शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहराला आजपासून तीन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:17 IST

विष्णूपुरी प्रकल्पात दिवसेंदिवस होणारी पाण्याची घट पाहता नांदेड शहराला २५ एप्रिलपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ठळक मुद्देविष्णूपुरी : दरदिवशी सुरु आहे ०.३२ दलघमी पाण्याचा उपसा

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात दिवसेंदिवस होणारी पाण्याची घट पाहता नांदेड शहराला २५ एप्रिलपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ऐन उन्हाळ्यात शहरवासियांना पाण्यासाठी आता दोनऐवजी तीन दिवसांची वाट पहावी लागणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला बाष्पीभवन, शेतीसाठी उपसा, औद्योगिक वापर यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातून दररोज ०.३२ दलघमी पाणी उपसले जात आहे. या सर्व पाणी उपशामुळे विष्णूपुरीतील उपलब्ध जलसाठा पाहता शहराला मे अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे २५ एप्रिलपासून नांदेड शहरात २ दिवसांऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी घेतला आहे.महापालिकेने शहरासाठी विष्णूपुरी प्रकल्पात ३२ दलघमी पाणी राखीव केले होते. शहराला दरवर्षी ३२.४० दलघमी पाणी आवश्यक आहे. आजघडीला विष्णूपुरी प्रकल्पात ९.४५ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. शहराला दरमहा २.७० दलघमी पाणी आवश्यक आहे. मात्र प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेला उपसा यामुळे पाणी झपाट्याने कमी होत आहे. यावर आता उपाययोजना आवश्यक आहेत.विष्णूपुरीसह नांदेड शहराला पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारेही पाणी दिले जाते. इसापूर प्रकल्पातून आतापर्यंत तीन पाणीपाळ्या घेतल्या आहेत. पहिली पाळी २० डिसेंबर २०१८ रोजी, दुसरी १ मार्च २०१९, तिसरी ३ मार्च आणि आता चौथी पाणीपाळी २५ एप्रिल रोजी घेण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविली आज बैठकविष्णूपुरीतील झपाट्याने कमी होत असलेला पाणी उपसा पाहता नांदेड शहराचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. मे अखेरपर्यंत कसेबसे पाणी उपलब्ध होईल. पण पावसाळा लांबला तर काय? हा प्रश्नही पुढे आला आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापालिकेसह पाटबंधारे विभाग, महावितरण, पोलीस आदी विभागांची बैठक बोलावली आहे.या बैठकीत जिल्हा प्रशासनाने विष्णूपुरीतून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष पथकांचाही आढावा घेतला जाणार आहे.इसापूरचे पाणी पोहोचणारपर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी सांगवी बंधाºयात इसापूर प्रकल्पाचे पाणी २४ एप्रिल रोजी सोडण्यात आले आहे. हे पाणी २५ एप्रिल रोजी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे. या पाण्यातून उत्तर नांदेडची जवळपास २५ दिवसांची तहान भागणार आहे. यामुळे विष्णूपुरीतून उपसा कमी होणार आहे.