शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य घटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:34 IST

लोकसंस्कृती जोपासणाऱ्या भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांच्या साहित्याचा मराठी साहित्यात स्वतंत्र विचार केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष डॉ. दादासाहेब मोरे यांनी केले.

ठळक मुद्देसाहित्यिक मोरे : भटक्या-विमुक्तांचे पहिले मराठी साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : लोकसंस्कृती जोपासणाऱ्या भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांच्या साहित्याचा मराठी साहित्यात स्वतंत्र विचार केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष डॉ. दादासाहेब मोरे यांनी केले.महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि चतुराई प्रतिष्ठान चुंचा यांच्या वतीने आयोजित भटक्या-विमुक्तांचे पहिले मराठी साहित्य संमेलनात मोरे बोलत होते़कुसुम सभागृह येथे आयोजित संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री आ.़ डी.पी.सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. गणेश शिंदे, संयोजक व कार्याध्यक्ष प्रा. गजानन लोमटे, कवी प्रा.महेश मोरे, प्रा.व्यंकटी पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षीय भाषणात डॉ. मोरे म्हणाले, हातात छिन्नी-हातोडा घेवून अजरामर शिल्पाकृती निर्माण करणारा, श्रम परीमार्जन करण्यासाठी समूहाने लोकसंगीत व लोककलांची निर्मिती करणारा अठरापगड जाती-जमातीत विभागलेला हा बहुजन समाजच संस्कृतीचा आणि कला-कौशल्यांचा वाहक आहे. राज्यात भटक्या-विमुक्त जमातींची संख्या ४३ असून त्यांच्यातील पोटजातींची संख्या दोनशेंवर आहे़ प्रत्येकाची बोलीभाषा भिन्न असून त्यांच्यातील वेगळेपण बोलताना जाणवते, असे मोरे यांनी सांगितले़वैयक्तिक, सार्वजनिक ठिकाणी या जमाती मराठीचा वापर करतात. मराठी भाषेत शब्दसाठा वाढीबरोबरच मराठी साहित्य समृद्ध करण्यात या जमातींचा सहभाग महत्त्वपूर्ण असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मोरे यांनी म्हणाले़आ.डी. पी. सावंत म्हणाले, कोणत्याही साहित्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ते जोपासले जाण्यासाठी राजाश्रय मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले़ अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भटक्या-विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वागताध्यक्ष प्रा़ डॉ़ गणेश शिंदे यांनी गावकुसाबाहेरील व वाडी-तांड्यावरील भाषा मराठी साहित्याला कशा समृद्ध करत असल्याचे सांगितले़ प्रास्ताविक संयोजक प्रा. गजानन लोमटे यांनी केले़ सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये तर प्रा.डॉ.दीपाली लोमटे यांनी आभार मानले़ परिसंवाद व कविसंमेलनाच्या माध्यमातून मान्यवरांनी साहित्यावर विचामंथन केले.

टॅग्स :literatureसाहित्यD.P. Sawantडी. पी. सावंतNandedनांदेड