शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

बिल वसुलीसाठी महावितरणच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:17 IST

कृषी पंपाची कोट्यवधी रुपयांची बिले शेतकऱ्यांकडे थकली आहेत. कोरोना तसेच सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांना शासनाकडून वीज बिल माफ होईल, अशी ...

कृषी पंपाची कोट्यवधी रुपयांची बिले शेतकऱ्यांकडे थकली आहेत. कोरोना तसेच सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांना शासनाकडून वीज बिल माफ होईल, अशी अपेक्षा आहे; परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही सवलत दिली नाही. मात्र, महावितरणकडून महाऊर्जा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विशेष सवलतीची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, आज शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करत आहे. या अभियानात शेतकऱ्यांना सवलत देण्याबरोबरच त्यातील ३३ टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतीअंतर्गत खर्च करण्याचाही उपक्रम महावितरण राबवीत आहे.

महावितरणकडून शेतकऱ्यांना विशेष सवलत देऊन थकीत बिल भरण्यासाठी सोनेरी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेऊन आपल्या डोक्यावरील वीज बिलाची थकबाकी दूर करावी, तसेच महावितरणला सहकार्य करावे. काही शेतकरी चालू बिलदेखील भरत नाहीत. त्यामुळे चालू बिल भरण्यासाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

-संतोष वहाणे, मुख्य अभियंता, नांदेड

शासनाकडून वीज बिल माफ करण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे बिल माफ करावे, तसेच कृषी पंपांना सवलतीत वीज उपलब्ध करून देण्यात यावी.

-बालाजी नादरे, शेतकरी

महावितरणकडून ज्याप्रमाणे कृषी पंपाची वीज बिले भरण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे, त्याप्रमाणेच जे शेतकरी नियमितपणे वीज बिल भरणा करतात त्यांना विशेष मोहीम व उपक्रमाद्वारे नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा करावा. जेणेकरून वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.

-नीलेश जोगदंड, शेतकरी

बऱ्याच शेतकऱ्यांना आजपर्यंत महावितरणकडून पैसे भरूनही विज कनेक्शन देण्यात आले नाही. कोटेशन भरूनही वीजपुरवठा करण्यास महावितरणकडून दिरंगाई झाली असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या कोटेशनची रक्कम व्याजासह परत करून त्यांना मोफत कनेक्शन द्यावे.

-बालाजी काकडे, शेतकरी