शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य घटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:34 IST

लोकसंस्कृती जोपासणाऱ्या भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांच्या साहित्याचा मराठी साहित्यात स्वतंत्र विचार केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष डॉ. दादासाहेब मोरे यांनी केले.

ठळक मुद्देसाहित्यिक मोरे : भटक्या-विमुक्तांचे पहिले मराठी साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : लोकसंस्कृती जोपासणाऱ्या भटक्या-विमुक्त जमाती बहुजन समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांच्या साहित्याचा मराठी साहित्यात स्वतंत्र विचार केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष डॉ. दादासाहेब मोरे यांनी केले.महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि चतुराई प्रतिष्ठान चुंचा यांच्या वतीने आयोजित भटक्या-विमुक्तांचे पहिले मराठी साहित्य संमेलनात मोरे बोलत होते़कुसुम सभागृह येथे आयोजित संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री आ.़ डी.पी.सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. गणेश शिंदे, संयोजक व कार्याध्यक्ष प्रा. गजानन लोमटे, कवी प्रा.महेश मोरे, प्रा.व्यंकटी पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षीय भाषणात डॉ. मोरे म्हणाले, हातात छिन्नी-हातोडा घेवून अजरामर शिल्पाकृती निर्माण करणारा, श्रम परीमार्जन करण्यासाठी समूहाने लोकसंगीत व लोककलांची निर्मिती करणारा अठरापगड जाती-जमातीत विभागलेला हा बहुजन समाजच संस्कृतीचा आणि कला-कौशल्यांचा वाहक आहे. राज्यात भटक्या-विमुक्त जमातींची संख्या ४३ असून त्यांच्यातील पोटजातींची संख्या दोनशेंवर आहे़ प्रत्येकाची बोलीभाषा भिन्न असून त्यांच्यातील वेगळेपण बोलताना जाणवते, असे मोरे यांनी सांगितले़वैयक्तिक, सार्वजनिक ठिकाणी या जमाती मराठीचा वापर करतात. मराठी भाषेत शब्दसाठा वाढीबरोबरच मराठी साहित्य समृद्ध करण्यात या जमातींचा सहभाग महत्त्वपूर्ण असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मोरे यांनी म्हणाले़आ.डी. पी. सावंत म्हणाले, कोणत्याही साहित्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ते जोपासले जाण्यासाठी राजाश्रय मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले़ अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भटक्या-विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वागताध्यक्ष प्रा़ डॉ़ गणेश शिंदे यांनी गावकुसाबाहेरील व वाडी-तांड्यावरील भाषा मराठी साहित्याला कशा समृद्ध करत असल्याचे सांगितले़ प्रास्ताविक संयोजक प्रा. गजानन लोमटे यांनी केले़ सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये तर प्रा.डॉ.दीपाली लोमटे यांनी आभार मानले़ परिसंवाद व कविसंमेलनाच्या माध्यमातून मान्यवरांनी साहित्यावर विचामंथन केले.

टॅग्स :literatureसाहित्यD.P. Sawantडी. पी. सावंतNandedनांदेड