शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

नांदेडची गोदावरी नदी प्रदूषणामुळे संकटात, जागतिक वसुंधरा दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:18 IST

नांदेड : दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखली जाणारी नांदेडची गोदावरी नदी प्रदूषणामुळे संकटात सापडली आहे. शहरातील ड्रेनेजचे दूषित ...

नांदेड : दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखली जाणारी नांदेडची गोदावरी नदी प्रदूषणामुळे संकटात सापडली आहे. शहरातील ड्रेनेजचे दूषित पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे तर दुसरीकडे नदीतील गवत, झाडे, गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असून, जलचर प्राण्यांचा मृत्यू होत आहे तसेच पाणीही दूषित होत आहे. गोवर्धन घाट ते वाजेगावपर्यंत असलेल्या नदीपात्रात घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. या नदीपात्रातील पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळ दर महिन्याला तपासणीसाठी औरंगाबादला पाठवते. पण हे आता नावालाच राहिले आहे. पावसाळा जवळ येत असून, अद्यापही नांदेडमधील गोदावरीच्या स्वच्छतेबाबत कोणतीही तयारी करण्यात आली नसल्याचे दिसत आहे.

गोदावरीच्या पात्राकडे अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे गोदावरीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. गुरूत्ता - गद्दी सोहळ्यानिमित्त नदीकाठाचे सुशोभिकरण करण्यात आले. मात्र, गोदावरीच्या स्वच्छतेची काळजी घेण्यात आली नाही. या नदीपात्रात वाळू माफियांचा सुळसुळाट असून, २४ तास वाळूचा उपसा या नदीतून होत असल्याने नदी परिसर अधिकच प्रदूषित झाला आहे.

चौकट-

पर्यावरण जपणे म्हणजे वसुंधरेचे अस्तित्व जपणे होय. पर्यावरण जपण्यासाठी वृक्षांची लागवड, नदी परिसरातील स्वच्छता व कमी प्रमाणात वाळू उपसा या बाबींकडे जिल्हा प्रशासनाने गंभीररित्या लक्ष देणे आवश्यक आहे. गोदावरी परिसरात पिंपळ, चिंच, वड अशा वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

चौकट-

शहरात महत्त्वाचे तीन मत्स्य बाजार असून, त्यात बुधवार बाजार, इतवारा बाजार व शुक्रवार बाजार आहेत. पावसाळ्यात नदीकाठच्या भागात दीडशे ते दोनशे टन स्थानिक मासळी बाजारात येते. सध्या १ टन मासे बाजारात येत आहेत.