शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

संसदेत शब्दही काढला नाही अन् आता मोर्चे काढण्याची भाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:22 IST

१४ ऑगस्टला होत असलेल्या नियोजन समितीच्या बैठकीबाबत चर्चा करण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी ते म्हणाले, ५० टक्के ...

१४ ऑगस्टला होत असलेल्या नियोजन समितीच्या बैठकीबाबत चर्चा करण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी ते म्हणाले, ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. केंद्राने त्यावर दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे. ही कायदेशीर अडचण आहे. त्यामुळे ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा रद्द करावी, अशी माणगी यूपीए आणि इतर पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात केली होती; परंतु त्यावेळी या विषयावर भाजपचा एकही खासदार बोलला नाही. मग आता आंदोलने कशाला काढता. असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. विधान परिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीबाबत चव्हाण म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. आता उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्यपाल नक्कीच करतील अशी अपेक्षा आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत राज्याचे उत्पन्न घटले आहे. बराचसा निधी कोरोनाच्या उपायोजनांसाठी वळविण्यात आला आहे. त्यामुळे देणी रेंगाळली आहेत; परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. नांदेड-आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याच्या मुद्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत भाजपचा एकही खासदार बोलला नाही आणि आता माेर्चे काढण्याची भाषा केली जात आहे, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. नांदेडात २० ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या आंदोलनाबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

१४ ऑगस्टला होत असलेल्या नियोजन समितीच्या बैठकीबाबत चर्चा करण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी ते म्हणाले, ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. केंद्राने त्यावर दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे. ही कायदेशीर अडचण आहे. त्यामुळे ५० टक्यांची आरक्षण मर्यादा रद्द करावी, अशी मागणी यूपीए आणि इतर पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत केली होती; परंतु त्यावेळी या विषयावर भाजपचा एकही खासदार बोलला नाही. मग आता आंदोलने कशाला काढता, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. विधान परिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीबाबत चव्हाण म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. आता उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्यपाल नक्कीच करतील अशी अपेक्षा आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत राज्याचे उत्पन्न घटले आहे. बराचसा निधी कोरोनाच्या उपायोजनांसाठी वळविण्यात आला आहे. त्यामुळे देणी रेंगाळली आहेत; परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

चौकट...

मराठा समाजासह बहुजनांच्या हितासाठी मी सभागृहासह रस्त्यावर लढण्याची कायम तयारी ठेवली आहे. राज्य शासनाने मराठा समाजाच्या पाच मागण्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्याचा राज्य सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी कोल्हापूर, नाशिक येथेही मूक आंदोलने करण्यात आली. दोन महिन्यांचा कालावधी लाेटल्यानंतरही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे नांदेडमध्येही मूक आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाविषयीची माझी भूमिका मी सभागृहात स्पष्टपणे मांडली असल्याचे सबंध देशाने पाहिले आहे. राज्य सरकारने केवळ केंद्र सरकारवर ढकलाढकल न करता मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी विधायक पावले उचलावीत.

- छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार