शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

हदगाव तालुक्यातील पळसा कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:58 IST

बरडशेवाळा येथील फुटलेला कालवा दुरुस्त करून २६ जानेवारीला पुन्हा त्यातून पाणी सोडले़ दोन दिवसानंतर पळसा येथील साखळी क्रमांक ३८ फुटून चार हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले़ कालवा पुन्हा फुटण्याची शक्यता असतानाही पाणी सोडले व कालवा फुटून गुराढोरांना मिळणारे पाणी वाया गेले़

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : बरडशेवाळा येथील फुटलेला कालवा दुरुस्त करून २६ जानेवारीला पुन्हा त्यातून पाणी सोडले़ दोन दिवसानंतर पळसा येथील साखळी क्रमांक ३८ फुटून चार हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले़ कालवा पुन्हा फुटण्याची शक्यता असतानाही पाणी सोडले व कालवा फुटून गुराढोरांना मिळणारे पाणी वाया गेले़८ जानेवारी रोजी बरडशेवाळा येथे कालवा फुटून सात हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले होते़ त्यानंतर १७ दिवस काम सुरू होते़ २४ जानेवारी रोजी काम संपल्यानंतर २६ जानेवारीला पुन्हा पाणीपाळी देण्यात आली़ दोन दिवस चार ते सहा क्यूमेक्स पाणी प्रवाह असल्याने पाणी बरेच लांबपर्यंत गेले़ शेवटपर्यंत पोहोचलेही; पण आज सोमवारी पाण्याचा प्रवाह वाढविताच पळसा येथे मोठे भगदाड पडून चार हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले़सोमवारी सकाळी ७़३० वाजता कालवा फुटला, त्यानंतर दुपारी १२ वाजता वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले व मातीचे पोते भरून संथगतीने भगदाड बुजविण्याचा प्रयत्न केला, पाणी प्रवाह बंद केले तरीही सायंकाळी पाचपर्यंत पाण्याचा प्रवाह जोरात होता़ त्यामुळे नाल्याला पाणी वाहत होते़ दुपारी मात्र जेसीबी बोलावून काम सुरू केले़ कालवा फुटण्याची कारणमीमांसा वरिष्ठ अधिका-यांना बोचरी लागली असली तरी ‘२८ ठिकाणी कालवा फुटण्याचा धोका कायम’ असे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वीच छापले होते़ दोनच दिवसांत पुन्हा कालवा फुटला़याविषयी नांदेड विभागाचे कार्यकारी अभियंता कुरुंदकर यांनी शेतकºयांना दोष देत त्यांनीच हा प्रकार केला असावा असा अंदाज व्यक्त केला़ परंतु साखळी क्ऱ३८-३७ मध्ये बाभूळ, उमर, लिंब यांचे मोठमोठी झाडे आहेत़ त्यांची मुळे खोल जावून कालव्याला छिद्रे पडली़ याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले़बरडशेवाळा कालवा फुटला की फोडला या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने छापले़ त्याविषयी कुरुंदकर यांनी आम्ही कशाला फोडू कालवा? असा सवाल केला. शेतक-यांनी फोडला तर त्यांच्यावर कारवाई का नाही करत? या प्रश्नावरही त्यांनी मौन बाळगले़ जमा झालेल्या सर्व शेतक-यांना व कर्मचा-यांना बोलण्यास मज्जाव करून कामास लावले़धरणामध्ये १३ टक्केच पाणीसाठा असताना दोन पाणीपाळ्या सोडल्या व दोन्ही वेळा कालवा फुटून ते वाया गेले़ याला जबाबदार शेतकरी की कर्मचारी-अधिकारी? कालव्यामध्ये फुटलेली झाडे तीन-चार वर्षे वयाची आहेत़ दरवर्षी कामासाठी निधी खर्च दाखविला जातो़ वृक्षाची तोड का केली जात नाही? दोन्ही ठिकाणी फुटलेला कालवा नाल्याजवळच कसा काय फुटला? शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले नाही, पण आजूबाजूचे बंधारे भरून गेले़ २६ जानेवारीला सोडलेले पाणी गुराढोरांसाठी व पाणीपुरवठा योजनेची पाणीपातळी वाढण्यासाठी सोडले होते, तेही मध्येच बंद झाले़