शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

सेंद्रिय पद्धतीच्या पेरूची बाग बहरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:34 IST

अल्पशिक्षित गणेशची साक्षर शेती माहूर : रासायनिक खतांचे अनेक दुष्परिणाम समोर येऊ लागल्यानंतर आता प्रयोगशील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू ...

अल्पशिक्षित गणेशची साक्षर शेती

माहूर : रासायनिक खतांचे अनेक दुष्परिणाम समोर येऊ लागल्यानंतर आता प्रयोगशील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. सेंद्रिय शेतीतून निघणाऱ्या फळे व भाज्यांना बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन माहूर तालुक्यातील आष्टा येथील गणेश वंजारे या युवा शेतकऱ्याने केवळ ३० गुंठे क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने पेरूच्या रोपांची लागवड केली. कुठल्याही रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने पेरूची बाग बहरली आहे.

सध्या पेरूची तोडणी सुरू झाली आहे. बाजारपेठेत प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर मिळत आहे. यातून एक लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळेल, असा त्यांना विश्वास आहे. कुठल्याही क्षेत्रात सध्या नोकरीचा हमी उरलेली नाही. त्यामुळेच उच्चशिक्षित तरुण शेतीकडे वळू लागले आहेत. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत तरुण शेतकरी विशेषकरून फळ शेतीकडे वळू लागले आहेत. यांचाही पुढे जात सेंद्रिय शेतीस प्राधान्य देऊ लागले आहेत. माहूर तालुक्यातील आष्टा येथील गणेश विठ्ठलराव वंजारे यांनी आपल्या ३० गुंठे क्षेत्रात १५ बाय १५ च्या अंतरावर थाय जी १ जातीच्या सुमारे १५० रोपांची लागवड १० ऑगस्ट २०१८ ला केली आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करायचा नाही, असा त्यांनी निर्धार केला होता. त्यानुसार रासायनिक खतांचा फाटा देत सेंद्रिय खताचा वापर केला. सध्या पेरू तोडणीला आले आहेत. आजवर दहा क्विंटल पेरू निघाले आहेत. प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर मिळत आहे. या माध्यमातून आजवर ४० हजार रुपये उत्पन्न हाती पडले आहे. ३० गुंठे क्षेत्रातून आणखी किमान पंधरा क्विंटल पेरू निघतील. स्थानिक बाजारपेठेतील सध्याचा दर कायम राहिल्यास वंजारे यांना खर्च वजा जाता किमान एक लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळेल, असा दावा शेतकऱ्याकडून करण्यात आला आहे. इतर तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रतिक्रीया

मी तीस गुंठे क्षेत्रात पेरूची बाग फुलवली आहे. कुठल्याही रासायनिक खतांचा वापर केला नाही. सेंद्रिय खतांच्या जोरावर ही बाग फुलवली आहे. कुठल्याही केमिकलचा वापर केला नसल्याने पेरूला मागणी अधिक होत आहे - गणेश विठ्ठलराव वंजारे, शेतकरी, आष्टा, ता.माहूर.