शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

नांदेड शहराला आजपासून तीन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:17 IST

विष्णूपुरी प्रकल्पात दिवसेंदिवस होणारी पाण्याची घट पाहता नांदेड शहराला २५ एप्रिलपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ठळक मुद्देविष्णूपुरी : दरदिवशी सुरु आहे ०.३२ दलघमी पाण्याचा उपसा

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात दिवसेंदिवस होणारी पाण्याची घट पाहता नांदेड शहराला २५ एप्रिलपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ऐन उन्हाळ्यात शहरवासियांना पाण्यासाठी आता दोनऐवजी तीन दिवसांची वाट पहावी लागणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला बाष्पीभवन, शेतीसाठी उपसा, औद्योगिक वापर यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातून दररोज ०.३२ दलघमी पाणी उपसले जात आहे. या सर्व पाणी उपशामुळे विष्णूपुरीतील उपलब्ध जलसाठा पाहता शहराला मे अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे २५ एप्रिलपासून नांदेड शहरात २ दिवसांऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी घेतला आहे.महापालिकेने शहरासाठी विष्णूपुरी प्रकल्पात ३२ दलघमी पाणी राखीव केले होते. शहराला दरवर्षी ३२.४० दलघमी पाणी आवश्यक आहे. आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात ९.४५ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. शहराला दरमहा २.७० दलघमी पाणी आवश्यक आहे. मात्र प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेला उपसा यामुळे पाणी झपाट्याने कमी होत आहे. यावर आता उपाययोजना आवश्यक आहेत.विष्णूपुरीसह नांदेड शहराला पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारेही पाणी दिले जाते. इसापूर प्रकल्पातून आतापर्यंत तीन पाणीपाळ्या घेतल्या आहेत. पहिली पाळी २० डिसेंबर २०१८ रोजी, दुसरी १ मार्च २०१९, तिसरी ३ मार्च आणि आता चौथी पाणीपाळी २५ एप्रिल रोजी घेण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविली आज बैठकविष्णूपुरीतील झपाट्याने कमी होत असलेला पाणी उपसा पाहता नांदेड शहराचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. मे अखेरपर्यंत कसेबसे पाणी उपलब्ध होईल. पण पावसाळा लांबला तर काय? हा प्रश्नही पुढे आला आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापालिकेसह पाटबंधारे विभाग, महावितरण, पोलीस आदी विभागांची बैठक बोलावली आहे.या बैठकीत जिल्हा प्रशासनाने विष्णूपुरीतून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष पथकांचाही आढावा घेतला जाणार आहे.इसापूरचे पाणी पोहोचणारपर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी सांगवी बंधाºयात इसापूर प्रकल्पाचे पाणी २४ एप्रिल रोजी सोडण्यात आले आहे. हे पाणी २५ एप्रिल रोजी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे. या पाण्यातून उत्तर नांदेडची जवळपास २५ दिवसांची तहान भागणार आहे. यामुळे विष्णूपुरीतून उपसा कमी होणार आहे.