शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

नांदेडात जलदिंड्यांनी वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:56 IST

माजी केंद्रीय गृहमंत्री, जलसंस्कृतीचे जनक दिवंगत डॉ.शंकरराव चव्हाण यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त नांदेड शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देशंकरराव चव्हाण जयंती : जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

नांदेड : माजी केंद्रीय गृहमंत्री, जलसंस्कृतीचे जनक दिवंगत डॉ.शंकरराव चव्हाण यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त नांदेड शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जलदिंड्या, महारक्तदान शिबीर, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉ.शंकरराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले. नांदेड शहरातील चार भागांतून निघालेल्या जलदिंड्या नांदेडकरांसाठी आकर्षणाचा विषय ठरल्या होत्या.सकाळी ९ वाजता धनेगाव येथील डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जावून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आ.अमिता चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आ. शरद रणपिसे, आ.वसंतराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी समाधीचे दर्शन घेतले.डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष समितीच्या वतीने वर्कशॉप कॉर्नर, विजयनगर, अण्णाभाऊ साठे चौक, वजिराबाद मुथा चौक या ठिकाणांहून लेझीम पथक, पथनाट्य, चित्रफिती यासह जलदिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. या जलदिंड्यांमधून ‘पाणी हेच जीवन’ हा संदेश देण्यात आला. या जलदिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्याचे सादरीकरण केले. या जलदिंड्यांमध्ये महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर व विजयनगर, सावित्रीबाई माध्यमिक शाळा, सिडको येथील इंदिरा गांधी शाळा, शारदा भवन हायस्कूल, गुजराती हायस्कूल, राष्ट्रमाता विद्यालय यांनी सहभाग नोंदविला. सर्व जलदिंड्यांची सांगता डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या पुतळा परिसरात झाली. काँग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या महारक्तदान शिबिरात १३५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्ह्यातील विविध भागात वृक्षारोपण करून शंकरराव चव्हाण यांना अभिवादन केले. अभिवादन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, आ.डी.पी.सावंत, माजी खा.सुभाष वानखेडे, आ.शरद रणपिसे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी केले़ आ़ अमरनाथ राजूरकर यांनी आभार मानले़महाराष्ट्र निर्मितीच्या लढाईचे नेतृत्व करणारडॉ.शंकरराव चव्हाण यांचे कार्य मराठवाडा कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी सिंचन क्षेत्रात केलेले कार्य सदैव लक्षात राहणारे आहे. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर पुन्हा एकदा संघर्ष करण्याची वेळ आली असून डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण लढाई करत राहू. या लढाईचे नेतृत्व करण्यास मी तयार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारातून मराठवाड्याच्या विकासासाठी मार्गक्रमण करत राहू, असे यावेळी ते म्हणाले.डॉ.शंकरराव चव्हाण यांनी केवळ मराठवाड्याच नव्हे, तर विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले. त्यांच्या संकल्पनेतून उभारलेली धरणे आज महाराष्ट्राची तहान भागवित आहेत, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अभिवादन सभेत केले.