शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

एनजीटीकडून मनपाला घनकचरा विल्हेवाटप्रकरणी ४० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:44 IST

शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु आजपर्यंत घनकचरा व्यवस्थापन होऊ न शकल्यामुळे एनजीटीने ४०लाखाचा दंड ...

शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु आजपर्यंत घनकचरा व्यवस्थापन होऊ न शकल्यामुळे एनजीटीने ४०लाखाचा दंड ठोठावला आहे. डिसेंबरच्या नंतरही घनकचऱ्याचे व्यवस्थापन झाले नसेल तर माहे जानेवारी २०२१ पासून प्रती महिन्याला ५ लाखाचा दंड लावण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महापालिका क्षेत्रात दररोज शेकडो टन घनकचरा उचलण्यात येतो परंतु त्याची योग्य विल्हेवाट लावल्या जात नाही. परिणामी प्रदूषण अधिक वाढत आहे. पर्यावरणावर या प्रदूषणामुळे परिणाम होतो, ही बाब राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणाने अधिक गंभीरतेने घेतलेली आहे. एनजीटीने दिलेला निर्णय हा देशभरासाठी लागू राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्डाने महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन करण्यात हलगर्जीपणा झाल्याचे मानून ४०लाखाचा दंड लावला आहे. हा दंड डिसेंबर अखेरपर्यंत भरावा लागणार आहे.

जानेवारीत घनकचरा विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प सुरू होणार

तुप्पा येथे महापालिकेच्यावतीने ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प उभा करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यामध्ये असून डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी २०२१ मध्ये घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू होईल. सध्या तुप्पा डंपिंग ग्राऊंडवर प्रकल्पाच्या ठिकाणी मशिन बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचबरोबर ड्रेनेजच्या बाबतीत विकास आराखडा तयार झाला असून नगरोत्थान योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

- डॉ. सुनील लहाने,

आयुक्त मनपा