शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
4
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
5
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
6
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
7
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
8
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
9
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
10
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
11
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
12
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
13
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
14
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
15
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
16
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
17
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
18
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
19
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
20
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल

गटशेती योजनेला मुदतवाढ देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:12 IST

नांदेड, कृषी विभागाच्या वतीने गटशेतीच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, या योजनांना कोरोनामुळे अडथळे निर्माण झाले आहेत, ...

नांदेड, कृषी विभागाच्या वतीने गटशेतीच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, या योजनांना कोरोनामुळे अडथळे निर्माण झाले आहेत, ही बाब लक्षात घेऊन ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून देण्याची गरज आहे.

कृषी विभागाच्या गटशेती प्रोत्साहन व सबलीकरण योजनेंतर्गत गट शेतीस चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून अनेक गटांचे अर्ज मागून जिल्हास्तरीय समितीमार्फत दरवर्षी सहा सक्षम गटांची निवड केली जात होती. या योजनेमध्ये दोन वर्षात अनेक शेतकरी गट, कंपन्यांच्या निवडी झाल्या असून, गटाच्या व कंपनीचा सविस्तर प्रकल्प आराखडा डीपीआरला जिल्हास्तरीय समितीमार्फत मंजुरी मिळाल्या आहे. मात्र या योजनेची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. अनेक गटांच्या बँकेच्या कर्जाचा प्रश्न प्रलंबित आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी गटांना, कंपन्यांना काम करण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून कृषी विभागाने गटशेती योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देऊन मंजूर गटांना तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा व महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी या योजनेकडे विशेष लक्ष देऊन राज्यातील मंजूर शेतकरी गटांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये दोन वर्षात दहा गटाची निवड झाली असून, गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शेतकरी गटाची कामे ठप्प पडली आहेत. त्यातच काही गटांच्या प्रस्तावित आराखडा डीपीआरला कोरोनाच्या काळामध्ये मंजुरी मिळाल्यामुळे व गटाच्या बँक कर्जाची प्रश्न प्रलंबित असल्यामुळे शेतकरी गटाचे, कंपन्यांचे पुढील कामकाज ठप्प आहे. सविस्तर प्रकल्प आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर गटांनी प्रशिक्षण व राज्यातील सक्षम व्यवसाय बघण्यासाठी राज्यभर दौरेसुद्धा केले. त्यात बऱ्याच गटांचा पैसा व वेळ खर्च झाला असून, या सर्व गोष्टीचा विचार करून या गट शेती योजनेची एक वर्षाची मुदत वाढवून मंजूर गटांना तात्काळ निधी उपलब्ध करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.