शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडकरांना तीन दिवसांआड पाणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:57 IST

विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रकल्प परिसरातील विद्युत रोहित्र बंद करण्याबाबत महावितरणला वारंवार कळवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शहरावर मे महिन्यानंतर जलसंकट उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमहावितरणला मनपाचे आणखी एक पत्र

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रकल्प परिसरातील विद्युत रोहित्र बंद करण्याबाबत महावितरणला वारंवार कळवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शहरावर मे महिन्यानंतर जलसंकट उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. महापालिकेने आता शहरवासीयांना तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची तयारी केली आहे.विष्णूपुुरी प्रकल्पात सध्या २४.५१ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून तो मे अखेरपर्यंत पुरण्याची शक्यता आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या विष्णूपुरीतून प्रतिदिन ०.४१ दलघमी पाण्याचा उपसा होत आहे. याच वेगाने पाणी उपसा सुरु राहिल्यास मे अखेरपर्यंत विष्णूपुरी प्रकल्प कोरडा होईल, अशी शक्यता आहे.दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाने प्रकल्पातून अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांनी गाशा गुंंडाळला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली होती. त्या चर्चेत पथकांचा विषय आला होता. ही पथके कार्यान्वित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला विनंती केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र अद्यापही ही पथके कार्यान्वित झाली नाहीत. त्यामुळे उपसा सुरुच आहे.दुसरीकडे महावितरणनेही प्रकल्प परिसरात असलेले विद्युत रोहित्र बंद करण्याच्या कारवाईबाबत ‘हात’ वर केले आहेत. महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच महावितरणला आणखी एक पत्र लिहून सदर भागातील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी विद्युत रोहित्र बंद करण्याबाबत कारवाई करावी, असे कळविले आहे.जिल्ह्यात लहान-मोठे १०६ प्रकल्प आहेत. त्यात मानार, विष्णूपुरी या दोन मोठ्या प्रकल्पांसह ९ मध्यम प्रकल्प, ३ उच्च पातळी बंधारे, ८८ लघु प्रकल्प, ४ कोल्हापुरी बंधाऱ्यांचा समावेश आहे. मानार प्रकल्पाची साठवणक्षमता १४६.९२ दलघमी असून उपयुक्त साठा १३८.२१ दलघमी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पात केवळ ३४ दलघमी पाणी उरले आहे. नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पाची साठवणक्षमता ८३.५ दलघमी असून ८०.७९ दलघमी साठा उपयुक्त आहे. सध्या विष्णूपुरी प्रकल्पात २४.९ दलघमी वापरायोग्य पाणी उरले आहे. जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पात १७९.९८ दलघमी पाणी साठवता येते. या प्रकल्पात आजघडीला केवळ १३.९० दलघमी पाणी शिल्लक आहे. ही आकडेवारी पाहता मध्यम प्रकल्प गाळात रुतले म्हटल्यास वावगे ठणार नाही. गोदावरी नदीवरील ३ उच्च बंधाºयात १२१.७० दलघमी पाणी साठवण्याची क्षमता आहे. सध्या या बंधाºयात २०.६ दलघमी पाणी आहे. लहान-मोठ्या ८८ लघू प्रकल्पांची साठवणक्षमता २१६.४५ दलघमी असून उपयुक्त पाणीपातळी १९१.६ आहे. विविध लघु प्रकल्पात सध्या २८.६७ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. ४ कोल्हापुरी बंधाऱ्यांची साठवणक्षमता ६.८२ दलघमी असून एकाही प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही.सोमवारी महापालिकेची अर्थसंकल्पीय सभासोमवारी महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा होणार आहे. या सभेत पाणीप्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे प्रशासनाकडून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची तयारी केली जात आहे. त्याचवेळी महापालिकेला इतर विभागाकडून मात्र असहकार्य होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा फटका शहरवासीयांना मे नंतर बसू शकतो. विशेष म्हणजे, पर्यायी पाणी उपलब्ध करणेही यावर्षी अशक्य आहे. येलदरी, सिद्धेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. दिग्रस बंधा-यातूनही यापूर्वीच विष्णूपुरीत पाणी घेण्यात आल्याने पाणी आणायचे कुठून ? हा प्रश्न आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाvishnupuri damविष्णुपुरी धरणwater scarcityपाणी टंचाई