शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
2
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
3
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
4
भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
5
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
6
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
7
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
8
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
9
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
10
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
11
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
12
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
13
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
15
झगमगाटाच्या जगात 'कंफर्ट फूड'चा विजय; न्यू इयरच्या रात्री फूड अँपवर ९,४१० लोकांची 'खिचडी'ला पसंती 
16
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
17
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
18
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
19
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
20
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
Daily Top 2Weekly Top 5

बिल वसुलीसाठी महावितरणच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:17 IST

कृषी पंपाची कोट्यवधी रुपयांची बिले शेतकऱ्यांकडे थकली आहेत. कोरोना तसेच सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांना शासनाकडून वीज बिल माफ होईल, अशी ...

कृषी पंपाची कोट्यवधी रुपयांची बिले शेतकऱ्यांकडे थकली आहेत. कोरोना तसेच सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांना शासनाकडून वीज बिल माफ होईल, अशी अपेक्षा आहे; परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही सवलत दिली नाही. मात्र, महावितरणकडून महाऊर्जा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशेष सवलतीची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, आज शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करत आहे. या अभियानात शेतकऱ्यांना सवलत देण्याबरोबरच त्यातील ३३ टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतीअंतर्गत खर्च करण्याचाही उपक्रम महावितरण राबवीत आहे.

महावितरणकडून शेतकऱ्यांना विशेष सवलत देऊन थकीत बिल भरण्यासाठी सोनेरी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेऊन आपल्या डोक्यावरील वीज बिलाची थकबाकी दूर करावी, तसेच महावितरणला सहकार्य करावे. काही शेतकरी चालू बिलदेखील भरत नाहीत. त्यामुळे चालू बिल भरण्यासाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

-संतोष वहाणे, मुख्य अभियंता, नांदेड

शासनाकडून वीज बिल माफ करण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे बिल माफ करावे, तसेच कृषी पंपांना सवलतीत वीज उपलब्ध करून देण्यात यावी.

-बालाजी नादरे, शेतकरी

महावितरणकडून ज्याप्रमाणे कृषी पंपाची वीज बिले भरण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे, त्याप्रमाणेच जे शेतकरी नियमितपणे वीज बिल भरणा करतात त्यांना विशेष मोहीम व उपक्रमाद्वारे नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा करावा. जेणेकरून वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.

-नीलेश जोगदंड, शेतकरी

बऱ्याच शेतकऱ्यांना आजपर्यंत महावितरणकडून पैसे भरूनही विज कनेक्शन देण्यात आले नाही. कोटेशन भरूनही वीजपुरवठा करण्यास महावितरणकडून दिरंगाई झाली असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या कोटेशनची रक्कम व्याजासह परत करून त्यांना मोफत कनेक्शन द्यावे.

-बालाजी काकडे, शेतकरी