शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विष्णूपुरी पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:57 IST

पाणीपुरवठा विभागाने ३ कोटी २२ लाख ९४ हजार रुपयांच्या सुधारित किंमतीच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देसुधारित मान्यताथकीत वीज देयकामुळे बंद पडलेल्या योजना सुरू करा

नांदेड : विष्णूपुरी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे काम वाढत्या खर्चामुळे रखडले होते. मात्र या योजनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पाणीपुरवठा विभागाने ३ कोटी २२ लाख ९४ हजार रुपयांच्या सुधारित किंमतीच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १२ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे वीज बील थकीत आहे. देगलूर तालुका दुष्काळी जाहीर झाल्याने यातील दोन योजनांचे थकीत वीज बील भरण्यासाठी शासनाची मदत होणार आहे. अशीच मदत इतर योजनांसाठीही मिळण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ३ कोटी ९ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या विष्णूपुरी नळ पाणी पुरवठा योजनेच्या मुळ अंदाजपत्रकास डिसेंबर २०१४ मध्ये अधीक्षक अभियंता भारत निर्माण कक्ष औरंगाबाद यांनी मूळ तांत्रिक मान्यता दिलेली आहे. मात्र योजनेच्या कामात वाढ झाल्याने योजनेचा खर्चही वाढला. त्यामुळे या योजनेसाठीचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागातर्फे पाठविण्यात आला होता. त्यानुसार आता या योजनेच्या ३ कोटी २२ लाख ९४ हजा १०० रुपये एवढ्या सुधारित किंमतीच्या अंदाजपत्रकास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सदर योजना पूर्ण झाल्यानंतर ती संबंधित ग्रामपंचायतीच्या ताब्यात देणार येणार आहे.या मान्यतेमुळे विष्णूपुरी ग्रामस्थांच्या पाणी टंचाईचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.सद्य:स्थितीत पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेत विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. थकीत वीज बिलामुळे पाणी पुरवठा योजनावर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील १२ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे ३ कोटी ७६ लाख ६० हजार ७९८ रुपये वीज बील थकीत आहे. यात नांदेड तालुक्यातील तुप्पा, राहटी, लिंबगाव सायाळ आणि कौठा या चार योजनांचा समावेश आहे. तर मुदखेड तालुक्यातील मुगट आणि रोहीपिंपळगाव या दोन योजना, भोकर तालुक्यातील रेणापूर, लोहा तालुक्यातील मालेगाव लिंबोटी, कंधार तालुक्यातील दिग्रस, माहूर तालुक्यातील वानोळा आणि देगलूर तालुक्यातील वन्नाळी-वझरगा, बेंबरा या योजनांचा समावेश आहे. ३१ आॅक्टोबर रोजी राज्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर २६८ महसुली मंडळात ६ नोव्हेंबर रोजी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या भागातील ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांची प्रलंबित थकीत विद्युत देयकांच्या मुद्दल रक्कमेपैकी ५ टक्के रक्कम मदत व पुनर्वसन विभागाकडून भरुन सदर योजनांचा खंडीत वीज पुरवठा सुरू करण्याचे निर्देश महसूल विभागाने दिलेले असल्याने याचा फायदा देगलूर तालुक्यातील दोन पाणी पुरवठा योजनांचा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वच १२ योजनांचे थकीत देयके शासनाने भरण्याबाबत लोकप्रतिनिधींनी आग्रह धरण्याची गरज व्यक्त होत आहे.पाणीपट्टी : आता वैयक्तिक हमीपत्र घेणारग्रामीण भागातील लाभार्थ्याकडून पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे योजनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च भागविणे शक्य होत नाही. पर्यायाने अनेक योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा मुळ उद्देश असफल ठरुन योजनेवर करण्यात आलेला भांडवली खर्चही वाया जात असल्याने पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीतही ग्रामस्थांचा सहभाग घेण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. त्यानुसार योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी गावातील घरमालकांकडून पाणीपट्टी व मिटरजोडणीबाबत वैयक्तिक हमीपत्र घेण्यात येणार आहे. तशा सूचना पाणी पुरवठा विभागाने सर्व जिल्हा परिषदांना दिल्या आहेत.जिल्ह्यात ३५ अधिग्रहणेसंभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग सतर्क झाला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात दोन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून ३५ स्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणwater transportजलवाहतूक