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार राहील आणि तो शंभर टक्के विजयी होईल, असा विश्वास अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.