शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत शब्दही काढला नाही अन् आता मोर्चे काढण्याची भाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:22 IST

१४ ऑगस्टला होत असलेल्या नियोजन समितीच्या बैठकीबाबत चर्चा करण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी ते म्हणाले, ५० टक्के ...

१४ ऑगस्टला होत असलेल्या नियोजन समितीच्या बैठकीबाबत चर्चा करण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी ते म्हणाले, ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. केंद्राने त्यावर दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे. ही कायदेशीर अडचण आहे. त्यामुळे ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा रद्द करावी, अशी माणगी यूपीए आणि इतर पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात केली होती; परंतु त्यावेळी या विषयावर भाजपचा एकही खासदार बोलला नाही. मग आता आंदोलने कशाला काढता. असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. विधान परिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीबाबत चव्हाण म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. आता उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्यपाल नक्कीच करतील अशी अपेक्षा आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत राज्याचे उत्पन्न घटले आहे. बराचसा निधी कोरोनाच्या उपायोजनांसाठी वळविण्यात आला आहे. त्यामुळे देणी रेंगाळली आहेत; परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. नांदेड-आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याच्या मुद्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत भाजपचा एकही खासदार बोलला नाही आणि आता माेर्चे काढण्याची भाषा केली जात आहे, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. नांदेडात २० ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या आंदोलनाबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

१४ ऑगस्टला होत असलेल्या नियोजन समितीच्या बैठकीबाबत चर्चा करण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी ते म्हणाले, ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. केंद्राने त्यावर दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे. ही कायदेशीर अडचण आहे. त्यामुळे ५० टक्यांची आरक्षण मर्यादा रद्द करावी, अशी मागणी यूपीए आणि इतर पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत केली होती; परंतु त्यावेळी या विषयावर भाजपचा एकही खासदार बोलला नाही. मग आता आंदोलने कशाला काढता, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. विधान परिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीबाबत चव्हाण म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. आता उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्यपाल नक्कीच करतील अशी अपेक्षा आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत राज्याचे उत्पन्न घटले आहे. बराचसा निधी कोरोनाच्या उपायोजनांसाठी वळविण्यात आला आहे. त्यामुळे देणी रेंगाळली आहेत; परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

चौकट...

मराठा समाजासह बहुजनांच्या हितासाठी मी सभागृहासह रस्त्यावर लढण्याची कायम तयारी ठेवली आहे. राज्य शासनाने मराठा समाजाच्या पाच मागण्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्याचा राज्य सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी कोल्हापूर, नाशिक येथेही मूक आंदोलने करण्यात आली. दोन महिन्यांचा कालावधी लाेटल्यानंतरही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे नांदेडमध्येही मूक आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाविषयीची माझी भूमिका मी सभागृहात स्पष्टपणे मांडली असल्याचे सबंध देशाने पाहिले आहे. राज्य सरकारने केवळ केंद्र सरकारवर ढकलाढकल न करता मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी विधायक पावले उचलावीत.

- छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार