शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पीक विमा कंपन्यांच्या नफ्यावर निर्बंध हवेत, तरच शेतकऱ्यांना कंपन्या योग्य मोबदला देतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:19 IST

लोकमत वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष पुरवणीच्या प्रकाशन निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे प्रतोद ...

लोकमत वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष पुरवणीच्या प्रकाशन निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, महापौर मोहिनी येवनकर, विजय येवनकर, काँग्रेस प्रवक्ता संतोष पांडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पीक विमा आणि आणेवारी पद्धतीचा संबंध नाही, त्याचबरोबर ज्या निकषातून पीक विमा दिला जातो, त्यामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना मोबदला मिळत नाही. तसेच शासनाच्या वतीने बसविण्यात आलेल्या हवामान मोजणी यंत्रात नेहमीच काहीतरी तांत्रिक बिघाड असतो, अथवा ही यंत्रे हवेच्या विरुद्ध दिशेेने बसविलेली असतात. त्यामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आराेपही माजी मंत्री सावंत यांनी केला. पंतप्रधान पीक विमा योजनेचे निकष पसंत नसल्याने गुजरातसह अनेक राज्यांनी त्यांच्या राज्यात ही योजना लागू करण्यास नकार दिला आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने बीड पॅटर्न स्वीकारणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय आहे बीड पॅटर्न? शेतकरी बांधवांनी पीक विमा काढल्यानंतर त्यात १.५ टक्के ते २ टक्के हिस्सा शेतकरी भरतो. जर १०० कोटी प्रीमियम शेतकऱ्यांना भरावा लागला तर ५० कोटी रुपये नुकसानभरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागली. उर्वरित ५० कोटींमध्ये कंपनीचा नफा अधिक प्रशासकीय खर्च धरुन २० कोटी कंपनीला राहतील. उर्वरित ३० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या विकासासाठी वापरण्यासाठी कंपनीनं राज्य सरकारला द्यावेत. या उलट ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येईल. त्यावेळी १०० कोटी प्रीमियम मिळालेल्या कंपनीला १५० कोटी खर्च करायचे असतील त्यावेळी कंपनीने ११० कोटी द्यावेत, राज्य सरकार वरचे ४० कोटी रुपये कंपन्यांना देईल. हा पॅटर्न बीड जिल्ह्यात राबवण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा मिळताना बीड पॅटर्नप्रमाणे मिळावा अशी शिफारस केंद्राकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.