शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

चाॅकलेट नको, मला सॅनिटायझर हवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:20 IST

नांदेड : जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होऊन दोन आठवडे झाले असून, अद्याप शाळेतील विद्यार्थी संख्या वाढली ...

नांदेड : जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होऊन दोन आठवडे झाले असून, अद्याप शाळेतील विद्यार्थी संख्या वाढली नाही. एकीकडे कोरोनाचे भय, तर दुसरीकडे शिक्षणाची ओढ अशा द्विधा स्थितीत विद्यार्थी असून पालकांमध्ये गोंधळलेले वातावरण आहे. ११ महिन्यांपासून घरातच बसून ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांचा मात्र शाळेत जाण्याचा हट्ट सुरू आहे, तर पालकांनाही तो हट्ट पुरवावा लागत आहे. अशा वेळी आपल्या मुलाला शाळेत पाठविताना सॅनिटायझर सोबत दिले जात आहे. मुलेही आता मला चाॅकलेट नको, सॅनिटायझर हवे, असे म्हणत आहेत. त्यामुळे बाजारात सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. सध्या पाचवी ते आठवीचे ३२ टक्के विद्यार्थी शाळेत जात असून, ही उपस्थिती अत्यल्प आहे. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढत आहे.

चाैकट -

शाळा सुरू झाल्या असल्या, तरी पूर्वीसारखे मनासारखे वातावरण राहिले नाही. कोरोनामुळे ही परिस्थिती आली आहे. कोरोनाची भीती कायम असल्याने काळजी घ्यावी लागत आहे. दररोज सॅनिटायझर व मास्क सोबत आणावे लागत आहे. स्कूलबसमधून सध्या शाळेत जात नाही, तर वडीलच शाळेत नेऊन सोडतात. शाळेत विद्यार्थ्यांना अंतराने बसविण्यात येत असून, शिक्षकांचे लक्ष आहे.

- ओंकार वाघमारे, सातवीतील विद्यार्थी

चाैकट -

शाळेत गेल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान मोजण्यात येत असून, मगच प्रवेश दिला जात आहे. आमच्या शाळेत सॅनिटायझर मोफत दिले जात असले, तरी मी घरून एक बाटली सोबत घेऊन येत आहे. आई, वडीलही आवर्जून सॅनिटायझरविषयी सूचना देत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरची आवश्यकता भासत आहे.

- संग्राम लोखंडे, सातवीतील विद्यार्थी.

चाैकट -

मागील दहा, बारा महिन्यांपासून घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेऊन कंटाळा आला आहे. कधी एकदाचे शाळेत जावावे असे झाले होते. आता शाळा सुरू झाल्या असून, जाताना दररोज स्कूलबॅगमध्ये सॅनिटायझरची बाटली टाकावी लागत आहे. एकवेळेस टिपीन नसले तरी चालेल; पण सॅनिटायझर सोबत हवे.

- सुमुख फुलारी, दहावीतील विद्यार्थी

चाैकट -

जिल्ह्यातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असून, त्यादृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सर्व मुख्याध्यापकांना कोरोनाविषयक नियम पाळण्याच्या सूचना दिल्या असून, शाळेत प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान मोजण्यात येत असून मास्कशिवाय प्रवेश दिला जात नाही. एकही विद्यार्थी कोरोनाबाधित आढळला नाही.