शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कंधार तालुक्यातील ८ गावांतील प्रलंबित रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:12 IST

मरणानंतर रस्त्याअभावी होणारी हेळसांड थांबली कंधार : तालुक्यातील बारूळ येथील मातंग व बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा रस्ता अनेक वर्षांपासून रखडला ...

मरणानंतर रस्त्याअभावी होणारी हेळसांड थांबली

कंधार : तालुक्यातील बारूळ येथील मातंग व बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा रस्ता अनेक वर्षांपासून रखडला होता. १ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या समाजाची प्रेत घेऊन जाताना होणारी हेळसांड थांबली आहे. तसेच इतर ७ गावांतील रस्ता व पाणंद रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात तहसील कार्यालयाला यश आले आहे.

तालुक्यातील अनेक गावांत लहानशी कारणे, स्थानिक राजकारण, हेवेदावे, काहीची अडवणुकीची असलेली भूमिका, भाऊबंदकीत असलेली टोकाची भूमिका आदींनी रस्त्याचा प्रश्न गुंतागुंतीचा होत असतो. गावात हा प्रश्न मिटत नसतो. काही जण न्यायालयात प्रकरण दाखल करतात. त्यामुळे सामान्य जणांची मोठी अडचण होते. माणुसकी व संवेदनशीलता असलेले अधिकारी व माणसे यातून सामोपचाराने मार्ग काढतात. तसेच तहसीलदार यांना असलेल्या अधिकाराचा उपयोग करून दिलासा दिला जातो. त्यामुळे प्रलंबित रस्त्याचे प्रश्न निकाली काढले.

बारूळ येथील बौद्ध व मातंग समाजाला स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याची मोठी समस्या होती.

मामलेदार १९०५ च्या पोटकलम ५ नुसार रस्त्याचा प्रश्न तहसीलदार यांनी सोडवत दोन्ही समाजाला मोठा दिलासा दिला. पावसाळ्यात मृत व्यक्तीवर करायचे अंत्यसंस्कार जोखमेचे होते. ऑक्टोबर २०२० मध्ये जटिल प्रश्न सुटला. तसेच याच गावातील एक पारंपरिक सुमारे १९६० पासूनचा पाणंद रस्त्याचा प्रश्न नोव्हेंबरमध्ये सुटला. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

उस्माननगर येथील २ रस्त्यांचे प्रश्न होते. तो प्रश्न नोव्हेंबर २०२० मध्ये सोडविण्यात आल्याने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला. दहीकळंबा येथील सुमारे १० कि.मी.पेक्षा जास्त असे ४ ते ५ रस्त्यांचे प्रश्न होते. मंत्री स्तरावर प्रश्न गेल्याचे समजते. हा प्रश्न सप्टेंबर २०२० मध्ये सोडविण्यात आला. पानभोसी येथील ४०० ते ५०० मीटरचा रस्ता प्रश्न सोडविल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पानशेवडी येथील दीड ते दोन कि.मी.चा रस्ता नोव्हेंबर २०२० मध्ये रस्ता प्रश्न सुटला. त्यामुळे नागरिक, पशुधनाला दिलासा मिळाला.

कारतळा येथील १९७२ पासूनचा पाणंद रस्ता तयार करण्यात आला. रस्ता अडचणीमुळे शेतकरी, शेतमजूर, पशुधनाची होणारी फरपट थांबली. २ कि.मी.चा हा रस्ता पालकमंत्री पाणंद रस्त्यात मंजुरी आणून १ लाखातून करण्यात आला. सोमठाणा येथील रस्ता वादाने अडचण येत होती. हा प्रश्न सोडवून पालकमंत्री पाणंद रस्त्याचा प्रस्ताव दाखल करण्याची सूचना करण्यात आली. तसेच गुटेवाडी ते जयराम तांडा हा २ कि.मी.चा रस्ता पालकमंत्री पाणंद रस्त्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या सूचना उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार व काही काळ प्रभारी तहसीलदार असलेले विजय चव्हाण, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या सहकार्याने, स्थानिक लोकप्रतिनिधी व विशेषतः नागरिकांच्या विधायक भूमिकेने रस्ते प्रश्न ३ महिन्यांत सुटण्यास मदत मिळाली.