शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

किनवट येथे पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST

राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्याच्या आदिवासी भागातील आरोग्य परिस्थितीचा तसेच कुपोषण व कोरोना ...

राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्याच्या आदिवासी भागातील आरोग्य परिस्थितीचा तसेच कुपोषण व कोरोना संदर्भात आढावा घेण्यात आला. कोरोनाच्या तिसरी लाट लक्षात घेऊन आरोग्य खात्यातील रिक्त जागा भरणे, पोषण आहार मुलांपर्यंत पोहचविणे, आजारी मुलांची विशेष काळजी घेणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. मराठवाड्याचे आदिवास भाग म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या किनवट व माहूर तालुका संबंधी या समितीचे सदस्य डॉ. बेलखोडे यांनी या भागातील प्रश्न मांडले. आदिवासी समाजात अंधश्रद्धा व गैरसमज जास्त प्रमाणात असल्यामुळे जनजागरण व समुपदेशन सारखे कार्यक्रम हातात घेणे तसेच गरजेेचे वैद्यकीय उपचारासाठी दीडशे किमी अंतर पार करावे लागत असल्याने किनवट व माहूर येथे तज्ज्ञांच्या उपचार सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रधान सचिवांना सांगण्यात आले. कुपोषण कमी करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र नांदेड येथे कागदोपत्री कार्यरत आहे. हे केंद्र किनवट येथे कार्यान्वित करून आदिवासी जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दूरचित्रसंवादाद्वारे झालेल्या या बैठकीस आरोग्य खात्याचे सचिव व्यास, माता बाल संगोपन खात्याचे सचिव डॉ. अभय बंग, संचालक डॉ. तात्याराव लहाने, पाैर्णिमा उपाध्याय, ब्रायन लोबो, बंड्या साने, डॉ. अशोक बेलखोडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर आदी उपस्थित हाेते.