शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
2
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
3
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
4
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
5
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
6
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
7
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
8
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
9
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
10
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
11
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
12
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
13
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
14
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
15
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
16
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
17
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
18
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
19
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
20
डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

हदगाव तालुक्यातील पळसा कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:58 IST

बरडशेवाळा येथील फुटलेला कालवा दुरुस्त करून २६ जानेवारीला पुन्हा त्यातून पाणी सोडले़ दोन दिवसानंतर पळसा येथील साखळी क्रमांक ३८ फुटून चार हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले़ कालवा पुन्हा फुटण्याची शक्यता असतानाही पाणी सोडले व कालवा फुटून गुराढोरांना मिळणारे पाणी वाया गेले़

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : बरडशेवाळा येथील फुटलेला कालवा दुरुस्त करून २६ जानेवारीला पुन्हा त्यातून पाणी सोडले़ दोन दिवसानंतर पळसा येथील साखळी क्रमांक ३८ फुटून चार हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले़ कालवा पुन्हा फुटण्याची शक्यता असतानाही पाणी सोडले व कालवा फुटून गुराढोरांना मिळणारे पाणी वाया गेले़८ जानेवारी रोजी बरडशेवाळा येथे कालवा फुटून सात हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले होते़ त्यानंतर १७ दिवस काम सुरू होते़ २४ जानेवारी रोजी काम संपल्यानंतर २६ जानेवारीला पुन्हा पाणीपाळी देण्यात आली़ दोन दिवस चार ते सहा क्यूमेक्स पाणी प्रवाह असल्याने पाणी बरेच लांबपर्यंत गेले़ शेवटपर्यंत पोहोचलेही; पण आज सोमवारी पाण्याचा प्रवाह वाढविताच पळसा येथे मोठे भगदाड पडून चार हजार क्यूमेक्स पाणी वाया गेले़सोमवारी सकाळी ७़३० वाजता कालवा फुटला, त्यानंतर दुपारी १२ वाजता वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले व मातीचे पोते भरून संथगतीने भगदाड बुजविण्याचा प्रयत्न केला, पाणी प्रवाह बंद केले तरीही सायंकाळी पाचपर्यंत पाण्याचा प्रवाह जोरात होता़ त्यामुळे नाल्याला पाणी वाहत होते़ दुपारी मात्र जेसीबी बोलावून काम सुरू केले़ कालवा फुटण्याची कारणमीमांसा वरिष्ठ अधिका-यांना बोचरी लागली असली तरी ‘२८ ठिकाणी कालवा फुटण्याचा धोका कायम’ असे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वीच छापले होते़ दोनच दिवसांत पुन्हा कालवा फुटला़याविषयी नांदेड विभागाचे कार्यकारी अभियंता कुरुंदकर यांनी शेतकºयांना दोष देत त्यांनीच हा प्रकार केला असावा असा अंदाज व्यक्त केला़ परंतु साखळी क्ऱ३८-३७ मध्ये बाभूळ, उमर, लिंब यांचे मोठमोठी झाडे आहेत़ त्यांची मुळे खोल जावून कालव्याला छिद्रे पडली़ याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले़बरडशेवाळा कालवा फुटला की फोडला या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने छापले़ त्याविषयी कुरुंदकर यांनी आम्ही कशाला फोडू कालवा? असा सवाल केला. शेतक-यांनी फोडला तर त्यांच्यावर कारवाई का नाही करत? या प्रश्नावरही त्यांनी मौन बाळगले़ जमा झालेल्या सर्व शेतक-यांना व कर्मचा-यांना बोलण्यास मज्जाव करून कामास लावले़धरणामध्ये १३ टक्केच पाणीसाठा असताना दोन पाणीपाळ्या सोडल्या व दोन्ही वेळा कालवा फुटून ते वाया गेले़ याला जबाबदार शेतकरी की कर्मचारी-अधिकारी? कालव्यामध्ये फुटलेली झाडे तीन-चार वर्षे वयाची आहेत़ दरवर्षी कामासाठी निधी खर्च दाखविला जातो़ वृक्षाची तोड का केली जात नाही? दोन्ही ठिकाणी फुटलेला कालवा नाल्याजवळच कसा काय फुटला? शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले नाही, पण आजूबाजूचे बंधारे भरून गेले़ २६ जानेवारीला सोडलेले पाणी गुराढोरांसाठी व पाणीपुरवठा योजनेची पाणीपातळी वाढण्यासाठी सोडले होते, तेही मध्येच बंद झाले़