शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

ग्यानमाता शाळेवर धडकला पालकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:48 IST

नांदेड : कोरोना महामारीमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला असताना बहुतांश इंग्रजी शाळांकडून शुल्क वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. या विरोधात ...

नांदेड : कोरोना महामारीमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला असताना बहुतांश इंग्रजी शाळांकडून शुल्क वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. या विरोधात पालकांनी ग्यानमाता विद्याविहार शाळेवर मोर्चा काढत शाळा प्रशासनाला धारेवर धरले. बहुतांश शिक्षकांना पगार नाही, इतर खर्चही बंद, मग संपूर्ण शुल्क कशासाठी, असा सवाल पालकांनी उपस्थित केला. नांदेड शहरात असलेल्या बहुतांश इंग्रजी शाळांनी कोरोनाच्या काळातही ऑनलाइन धडे देण्याचे काम केले. त्यात काही शाळांनी केवळ शुल्कवसुली डोळ्यासमोर ठेवून ऑनलाइन व्हिडिओ अपलोड करणे, झूमद्वारे मीटिंग घेऊन विद्यार्थ्यांना धडे दिले; परंतु त्याचा विद्यार्थ्यांना फारसा फायदा झाला नाही. उलट मोबाईल दिल्याने बहुतांश विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर परिणाम झाला. विद्यार्थ्यांना सोशल मीडियाची सवय लागली. शाळांकडून परीक्षा घेण्यात आल्या; परंतु विद्यार्थ्यांना पुस्तकातून पाहून उत्तर लिहिण्याची मुभा देण्यात आली. हा सर्व प्रकार केवळ शाळांचे शुल्क वसुलीसाठी होता, असा आरोप उपस्थित पालकांनी केला.

नांदेड शहरातील इंग्रजी शाळांकडून कोरोना काळात ऑनलाइन शिकवणी वर्ग घेतले. दरम्यान, काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला; परंतु बहुतांश शाळांनी केवळ झूम, व्हाॅटस्‌ॲपचा वापर करून औपचारिकता पूर्ण केली. त्यात विद्यार्थ्यांना फारसा उपयोग झाला नाही. शाळा बंद असल्याचे कारण देत शिक्षकांचेही पगार दिले नाही. काही शिक्षकांना ऑनलाइनच्या कामासाठी बोलावले. त्यांना केवळ ५० टक्के पगार दिला जात आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही नाराज आहेत. शाळेतील संपूर्ण शिक्षकांना पूर्ण पगार दिला जात नाही, मग विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क कसे वसूल करता, असा सवालही पालकांनी केला. ऑफलाइन वर्ग सुरू असताना लागणारा खर्च शाळा प्रशासनाला लागत नाही. केवळ ऑनलाइनसाठी मोजके शिक्षक आणि इतर साधनसामग्रीचा खर्च येतो. हा खर्च उचलण्यास आम्हीही तयार असल्याचे पालकांनी सांगितले. जोपर्यंत ऑफलाइन शाळा सुरू होत नाही तोपर्यंत ५० टक्के शुल्क घेऊनच विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, अशी मागणी पालकांच्या शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाकडे केली आहे. त्याचबरोबर ऑनलाइन व्हिडिओ, ऑडिओ आणि नेटवर्कच्या अडचणी दूर कराव्यात, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी शेकडो पालक उपस्थित होते. कोरोनामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या पालकांचा विचार करून शाळा प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे.