शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य घटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:34 AM

लोकसंस्कृती जोपासणाऱ्या भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांच्या साहित्याचा मराठी साहित्यात स्वतंत्र विचार केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष डॉ. दादासाहेब मोरे यांनी केले.

ठळक मुद्देसाहित्यिक मोरे : भटक्या-विमुक्तांचे पहिले मराठी साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : लोकसंस्कृती जोपासणाऱ्या भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांच्या साहित्याचा मराठी साहित्यात स्वतंत्र विचार केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष डॉ. दादासाहेब मोरे यांनी केले.महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि चतुराई प्रतिष्ठान चुंचा यांच्या वतीने आयोजित भटक्या-विमुक्तांचे पहिले मराठी साहित्य संमेलनात मोरे बोलत होते़कुसुम सभागृह येथे आयोजित संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री आ.़ डी.पी.सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. गणेश शिंदे, संयोजक व कार्याध्यक्ष प्रा. गजानन लोमटे, कवी प्रा.महेश मोरे, प्रा.व्यंकटी पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षीय भाषणात डॉ. मोरे म्हणाले, हातात छिन्नी-हातोडा घेवून अजरामर शिल्पाकृती निर्माण करणारा, श्रम परीमार्जन करण्यासाठी समूहाने लोकसंगीत व लोककलांची निर्मिती करणारा अठरापगड जाती-जमातीत विभागलेला हा बहुजन समाजच संस्कृतीचा आणि कला-कौशल्यांचा वाहक आहे. राज्यात भटक्या-विमुक्त जमातींची संख्या ४३ असून त्यांच्यातील पोटजातींची संख्या दोनशेंवर आहे़ प्रत्येकाची बोलीभाषा भिन्न असून त्यांच्यातील वेगळेपण बोलताना जाणवते, असे मोरे यांनी सांगितले़वैयक्तिक, सार्वजनिक ठिकाणी या जमाती मराठीचा वापर करतात. मराठी भाषेत शब्दसाठा वाढीबरोबरच मराठी साहित्य समृद्ध करण्यात या जमातींचा सहभाग महत्त्वपूर्ण असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मोरे यांनी म्हणाले़आ.डी. पी. सावंत म्हणाले, कोणत्याही साहित्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ते जोपासले जाण्यासाठी राजाश्रय मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले़ अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भटक्या-विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वागताध्यक्ष प्रा़ डॉ़ गणेश शिंदे यांनी गावकुसाबाहेरील व वाडी-तांड्यावरील भाषा मराठी साहित्याला कशा समृद्ध करत असल्याचे सांगितले़ प्रास्ताविक संयोजक प्रा. गजानन लोमटे यांनी केले़ सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये तर प्रा.डॉ.दीपाली लोमटे यांनी आभार मानले़ परिसंवाद व कविसंमेलनाच्या माध्यमातून मान्यवरांनी साहित्यावर विचामंथन केले.

टॅग्स :literatureसाहित्यD.P. Sawantडी. पी. सावंतNandedनांदेड