शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उड्डाण योजनेअंतर्गत घोषित केलेली नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल. त्यासोबतच ९९ वर्षे देखभाल करण्यासाठी रिलायन्स कंपनीकडे सुपूर्द केलेल्या नांदेड येथील विमानतळाची धावपट्टी जर कंपनीने दुरूस्त केली नाही तर हे विमानतळ रिलायन्सकडून काढून घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली. आ. अमरनाथ राजूरकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त घोषणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उड्डाण योजनेअंतर्गत घोषित केलेली नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल. त्यासोबतच ९९ वर्षे देखभाल करण्यासाठी रिलायन्स कंपनीकडे सुपूर्द केलेल्या नांदेड येथील विमानतळाची धावपट्टी जर कंपनीने दुरूस्त केली नाही तर हे विमानतळ रिलायन्सकडून काढून घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली. आ. अमरनाथ राजूरकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त घोषणा केली.देशातील सामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा व छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी विमानसेवेने जोडता यावे यासाठी केंद्र शासनाने उड्डाण ही महत्वाकांक्षी योजना घोषित केली. योजनेअंतर्गत नांदेड-मुंबई व नांदेड-हैदराबाद विमानसेवेची घोषणा झाली. घोषणेनुसार नांदेड-हैदराबाद विमानसेवा सुरू झाली. परंतु नांदेड-मुंबई विमानसेवेचे मात्र भिजत घोंगडे आहे़ ही विमानसेवा लवकर सुरू व्हावी, यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी नागरी उड्डयनमंत्री गजपती राजू तसेच टु-जेट कंपनीच्या अधिकाºयांशी अनेकदा प्रत्यक्ष बोलणी, पत्र व्यवहारही केला.या पार्श्वभूमीवर आ. अमरनाथ राजूरकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. नांदेड-मुंबई ही घोषित झालेली विमानसेवा सुरू करा तसेच श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळाची धावपट्टी तत्काळ दुरूस्त करण्याची मागणी त्यांनी केली.या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही प्रश्नांसंदर्भात तत्काळ पावले उचलण्यात येतील, नांदेड-मुंबई विमानसेवेसाठी स्टॉल उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ही विमानसेवा लवकरच सुरू होईल, असे सांगितले़त्यासोबतच रिलायन्स कंपनीला ९९ वर्षांसाठी हे विमानतळ दुरूस्ती व देखभालीसाठी दिले आहे. त्यामुळे धावपट्टीची दुरूस्ती करण्याचे काम या कंपनीचे आहे. जर ही कंपनी धावपट्टी दुरूस्त करीत नसेल तर या कंपनीकडून दुरूस्ती व देखभालीचे काम काढून घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले़