शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उड्डाण योजनेअंतर्गत घोषित केलेली नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल. त्यासोबतच ९९ वर्षे देखभाल करण्यासाठी रिलायन्स कंपनीकडे सुपूर्द केलेल्या नांदेड येथील विमानतळाची धावपट्टी जर कंपनीने दुरूस्त केली नाही तर हे विमानतळ रिलायन्सकडून काढून घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली. आ. अमरनाथ राजूरकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त घोषणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उड्डाण योजनेअंतर्गत घोषित केलेली नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल. त्यासोबतच ९९ वर्षे देखभाल करण्यासाठी रिलायन्स कंपनीकडे सुपूर्द केलेल्या नांदेड येथील विमानतळाची धावपट्टी जर कंपनीने दुरूस्त केली नाही तर हे विमानतळ रिलायन्सकडून काढून घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली. आ. अमरनाथ राजूरकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त घोषणा केली.देशातील सामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा व छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी विमानसेवेने जोडता यावे यासाठी केंद्र शासनाने उड्डाण ही महत्वाकांक्षी योजना घोषित केली. योजनेअंतर्गत नांदेड-मुंबई व नांदेड-हैदराबाद विमानसेवेची घोषणा झाली. घोषणेनुसार नांदेड-हैदराबाद विमानसेवा सुरू झाली. परंतु नांदेड-मुंबई विमानसेवेचे मात्र भिजत घोंगडे आहे़ ही विमानसेवा लवकर सुरू व्हावी, यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी नागरी उड्डयनमंत्री गजपती राजू तसेच टु-जेट कंपनीच्या अधिकाºयांशी अनेकदा प्रत्यक्ष बोलणी, पत्र व्यवहारही केला.या पार्श्वभूमीवर आ. अमरनाथ राजूरकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. नांदेड-मुंबई ही घोषित झालेली विमानसेवा सुरू करा तसेच श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळाची धावपट्टी तत्काळ दुरूस्त करण्याची मागणी त्यांनी केली.या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही प्रश्नांसंदर्भात तत्काळ पावले उचलण्यात येतील, नांदेड-मुंबई विमानसेवेसाठी स्टॉल उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ही विमानसेवा लवकरच सुरू होईल, असे सांगितले़त्यासोबतच रिलायन्स कंपनीला ९९ वर्षांसाठी हे विमानतळ दुरूस्ती व देखभालीसाठी दिले आहे. त्यामुळे धावपट्टीची दुरूस्ती करण्याचे काम या कंपनीचे आहे. जर ही कंपनी धावपट्टी दुरूस्त करीत नसेल तर या कंपनीकडून दुरूस्ती व देखभालीचे काम काढून घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले़