शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गटशेती योजनेला मुदतवाढ देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:12 IST

नांदेड, कृषी विभागाच्या वतीने गटशेतीच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, या योजनांना कोरोनामुळे अडथळे निर्माण झाले आहेत, ...

नांदेड, कृषी विभागाच्या वतीने गटशेतीच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, या योजनांना कोरोनामुळे अडथळे निर्माण झाले आहेत, ही बाब लक्षात घेऊन ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून देण्याची गरज आहे.

कृषी विभागाच्या गटशेती प्रोत्साहन व सबलीकरण योजनेंतर्गत गट शेतीस चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून अनेक गटांचे अर्ज मागून जिल्हास्तरीय समितीमार्फत दरवर्षी सहा सक्षम गटांची निवड केली जात होती. या योजनेमध्ये दोन वर्षात अनेक शेतकरी गट, कंपन्यांच्या निवडी झाल्या असून, गटाच्या व कंपनीचा सविस्तर प्रकल्प आराखडा डीपीआरला जिल्हास्तरीय समितीमार्फत मंजुरी मिळाल्या आहे. मात्र या योजनेची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. अनेक गटांच्या बँकेच्या कर्जाचा प्रश्न प्रलंबित आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी गटांना, कंपन्यांना काम करण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून कृषी विभागाने गटशेती योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देऊन मंजूर गटांना तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी या योजनेकडे विशेष लक्ष देऊन राज्यातील मंजूर शेतकरी गटांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये दोन वर्षात दहा गटाची निवड झाली असून, गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शेतकरी गटाची कामे ठप्प पडली आहेत. त्यातच काही गटांच्या प्रस्तावित आराखडा डीपीआरला कोरोनाच्या काळामध्ये मंजुरी मिळाल्यामुळे व गटाच्या बँक कर्जाची प्रश्न प्रलंबित असल्यामुळे शेतकरी गटाचे, कंपन्यांचे पुढील कामकाज ठप्प आहे. सविस्तर प्रकल्प आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर गटांनी प्रशिक्षण व राज्यातील सक्षम व्यवसाय बघण्यासाठी राज्यभर दौरेसुद्धा केले. त्यात बऱ्याच गटांचा पैसा व वेळ खर्च झाला असून, या सर्व गोष्टीचा विचार करून या गट शेती योजनेची एक वर्षाची मुदत वाढवून मंजूर गटांना तात्काळ निधी उपलब्ध करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.